शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

भारत गुआमविरुद्ध २-१ ने पराभूत

By admin | Updated: June 17, 2015 02:01 IST

कर्णधार सुनील छेत्रीने ५० वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला असला, तरी २०१८ च्या फिफा फुटबॉल विश्वकप प्री-क्वालिफायर

गुआम : कर्णधार सुनील छेत्रीने ५० वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला असला, तरी २०१८ च्या फिफा फुटबॉल विश्वकप प्री-क्वालिफायर लढतीत भारतीय संघाला जागतिक क्रमवारीत १७४ व्या स्थानावर असलेल्या गुआम संघाविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे भारताच्या विश्वकप स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या आशेला धक्का बसला आहे. येथील जीएफए राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या ‘ड’ गटाच्या लढतीत भारताने चांगली सुरुवात केली; पण ३६व्या मिनिटाला यजमान संघातर्फे ब्रॅन्डन मॅकडोनल्डने शानदार गोल नोंदवीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. गेल्या आठवड्यात ओमानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मानांकनामध्ये १४१ व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघासाठी हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीत भारताने ४-० ने विजय मिळवला होता. सामन्यात मध्यंतरापर्यंत स्कोअर १-० असा होता. भारत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील होता; पण प्रतिस्पर्धी संघाच्या ट्रॅव्हिस निकलॉने ६२ व्या मिनिटाला गोल नोंदवीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. शहनाज सिंगने खाते उघडण्याचा प्रयत्न केला; पण त्याला यश आले नाही. भारतीय कर्णधार छेत्रीने इंज्युरी टाइममध्ये संघातर्फे पहिला गोल नोंदविला. त्यानंतर गुआम संघाने आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले. छेत्रीचा हा ५० वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. त्याने या लढतीत वैयक्तिक विक्रम नोंदवला असला तरी संघाला मात्र त्याचा लाभ झाला नाही. भारत व तुर्कमेनिस्तान संघांविरुद्ध सलग दोन विजय मिळविणाऱ्या गुआम संघाने राऊंड-२ च्या ‘ड’ गटात गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. गुआम संघाचा हा विश्वकप पात्रता स्पर्धेतील केवळ दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी ‘ड’ गटात तुर्कमेनिस्तानविरुद्ध १-० ने विजय मिळवला होता. (वृत्तसंस्था)५० गोल नोंदविणारा पहिला भारतीयतामुनिंग : भारतीय फुटबॉल संघाला विश्वकप पात्रता स्पर्धेत गट साखळी सामन्यात गुआमविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला असला, तरी कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या कारकिर्दीत ५० वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवण्याची कामगिरी केली.छेत्रीने आज सामना संपायला काही क्षणांचा अवधी शिल्लक असताना कारकिर्दीतील ५० वा गोल नोंदवला. भारतातर्फे ५० गोल नोंदवणारा तो पहिला खेळाडू ठरला. माजी कर्णधार बायचुंग भुतियाने १०७ सामन्यांत ४२ गोल नोंदवले असून, तो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या आय. एम. विजयनने ७९ सामन्यांत ४० गोल नोंदवले आहेत. भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे छेत्रीच्या या कामगिरीला विशेष महत्त्व देण्यात आलेले नाही. भारताचा या लढतीत विजय निश्चित मानला जात होता, पण संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. खेळाडंूना फुटबॉलचे ज्ञान कमी-गुआमविरुद्धच्या लढतीत भारतीय खेळाडंूना फुटबॉलचे ज्ञान कमी असल्यासारखे जाणवले. त्यामुळे महत्त्वपूर्ण क्षणी संघाला व खेळाडूंना नुकसान झाले. खेळाडूंच्या आजच्या कामगिरीवर मी निराश झालो असल्याचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी म्हटले आहे.