शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

इंग्लंडविरुद्ध विजय मिळविण्यास भारत उत्सुक

By admin | Updated: June 2, 2014 06:52 IST

विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताला उद्या, सोमवारी साखळी फेरीतील दुसर्‍या लढतीत इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

हेग : विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताला उद्या, सोमवारी साखळी फेरीतील दुसर्‍या लढतीत इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सलामी लढतीत बेल्जियमविरुद्ध पराभव स्वीकारणारा भारतीय संघ उद्या खेळल्या जाणार्‍या लढतीत पूर्ण गुण वसूल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. काल, शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत अखेरच्या मिनिटाला गोल खावा लागल्यामुळे भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाला उद्या खेळल्या जाणार्‍या लढतीच्या निमित्ताने नवी दिल्लीमध्ये विश्व लीग फायनल्समध्ये इंग्लंडविरुद्ध ०-२ गोलफरकाने पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. गेल्या वर्षी हॉकी इंडिया लीगमध्ये विक्रमी ७३ हजार डॉलर्स रकमेला करारबद्ध झालेल्या अ‍ॅश्ले जॅक्सनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ आक्रमक आहे; पण प्रतिस्पर्धी संघ बचावातील कमकुवतपणाचा लाभ घेण्यात तरबेज आहे. भारतीय कोचिंग स्टाफ सध्या बचावातील उणिवा दूर करण्यास प्रयत्नशील आहे. भारतीय संघाने सामना संपायला केवळ १५ सेकंदांचा वेळ शिल्लक असताना बेल्जियमकडून गोल स्वीकारला. इंग्लंडच्या युरोपियन व बचावात्मक शैलीविरुद्ध भारतीय संघ कुठली रणनीती आखतो, याचे उत्तर उद्या सामन्यानंतर स्पष्ट होईल. या लढतीच्या निमित्ताने भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक टेरी वाल्श व तांत्रिक संचालक रोलेंट ओल्टमेन्स यांची कसोटी आहे. भारतीय संघ अद्याप युरोपियन कप उपविजेत्या बेल्जियमविरुद्ध अखेरच्या क्षणी पत्कराव्या लागलेल्या पराभवाच्या धक्क्यातून सावरलेला नाही. बेल्जियम संघाला ‘अ’ गटात आॅस्ट्रेलियापाठोपाठ उपांत्य फेरीचा दावेदार मानले जात आहे. इंग्लंडला सलामी लढतीत स्पेनविरुद्ध १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले. सलामी लढतीत गुणांचे खाते उघडण्यात भारतीय संघ अपयशी ठरल्यामुळे प्रशिक्षक वॉल्श निराश झाले आहेत; पण या लढतीतील कामगिरीमुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत मात्र भारतीय संघाला चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल. ते म्हणाले, स्पेनविरुद्धच्या लढतीत पूर्ण गुण वसूल करता न आल्यामुळे इंग्लंडचे प्रशिक्षक बॉबी क्रचले निराश आहेत. क्रचले म्हणाले, ‘आम्ही समाधानकारक सुरुवात केली असून, भारताविरुद्धच्या लढतीत वर्चस्व गाजविण्यास उत्सुक आहोत.’ भारतीय संघ विश्व मानांकनामध्ये आठव्या स्थानावर आहे, तर इंग्लंड संघ चौथ्या स्थानी विराजमान आहे. भारतीय बचावफळीपुढे इंग्लंडच्या स्ट्रायकर्सला रोखण्याचे आव्हान आहे. २०१० मध्ये नवी दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. (वृत्तसंस्था)