ऑनलाइन टीम
मीरपूर, दि. १७ - बांग्लादेशविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने ४७ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. स्टुअर्ट बिन्नीने ६ तर मोहित शर्माने ४ बळी टिपले. मिथुन अली (२६) व मुशफिकर (११) या दोघांनी डाव सावरायचा प्रयत्न केला मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक मा-यापुढे इतर फलंदांजांचा टिकाव लागला नाही.
तत्पूर्वी, भारताचा डाव अवघ्या १०५ धावांवर संपुष्टात आला. तस्कीन अहमदने भेदक मारा करत भारताचे ५ गडी टिपले. उथप्पा (१४), रहाणे (०), पुजारा (११), रायडू (१), रैना (२७), साहा (५), बिन्नी (३), पटेल (८), मिश्रा (४), शर्मा (नाबाद ४) आणि यादवने (१७) धावा केल्या.