शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतात खेळाडूंना धोका नाही : ठाकूर

By admin | Updated: February 11, 2016 03:27 IST

भारत अत्यंत सुरक्षित देश असून येथे कोणत्याही देशाच्या खेळाडूला धोका असण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले आहे. सुरक्षेच्या

नवी दिल्ली : भारत अत्यंत सुरक्षित देश असून येथे कोणत्याही देशाच्या खेळाडूला धोका असण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे भारत-पाक मालिकेचे आयोजन तटस्थ स्थळी करण्याच्या पाकच्या मागणीवर त्यांनी हे उत्तर दिले.पाकला जशास तसे उत्तर देताना ठाकूर म्हणाले, ‘‘भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी व्हायचे की नाही, हे पाकने आधी ठरवून टाकावे.’’ पीसीबीने याआधी भारताविरुद्ध क्रिकेट मालिकेचे आयोजन तटस्थ स्थळी करण्याची मागणी केली होती.भाजपा खासदार ठाकूर म्हणाले, ‘‘द्विपक्षीय मालिका दोन संघांपुरती मर्यादित असते, तर विश्वचषकात विविध देशांचे संघ सहभागी होतात. यंदा विश्वचषकात सहभागी होणाऱ्या १६ संघांपैकी पाक संघ एक आहे. भारत सरकार पाक संघालादेखील सुरक्षा पुरविणार आहे. माझ्या मते, सर्व पात्र संघांनी विश्वचषकात सहभागी व्हायला हवे. भारत सर्वांचे स्वागत करण्यास सज्ज आहे. एखाद्या संघाला काही त्रास असेल, तर तो संघ निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.’’पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी याआधी आयसीसीएला पाठविलेल्या प्रस्तावात भारत-पाक मालिका तटस्थ स्थळी घेण्याची विनंती केली होती. भारत दौऱ्याबाबतचा अंतिम निर्णय यापुढे पाक सरकार घेईल. आमच्या सरकारने संमती न दिल्यास पाक संघ विश्वचषकात सहभागी होणार नाही, असेही शहरयार यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था) विश्वचषक टी-२०चे यशस्वी आयोजन करण्यास बीसीसीआय कटिबद्ध आहे. विश्वचषकात सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला कडेकोट सुरक्षा पुरविली जाईल. याआधीदेखील आम्ही विश्वचषक तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन केले आहे. कोणताही संघ किंवा खेळाडूला भारतात असुक्षित वाटेल, यामागे कुठलेही कारण नाही.- अनुराग ठाकूर