शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

भारतात खेळाडूंना धोका नाही : ठाकूर

By admin | Updated: February 11, 2016 03:27 IST

भारत अत्यंत सुरक्षित देश असून येथे कोणत्याही देशाच्या खेळाडूला धोका असण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले आहे. सुरक्षेच्या

नवी दिल्ली : भारत अत्यंत सुरक्षित देश असून येथे कोणत्याही देशाच्या खेळाडूला धोका असण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे भारत-पाक मालिकेचे आयोजन तटस्थ स्थळी करण्याच्या पाकच्या मागणीवर त्यांनी हे उत्तर दिले.पाकला जशास तसे उत्तर देताना ठाकूर म्हणाले, ‘‘भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी व्हायचे की नाही, हे पाकने आधी ठरवून टाकावे.’’ पीसीबीने याआधी भारताविरुद्ध क्रिकेट मालिकेचे आयोजन तटस्थ स्थळी करण्याची मागणी केली होती.भाजपा खासदार ठाकूर म्हणाले, ‘‘द्विपक्षीय मालिका दोन संघांपुरती मर्यादित असते, तर विश्वचषकात विविध देशांचे संघ सहभागी होतात. यंदा विश्वचषकात सहभागी होणाऱ्या १६ संघांपैकी पाक संघ एक आहे. भारत सरकार पाक संघालादेखील सुरक्षा पुरविणार आहे. माझ्या मते, सर्व पात्र संघांनी विश्वचषकात सहभागी व्हायला हवे. भारत सर्वांचे स्वागत करण्यास सज्ज आहे. एखाद्या संघाला काही त्रास असेल, तर तो संघ निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.’’पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी याआधी आयसीसीएला पाठविलेल्या प्रस्तावात भारत-पाक मालिका तटस्थ स्थळी घेण्याची विनंती केली होती. भारत दौऱ्याबाबतचा अंतिम निर्णय यापुढे पाक सरकार घेईल. आमच्या सरकारने संमती न दिल्यास पाक संघ विश्वचषकात सहभागी होणार नाही, असेही शहरयार यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था) विश्वचषक टी-२०चे यशस्वी आयोजन करण्यास बीसीसीआय कटिबद्ध आहे. विश्वचषकात सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला कडेकोट सुरक्षा पुरविली जाईल. याआधीदेखील आम्ही विश्वचषक तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन केले आहे. कोणताही संघ किंवा खेळाडूला भारतात असुक्षित वाटेल, यामागे कुठलेही कारण नाही.- अनुराग ठाकूर