शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

भारत अंतिम फेरीत

By admin | Updated: March 2, 2016 02:58 IST

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर विराट कोहली आणि युवराजसिंग यांनी कठीण परिस्थितीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत

आशिया चषक टी-२० : विराटची अर्धशतकी खेळी; लंकेवर ५ गड्यांनी मातमिरपूर : गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर विराट कोहली आणि युवराजसिंग यांनी कठीण परिस्थितीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला पाच गड्यांनी पराभूत करीत सलग तिसऱ्या विजयासह स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.लंकेने नाणेफेक गमाविल्यानंतर हार्दिक पंड्या (२६ धावांत दोन बळी) आणि जसप्रीत बुमराह (२७ धावांत दोन बळी) यांच्या भेदक माऱ्यापुढे ९ बाद १४२ अशी आव्हानात्मक मजल गाठली. चमारा कपुगेदरा याने सर्वाधिक ३० धावांचे योगदान दिले. तळाच्या स्थानावर आलेल्या मिलिंदा सिरीवर्धना याने १७ चेंडूंत २२ आणि थिसारा परेराने सहा चेंडूंत १७, तसेच नुवान कुलसेकरा याने नऊ चेंडूंत १३ धावा केल्या. भारताची एक वेळ २ बाद १६ अशी पडझड झाली होती. अशा वेळी पाकवरील विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कोहलीने ४७ चेंडूंत नाबाद ५६ धावा फटकवित संयमी खेळी केली. युवराजने १८ चेंडू खेळून ३५ धावा ठोकल्या. यादरम्यान सिक्सरकिंग युवीने खास शैलीत फटके मारले. धोनीनेही एक षटकार मारून चाहत्यांचे मनोरंजन केले. विजयी चौकार विराटने मारताच १९.२ षटकांत ५ बाद १४२ धावा करीत सामना संपविला. भारताचा यंदा नऊ टी-२० सामन्यांतील हा आठवा विजय होता. दुसरीकडे श्रीलंकेने तीन सामन्यांत हा दुसरा पराभव पत्करला. यामुळे लंकेच्या अंतिम फेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत.टी-२० मध्ये धोनीचे यष्टिमागे बळींचे अर्धशतक पूर्णमिरपूर : भारतीय कर्णधार व यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिपाठी बळींचे अर्धशतक पूर्ण केले. धोनीने श्रीलंकेविरुद्ध आशिया कप स्पर्धेत मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या गोलंदाजीत दिनेश चंडीमलचा झेल घेत यष्टिपाठी ५० बळी घेण्याची कामगिरी केली. धोनीने त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर शेहान जयसूर्याचा झेल टिपला. भारतीय कर्णधाराने ६१ व्या लढतीत हा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा यष्टिरक्षक ठरला. पाकिस्तानच्या कामरान अकमलने ५४ सामन्यांत ६० बळी घेतले असून या यादीत तो अव्वल स्थानी आहे. >> धावफलकश्रीलंका : दिनेश चंडीमल झे. धोनी गो. नेहरा ०४, तिलकरत्ने दिलशान झे. आश्विन गो. पांड्या १६, शेहान जयसूर्या झे. धोनी गो. बुमराह ०३, चमारा कपुगेदरा झे. पांड्या गो. बुमराह ३०, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज त्रि. गो. पांड्या १८, मिलिंदा सिरीवर्धना झे. रैना गो. आश्विन २२, दासून शनाका धावबाद ०१, थिसारा परेरा यष्टिचित धोनी गो. आश्विन १७, नुवान कुलसेकरा धावबाद १३, दुश्मंता चमीरा नाबाद २. अवांतर : १०. एकूण : २० षटकांत ९ बाद १३८. गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-२३-१, जसप्रीत बुमराह ४-०-२७-२, हार्दिक पांड्या ४-०-२६-२, युवराज सिंग १-०-३-०, रवींद्र जडेजा २-०-१९-०, रविचंद्रन आश्विन ४-०-२६-२, सुरेश रैना १-०-९-०.भारत : शिखर धवन झे. चंडीमल गो. कुलसेकरा १३, रोहित शर्मा झे. कपुगेदरा गो. कुलसेकरा १५, विराट कोहली नाबाद ५६, सुरेश रैना झे. कुलसेकरा गो. शनाका २५, युवराजसिंग झे. कुलसेकरा गो. परेरा ३५, हार्दिक पंड्या त्रि. गो. हेराथ २, धोनी नाबाद ७, अवांतर : १, एकूण : १९.२ षटकांत ५ बाद १४२ धावा. गोलंदाजी : मॅथ्यूज ३-१६-०-०, कुलसेकरा ३-०-२१-२, परेरा ४-०-३२-१, शमीरा ४-०-२७-०, हेराथ ३.२-०-२६-१, शनाका १-०-७-१, सिरीवर्धने १-०-१३-०.>> ३ विजयांसह भारत ६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. बांगलादेश २ विजय व एका पराभवासह (४ गुण) दुसऱ्या स्थानी आहे.