शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

भारत अंतिम फेरीत

By admin | Updated: March 2, 2016 02:58 IST

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर विराट कोहली आणि युवराजसिंग यांनी कठीण परिस्थितीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत

आशिया चषक टी-२० : विराटची अर्धशतकी खेळी; लंकेवर ५ गड्यांनी मातमिरपूर : गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर विराट कोहली आणि युवराजसिंग यांनी कठीण परिस्थितीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला पाच गड्यांनी पराभूत करीत सलग तिसऱ्या विजयासह स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.लंकेने नाणेफेक गमाविल्यानंतर हार्दिक पंड्या (२६ धावांत दोन बळी) आणि जसप्रीत बुमराह (२७ धावांत दोन बळी) यांच्या भेदक माऱ्यापुढे ९ बाद १४२ अशी आव्हानात्मक मजल गाठली. चमारा कपुगेदरा याने सर्वाधिक ३० धावांचे योगदान दिले. तळाच्या स्थानावर आलेल्या मिलिंदा सिरीवर्धना याने १७ चेंडूंत २२ आणि थिसारा परेराने सहा चेंडूंत १७, तसेच नुवान कुलसेकरा याने नऊ चेंडूंत १३ धावा केल्या. भारताची एक वेळ २ बाद १६ अशी पडझड झाली होती. अशा वेळी पाकवरील विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कोहलीने ४७ चेंडूंत नाबाद ५६ धावा फटकवित संयमी खेळी केली. युवराजने १८ चेंडू खेळून ३५ धावा ठोकल्या. यादरम्यान सिक्सरकिंग युवीने खास शैलीत फटके मारले. धोनीनेही एक षटकार मारून चाहत्यांचे मनोरंजन केले. विजयी चौकार विराटने मारताच १९.२ षटकांत ५ बाद १४२ धावा करीत सामना संपविला. भारताचा यंदा नऊ टी-२० सामन्यांतील हा आठवा विजय होता. दुसरीकडे श्रीलंकेने तीन सामन्यांत हा दुसरा पराभव पत्करला. यामुळे लंकेच्या अंतिम फेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत.टी-२० मध्ये धोनीचे यष्टिमागे बळींचे अर्धशतक पूर्णमिरपूर : भारतीय कर्णधार व यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिपाठी बळींचे अर्धशतक पूर्ण केले. धोनीने श्रीलंकेविरुद्ध आशिया कप स्पर्धेत मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या गोलंदाजीत दिनेश चंडीमलचा झेल घेत यष्टिपाठी ५० बळी घेण्याची कामगिरी केली. धोनीने त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर शेहान जयसूर्याचा झेल टिपला. भारतीय कर्णधाराने ६१ व्या लढतीत हा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा यष्टिरक्षक ठरला. पाकिस्तानच्या कामरान अकमलने ५४ सामन्यांत ६० बळी घेतले असून या यादीत तो अव्वल स्थानी आहे. >> धावफलकश्रीलंका : दिनेश चंडीमल झे. धोनी गो. नेहरा ०४, तिलकरत्ने दिलशान झे. आश्विन गो. पांड्या १६, शेहान जयसूर्या झे. धोनी गो. बुमराह ०३, चमारा कपुगेदरा झे. पांड्या गो. बुमराह ३०, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज त्रि. गो. पांड्या १८, मिलिंदा सिरीवर्धना झे. रैना गो. आश्विन २२, दासून शनाका धावबाद ०१, थिसारा परेरा यष्टिचित धोनी गो. आश्विन १७, नुवान कुलसेकरा धावबाद १३, दुश्मंता चमीरा नाबाद २. अवांतर : १०. एकूण : २० षटकांत ९ बाद १३८. गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-२३-१, जसप्रीत बुमराह ४-०-२७-२, हार्दिक पांड्या ४-०-२६-२, युवराज सिंग १-०-३-०, रवींद्र जडेजा २-०-१९-०, रविचंद्रन आश्विन ४-०-२६-२, सुरेश रैना १-०-९-०.भारत : शिखर धवन झे. चंडीमल गो. कुलसेकरा १३, रोहित शर्मा झे. कपुगेदरा गो. कुलसेकरा १५, विराट कोहली नाबाद ५६, सुरेश रैना झे. कुलसेकरा गो. शनाका २५, युवराजसिंग झे. कुलसेकरा गो. परेरा ३५, हार्दिक पंड्या त्रि. गो. हेराथ २, धोनी नाबाद ७, अवांतर : १, एकूण : १९.२ षटकांत ५ बाद १४२ धावा. गोलंदाजी : मॅथ्यूज ३-१६-०-०, कुलसेकरा ३-०-२१-२, परेरा ४-०-३२-१, शमीरा ४-०-२७-०, हेराथ ३.२-०-२६-१, शनाका १-०-७-१, सिरीवर्धने १-०-१३-०.>> ३ विजयांसह भारत ६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. बांगलादेश २ विजय व एका पराभवासह (४ गुण) दुसऱ्या स्थानी आहे.