शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
2
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
3
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
4
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
5
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
6
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
7
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
8
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
9
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
10
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
11
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
12
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर
13
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
14
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
15
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
16
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
17
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
18
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
19
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
20
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?

‘आयआयटी अनुत्तीर्ण झाल्याने खेळाडू बनलो’

By admin | Updated: September 1, 2016 04:51 IST

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या स्टार बॅडमिंटनपटूंच्या यशात मोलाचा वाटा असणारे मार्गदर्शक आणि भारतीय संघाचे राष्ट्रीय कोच पुल्लेला गोपीचंद कारकिर्दीत यशस्वी खेळाडूदेखील होते.

नवी दिल्ली : सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या स्टार बॅडमिंटनपटूंच्या यशात मोलाचा वाटा असणारे मार्गदर्शक आणि भारतीय संघाचे राष्ट्रीय कोच पुल्लेला गोपीचंद कारकिर्दीत यशस्वी खेळाडूदेखील होते. आयआयटी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचा यशस्वी खेळाडू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता, हे गुपित खुद्द गोपीचंद यांनीच आज चाहत्यांपुढे उघड केले. क्रीडा विषयावरील चर्चेत सहभागी झालेले गोपीचंद म्हणाले, ‘‘मी आणि माझा भाऊ खेळात सहभागी व्हायचो. तो खेळात निपुण होता. मी अभ्यासात चांगला नाही, याचे मलादेखील चांगले वाटत होते. माझा भाऊ राज्य चॅम्पियन होता. त्याने आयआयटी परीक्षा दिली आणि उत्तीर्णदेखील झाला. आयआयटीला शिकायला गेल्यामुळे त्याला खेळ सोडावा लागला. मी इंजिनिअरिंगची परीक्षा दिली व त्यात अनुत्तीर्ण झालो. मी खेळणे सुरूच ठेवले. त्याचा परिणाम आज तुमच्यापुढे आहे. खेळात एकाग्रता असणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय भाग्यदेखील तुमच्यासोबत असायला हवे.’’गोपीचंद हे २००१मध्ये आॅल इंग्लंड चॅम्पियन बनलेले प्रकाश पादुकोण यांच्यानंतर दुसरे भारतीय खेळाडू आहेत. गोपीचंद यांनी नंतर निवृत्ती घेऊन अकादमी स्थापण्याचा निर्णय घेतला. अकादमी सुरू करण्याचा मार्ग सोपा नव्हता, असे सांगून गोपी म्हणाले, ‘‘काही वर्षांआधी मी सार्वजनिक क्षेत्रातील एका कंपनीकडे मदतीचा हात मागितला होता. मला सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० असे तीन दिवस ताटकळत ठेवण्यात आले होते. तीन दिवसांनंतर कंपनीचा एक मोठा अधिकारी माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘बॅडमिंटनमध्ये वैश्विक खेळ बनण्याची मुळीच क्षमता नाही.’ प्रायोजकपद मागण्यासाठी कुणाकडे जाण्याची ती अंतिम वेळ होती. त्याच दिवशी मी आई-वडील तसेच पत्नीशी सल्लामसलत केली. आम्ही आमचे राहते घर गहाण ठेवले आणि नंतर अकादमीला मूर्त स्वरूप दिले.’’हैदराबादमध्ये अकादमी स्थापन केल्याच्या १२ वर्षांत गोपीचंद यांनी देशाला आॅलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून दिली आहेत. याबाबत ते म्हणाले, ‘‘मी २५ युवा मुलांसोबत २००४मध्ये अकादमीची मुहूर्तमेढ रोवली. सिंधू ही त्या वेळी ८ वर्षांची, अर्थात सर्वांत कमी वयाची खेळाडू होती. १५ वर्षांचा कश्यप सर्वांत मोठा खेळाडू होता. भारत एक दिवस आॅलिम्पिकचा मानकरी ठरावा, हेच स्वप्न उराशी होते. २०१२मध्येच माझी स्वप्नपूर्ती होईल, असे मात्र वाटले नव्हते.’’ हास्यविनोदात रमलेले गोपीचंद पुढे म्हणाले, ‘‘माझ्या मते, आता मला निवृत्त व्हायला हवे, कारण माझे सर्वच लक्ष्य पूर्ण झाले आहे.’’काही लोकांनी आपल्यासोबत फारच असभ्य वर्तन केल्याची खंत व्यक्त करून ते म्हणाले, ‘‘पण, त्याही वेळी जे पाठीशी उभे राहिले, त्यांचा मी आभारी आहे.’’ (वृत्तसंस्था)०००