शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : श्रीलंकेला गृहीत धरणे नडले

By admin | Updated: June 9, 2017 15:43 IST

440 व्होल्टचा करंट लागणे म्हणजे नेमके काय, याचा प्रत्यय भारतीय क्रिकेटप्रेमींना काल ओव्हलवर आला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीलाच पाकिस्तानला गारद केल्यावर

- बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
 
440 व्होल्टचा करंट लागणे म्हणजे नेमके काय, याचा प्रत्यय भारतीय क्रिकेटप्रेमींना काल ओव्हलवर आला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीलाच पाकिस्तानला गारद केल्यावर थेट 18 तारखेच्या अंतिम लढतीच्या स्वप्नात हरवलेला भारतीय संघ आणि त्याच्या पाठिराख्यांना मॅथ्युज आणि टीमने जबरदस्त शॉक दिला. त्याची तीव्रता एवढी होती की ओव्हलपासून थेट भारतात घरात बसून सामना पाहत असलेल्या प्रत्येकालाच काही काळ बधीर झाल्यासारखे वाटले.
खरंतर परंपरेप्रमाणे पाकिस्तानला चोपल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध आपला विजय आपण गृहीत धरला. पण हीच बाब आपल्याला नडली. श्रीलंकेचा संघ बऱ्यापैकी नवखा असला तरी तो दुबळा नाही, याचे भान ठेवले पाहिजे होते. पण तसे झाले नाही. श्रीलंकेसाठी किती धावा पुरेशा ठरतील, याबाबतही भारतीय संघव्यवस्थापन गोंळल्यासारखे वाटले. रोहित शर्मा आणि शिखर धवनची सलग दुसऱ्या सामन्यातील दमदार सलामी आणि अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि केदार जाधव यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर आपण तीनशे पार मजल मारली. पण धावफलकावर सव्वातीनशेच्या आसपास धावा लागल्यावर भारतीय संघ काहीसा निश्चिंत झाला. श्रीलंका या आव्हानाच्या आसपासही पोहोचू शकत नाही, असा त्यांचा समज झाला.
श्रीलंकन फलंदाजीचा एकंदरीत वकूब पाहता त्यात काही गैर नव्हते. पण मैदानात घडले ते भलतेच. कडकडीत ऊन पडल्याने खेळपट्टीकडून मदत मिळेनाशी झाली. चेंडू सरळ  बॅटवर येऊ लागल्याने भारताचा मध्यमगती मारा निष्प्रभ ठरला. तर फिरकीची मदार असलेल्या सर जडेजानेही हात टेकले.
अशा अनुकूल परिस्थितीत श्रीलंकेच्या गुणतिलका, मेंडिस, परेरा, गुणरत्ने आदी रत्नांनी भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा उघड करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे विकेट घेणे दुरची बात साध्या धावा रोखणेही आपल्याला शक्य झाले नाही. अखेर कुठल्याशा बनियनच्या जाहिरातीत सैफ अली खान धावण्याची शर्यत "बडे आरामसे" पूर्ण करतो, तसे श्रीलंकन संघाने 322 धावांचे लक्ष्य अगदी आरामात गाठले.
आता ब गटात चारही संघांचे प्रत्येकी दोन गुण झाल्याने चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे या गटातील पुढच्या दोन लढती जो जिता वही सिकंदर ठरणार आहेत. त्यात रविवारी होणाऱ्या लढतीत विराट कोहलीच्या भारतीय संघाला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.