शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

भारताचा वेस्ट इंडिजवर २३७ धावांनी विजय

By admin | Updated: August 14, 2016 04:06 IST

तिस-या कसोटीत सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर २३७ धावांनी विजय मिळवला. तसेच, भारताने तिस-या कसोटीसह मालिकाही जिंकली. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव २२५ धावांवर आटोपला.

ऑनलाइन लोकमतग्रोस इसलेट, दि. १४ - वेगवान गोलदांजांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे तिसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी यजमान वेस्ट विंडीजला १०८ धावांत गुंडाळून भारताने २३७ धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह ४ सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

भारताने दुसरा डाव ७ बाद २१७ धावांवर घोषित करून विंडीजसमोर विजयासाठी ३४६ धावांचे अवघड आव्हान ठेवले. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत दुसऱ्या डावातील पहिल्या षटकापासून विंडीजवर वर्चस्व गाजवले. मोहम्मद शमीने १५ धावांत ३ महत्त्वाचे फलंदाज बाद करून विंडीजचे कंबरडे मोडले. इशांत शर्माने ३० धावांत २ बळी घेतले. यात नाबाद शतक झळकावून विंडीजला दुसरी कसोटी अनिर्णीत राखून देणाऱ्या रोस्टॉन चेसचाही समावेश आहे. रवींद्र जाडेजाने २, तर भुवनेश्वर कुमार व आश्विन यांनी प्रत्येकी १ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.विंडीजतर्फे ब्राव्होने सर्वाधिक ५९ धावांचे योगदान दिले. विंडीजतर्फे केवळ ४ फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले. पहिली कसोटी जिंकल्यानंतर दुसरी कसोटी अनिर्णीत राखून विंडीजने मालिकेत रंग भरला होता. अखेरची कसोटी पोर्ट आॅफ स्पेन येथे १८ तारखेपासून सुरू होणार आहे. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक भारत : पहिला डाव : सर्वबाद ३५३. दुसरा डाव ७ बाद २१७ (घोषित). वेस्ट इंडिज : पहिला डाव : सर्वबाद २२५. - दुसरा डाव : ४७.३ षटकांत सर्वबाद १०८ (के्रग ब्रेथवेट ४, लियोन जॉन्सन ०, सॅम्युअल्स १२, ब्राव्हो ५९, रोस्टन चेस १०, ब्लॅक वूड १, डाव्रिच ५, होल्डर १, जोसेफ ०, गॅब्रियल ११, शमी ३/११, इशांत २/३०, भुवनेश्वर १/१३, रवींद्र जाडेजा २/२०).