शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारत कसोटीत भक्कम स्थितीत, ऑस्ट्रेलियावर 152 धावांची आघाडी

By admin | Updated: March 19, 2017 17:33 IST

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला रांचीमधल्या तिस-या कसोटी सामन्याचा चौथा दिवस रंगतदार ठरला आहे.

ऑनलाइन लोकमतरांची, दि. 19 - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला रांचीमधल्या तिस-या कसोटी सामन्याचा चौथा दिवस रंगतदार ठरला आहे. टीम इंडियानं आपला पहिला डाव 9 गड्यांच्या मोबदल्यात 603 धावांवर घोषित केला आहे. विशेष म्हणजे कसोटीत भारताकडे ऑस्ट्रेलियाविरोधात 152 धावांची आघाडी आहे. रवींद्र जाडेजानं डेव्हिड वॉर्नर आणि नॅथन लायनचा बाद करत चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला 2 बाद 23 धावांवर रोखले आहे. भारताकडे अद्यापही 129 धावांची आघाडी आहे. त्यामुळेच कसोटीत टीम इंडियाला विजयाची आशा आहे. टीम इंडियाला रांची कसोटीत ख-या अर्थानं पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या 199 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियावर वर्चस्व प्रस्थापित करणं सहजशक्य झालं आहे. चेतेश्वर पुजारानं केलेलं द्विशतक, त्याचबरोबर रिद्धिमान साहाचं शतक आणि रवींद्र जाडेजाचं नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर टीम इंडियानं रांची कसोटीत 9 बाद 603 या धावांपर्यंत मजल मारत पहिला डाव घोषित केला होता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 152 धावांची आघाडी मिळाली होती.पुजारानं 505 चेंडूंत 21 चौकारांसह 202 धावांची खेळी केली. रिद्धिमान साहानं आठ चौकार आणि एका षटकार लगावत 117 धावा करत भारताच्या धावसंख्येत भर घातली. त्यानंतर मैदानावर आलेल्या रवींद्र जाडेजानं पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 54 धावा ठोकून टीम इंडियाला दिशा मिळवून दिली. पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागीदारीनं टीम इंडिया भक्कम स्थितीत पोहोचली. रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहाच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर सहजरीत्या आघाडी मिळवली. मात्र रिद्धिमान साहाला पंचांनी बाद केले असतानाच उफर वापरल्यामुळे साहाला अखेर जीवदान मिळालं. यामुळे ऑस्ट्रेलियनं संघात कमालीची नाराजी पसरली होती.