शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

भारत गुआमविरुद्ध २-१ ने पराभूत

By admin | Updated: June 17, 2015 02:01 IST

कर्णधार सुनील छेत्रीने ५० वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला असला, तरी २०१८ च्या फिफा फुटबॉल विश्वकप प्री-क्वालिफायर

गुआम : कर्णधार सुनील छेत्रीने ५० वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला असला, तरी २०१८ च्या फिफा फुटबॉल विश्वकप प्री-क्वालिफायर लढतीत भारतीय संघाला जागतिक क्रमवारीत १७४ व्या स्थानावर असलेल्या गुआम संघाविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे भारताच्या विश्वकप स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या आशेला धक्का बसला आहे. येथील जीएफए राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या ‘ड’ गटाच्या लढतीत भारताने चांगली सुरुवात केली; पण ३६व्या मिनिटाला यजमान संघातर्फे ब्रॅन्डन मॅकडोनल्डने शानदार गोल नोंदवीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. गेल्या आठवड्यात ओमानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मानांकनामध्ये १४१ व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघासाठी हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीत भारताने ४-० ने विजय मिळवला होता. सामन्यात मध्यंतरापर्यंत स्कोअर १-० असा होता. भारत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील होता; पण प्रतिस्पर्धी संघाच्या ट्रॅव्हिस निकलॉने ६२ व्या मिनिटाला गोल नोंदवीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. शहनाज सिंगने खाते उघडण्याचा प्रयत्न केला; पण त्याला यश आले नाही. भारतीय कर्णधार छेत्रीने इंज्युरी टाइममध्ये संघातर्फे पहिला गोल नोंदविला. त्यानंतर गुआम संघाने आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले. छेत्रीचा हा ५० वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. त्याने या लढतीत वैयक्तिक विक्रम नोंदवला असला तरी संघाला मात्र त्याचा लाभ झाला नाही. भारत व तुर्कमेनिस्तान संघांविरुद्ध सलग दोन विजय मिळविणाऱ्या गुआम संघाने राऊंड-२ च्या ‘ड’ गटात गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. गुआम संघाचा हा विश्वकप पात्रता स्पर्धेतील केवळ दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी ‘ड’ गटात तुर्कमेनिस्तानविरुद्ध १-० ने विजय मिळवला होता. (वृत्तसंस्था)५० गोल नोंदविणारा पहिला भारतीयतामुनिंग : भारतीय फुटबॉल संघाला विश्वकप पात्रता स्पर्धेत गट साखळी सामन्यात गुआमविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला असला, तरी कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या कारकिर्दीत ५० वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवण्याची कामगिरी केली.छेत्रीने आज सामना संपायला काही क्षणांचा अवधी शिल्लक असताना कारकिर्दीतील ५० वा गोल नोंदवला. भारतातर्फे ५० गोल नोंदवणारा तो पहिला खेळाडू ठरला. माजी कर्णधार बायचुंग भुतियाने १०७ सामन्यांत ४२ गोल नोंदवले असून, तो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या आय. एम. विजयनने ७९ सामन्यांत ४० गोल नोंदवले आहेत. भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे छेत्रीच्या या कामगिरीला विशेष महत्त्व देण्यात आलेले नाही. भारताचा या लढतीत विजय निश्चित मानला जात होता, पण संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. खेळाडंूना फुटबॉलचे ज्ञान कमी-गुआमविरुद्धच्या लढतीत भारतीय खेळाडंूना फुटबॉलचे ज्ञान कमी असल्यासारखे जाणवले. त्यामुळे महत्त्वपूर्ण क्षणी संघाला व खेळाडूंना नुकसान झाले. खेळाडूंच्या आजच्या कामगिरीवर मी निराश झालो असल्याचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी म्हटले आहे.