शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

भारतात खेळाडूंना धोका नाही : ठाकूर

By admin | Updated: February 11, 2016 03:27 IST

भारत अत्यंत सुरक्षित देश असून येथे कोणत्याही देशाच्या खेळाडूला धोका असण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले आहे. सुरक्षेच्या

नवी दिल्ली : भारत अत्यंत सुरक्षित देश असून येथे कोणत्याही देशाच्या खेळाडूला धोका असण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे भारत-पाक मालिकेचे आयोजन तटस्थ स्थळी करण्याच्या पाकच्या मागणीवर त्यांनी हे उत्तर दिले.पाकला जशास तसे उत्तर देताना ठाकूर म्हणाले, ‘‘भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी व्हायचे की नाही, हे पाकने आधी ठरवून टाकावे.’’ पीसीबीने याआधी भारताविरुद्ध क्रिकेट मालिकेचे आयोजन तटस्थ स्थळी करण्याची मागणी केली होती.भाजपा खासदार ठाकूर म्हणाले, ‘‘द्विपक्षीय मालिका दोन संघांपुरती मर्यादित असते, तर विश्वचषकात विविध देशांचे संघ सहभागी होतात. यंदा विश्वचषकात सहभागी होणाऱ्या १६ संघांपैकी पाक संघ एक आहे. भारत सरकार पाक संघालादेखील सुरक्षा पुरविणार आहे. माझ्या मते, सर्व पात्र संघांनी विश्वचषकात सहभागी व्हायला हवे. भारत सर्वांचे स्वागत करण्यास सज्ज आहे. एखाद्या संघाला काही त्रास असेल, तर तो संघ निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.’’पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी याआधी आयसीसीएला पाठविलेल्या प्रस्तावात भारत-पाक मालिका तटस्थ स्थळी घेण्याची विनंती केली होती. भारत दौऱ्याबाबतचा अंतिम निर्णय यापुढे पाक सरकार घेईल. आमच्या सरकारने संमती न दिल्यास पाक संघ विश्वचषकात सहभागी होणार नाही, असेही शहरयार यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था) विश्वचषक टी-२०चे यशस्वी आयोजन करण्यास बीसीसीआय कटिबद्ध आहे. विश्वचषकात सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला कडेकोट सुरक्षा पुरविली जाईल. याआधीदेखील आम्ही विश्वचषक तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन केले आहे. कोणताही संघ किंवा खेळाडूला भारतात असुक्षित वाटेल, यामागे कुठलेही कारण नाही.- अनुराग ठाकूर