शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

‘आयआयटी अनुत्तीर्ण झाल्याने खेळाडू बनलो’

By admin | Updated: September 1, 2016 04:51 IST

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या स्टार बॅडमिंटनपटूंच्या यशात मोलाचा वाटा असणारे मार्गदर्शक आणि भारतीय संघाचे राष्ट्रीय कोच पुल्लेला गोपीचंद कारकिर्दीत यशस्वी खेळाडूदेखील होते.

नवी दिल्ली : सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या स्टार बॅडमिंटनपटूंच्या यशात मोलाचा वाटा असणारे मार्गदर्शक आणि भारतीय संघाचे राष्ट्रीय कोच पुल्लेला गोपीचंद कारकिर्दीत यशस्वी खेळाडूदेखील होते. आयआयटी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचा यशस्वी खेळाडू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता, हे गुपित खुद्द गोपीचंद यांनीच आज चाहत्यांपुढे उघड केले. क्रीडा विषयावरील चर्चेत सहभागी झालेले गोपीचंद म्हणाले, ‘‘मी आणि माझा भाऊ खेळात सहभागी व्हायचो. तो खेळात निपुण होता. मी अभ्यासात चांगला नाही, याचे मलादेखील चांगले वाटत होते. माझा भाऊ राज्य चॅम्पियन होता. त्याने आयआयटी परीक्षा दिली आणि उत्तीर्णदेखील झाला. आयआयटीला शिकायला गेल्यामुळे त्याला खेळ सोडावा लागला. मी इंजिनिअरिंगची परीक्षा दिली व त्यात अनुत्तीर्ण झालो. मी खेळणे सुरूच ठेवले. त्याचा परिणाम आज तुमच्यापुढे आहे. खेळात एकाग्रता असणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय भाग्यदेखील तुमच्यासोबत असायला हवे.’’गोपीचंद हे २००१मध्ये आॅल इंग्लंड चॅम्पियन बनलेले प्रकाश पादुकोण यांच्यानंतर दुसरे भारतीय खेळाडू आहेत. गोपीचंद यांनी नंतर निवृत्ती घेऊन अकादमी स्थापण्याचा निर्णय घेतला. अकादमी सुरू करण्याचा मार्ग सोपा नव्हता, असे सांगून गोपी म्हणाले, ‘‘काही वर्षांआधी मी सार्वजनिक क्षेत्रातील एका कंपनीकडे मदतीचा हात मागितला होता. मला सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० असे तीन दिवस ताटकळत ठेवण्यात आले होते. तीन दिवसांनंतर कंपनीचा एक मोठा अधिकारी माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘बॅडमिंटनमध्ये वैश्विक खेळ बनण्याची मुळीच क्षमता नाही.’ प्रायोजकपद मागण्यासाठी कुणाकडे जाण्याची ती अंतिम वेळ होती. त्याच दिवशी मी आई-वडील तसेच पत्नीशी सल्लामसलत केली. आम्ही आमचे राहते घर गहाण ठेवले आणि नंतर अकादमीला मूर्त स्वरूप दिले.’’हैदराबादमध्ये अकादमी स्थापन केल्याच्या १२ वर्षांत गोपीचंद यांनी देशाला आॅलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून दिली आहेत. याबाबत ते म्हणाले, ‘‘मी २५ युवा मुलांसोबत २००४मध्ये अकादमीची मुहूर्तमेढ रोवली. सिंधू ही त्या वेळी ८ वर्षांची, अर्थात सर्वांत कमी वयाची खेळाडू होती. १५ वर्षांचा कश्यप सर्वांत मोठा खेळाडू होता. भारत एक दिवस आॅलिम्पिकचा मानकरी ठरावा, हेच स्वप्न उराशी होते. २०१२मध्येच माझी स्वप्नपूर्ती होईल, असे मात्र वाटले नव्हते.’’ हास्यविनोदात रमलेले गोपीचंद पुढे म्हणाले, ‘‘माझ्या मते, आता मला निवृत्त व्हायला हवे, कारण माझे सर्वच लक्ष्य पूर्ण झाले आहे.’’काही लोकांनी आपल्यासोबत फारच असभ्य वर्तन केल्याची खंत व्यक्त करून ते म्हणाले, ‘‘पण, त्याही वेळी जे पाठीशी उभे राहिले, त्यांचा मी आभारी आहे.’’ (वृत्तसंस्था)०००