शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारतात खेळाडूंना धोका नाही : ठाकूर

By admin | Updated: February 11, 2016 03:27 IST

भारत अत्यंत सुरक्षित देश असून येथे कोणत्याही देशाच्या खेळाडूला धोका असण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले आहे. सुरक्षेच्या

नवी दिल्ली : भारत अत्यंत सुरक्षित देश असून येथे कोणत्याही देशाच्या खेळाडूला धोका असण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे भारत-पाक मालिकेचे आयोजन तटस्थ स्थळी करण्याच्या पाकच्या मागणीवर त्यांनी हे उत्तर दिले.पाकला जशास तसे उत्तर देताना ठाकूर म्हणाले, ‘‘भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी व्हायचे की नाही, हे पाकने आधी ठरवून टाकावे.’’ पीसीबीने याआधी भारताविरुद्ध क्रिकेट मालिकेचे आयोजन तटस्थ स्थळी करण्याची मागणी केली होती.भाजपा खासदार ठाकूर म्हणाले, ‘‘द्विपक्षीय मालिका दोन संघांपुरती मर्यादित असते, तर विश्वचषकात विविध देशांचे संघ सहभागी होतात. यंदा विश्वचषकात सहभागी होणाऱ्या १६ संघांपैकी पाक संघ एक आहे. भारत सरकार पाक संघालादेखील सुरक्षा पुरविणार आहे. माझ्या मते, सर्व पात्र संघांनी विश्वचषकात सहभागी व्हायला हवे. भारत सर्वांचे स्वागत करण्यास सज्ज आहे. एखाद्या संघाला काही त्रास असेल, तर तो संघ निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.’’पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी याआधी आयसीसीएला पाठविलेल्या प्रस्तावात भारत-पाक मालिका तटस्थ स्थळी घेण्याची विनंती केली होती. भारत दौऱ्याबाबतचा अंतिम निर्णय यापुढे पाक सरकार घेईल. आमच्या सरकारने संमती न दिल्यास पाक संघ विश्वचषकात सहभागी होणार नाही, असेही शहरयार यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था) विश्वचषक टी-२०चे यशस्वी आयोजन करण्यास बीसीसीआय कटिबद्ध आहे. विश्वचषकात सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला कडेकोट सुरक्षा पुरविली जाईल. याआधीदेखील आम्ही विश्वचषक तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन केले आहे. कोणताही संघ किंवा खेळाडूला भारतात असुक्षित वाटेल, यामागे कुठलेही कारण नाही.- अनुराग ठाकूर