शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : श्रीलंकेला गृहीत धरणे नडले

By admin | Updated: June 9, 2017 15:43 IST

440 व्होल्टचा करंट लागणे म्हणजे नेमके काय, याचा प्रत्यय भारतीय क्रिकेटप्रेमींना काल ओव्हलवर आला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीलाच पाकिस्तानला गारद केल्यावर

- बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
 
440 व्होल्टचा करंट लागणे म्हणजे नेमके काय, याचा प्रत्यय भारतीय क्रिकेटप्रेमींना काल ओव्हलवर आला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीलाच पाकिस्तानला गारद केल्यावर थेट 18 तारखेच्या अंतिम लढतीच्या स्वप्नात हरवलेला भारतीय संघ आणि त्याच्या पाठिराख्यांना मॅथ्युज आणि टीमने जबरदस्त शॉक दिला. त्याची तीव्रता एवढी होती की ओव्हलपासून थेट भारतात घरात बसून सामना पाहत असलेल्या प्रत्येकालाच काही काळ बधीर झाल्यासारखे वाटले.
खरंतर परंपरेप्रमाणे पाकिस्तानला चोपल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध आपला विजय आपण गृहीत धरला. पण हीच बाब आपल्याला नडली. श्रीलंकेचा संघ बऱ्यापैकी नवखा असला तरी तो दुबळा नाही, याचे भान ठेवले पाहिजे होते. पण तसे झाले नाही. श्रीलंकेसाठी किती धावा पुरेशा ठरतील, याबाबतही भारतीय संघव्यवस्थापन गोंळल्यासारखे वाटले. रोहित शर्मा आणि शिखर धवनची सलग दुसऱ्या सामन्यातील दमदार सलामी आणि अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि केदार जाधव यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर आपण तीनशे पार मजल मारली. पण धावफलकावर सव्वातीनशेच्या आसपास धावा लागल्यावर भारतीय संघ काहीसा निश्चिंत झाला. श्रीलंका या आव्हानाच्या आसपासही पोहोचू शकत नाही, असा त्यांचा समज झाला.
श्रीलंकन फलंदाजीचा एकंदरीत वकूब पाहता त्यात काही गैर नव्हते. पण मैदानात घडले ते भलतेच. कडकडीत ऊन पडल्याने खेळपट्टीकडून मदत मिळेनाशी झाली. चेंडू सरळ  बॅटवर येऊ लागल्याने भारताचा मध्यमगती मारा निष्प्रभ ठरला. तर फिरकीची मदार असलेल्या सर जडेजानेही हात टेकले.
अशा अनुकूल परिस्थितीत श्रीलंकेच्या गुणतिलका, मेंडिस, परेरा, गुणरत्ने आदी रत्नांनी भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा उघड करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे विकेट घेणे दुरची बात साध्या धावा रोखणेही आपल्याला शक्य झाले नाही. अखेर कुठल्याशा बनियनच्या जाहिरातीत सैफ अली खान धावण्याची शर्यत "बडे आरामसे" पूर्ण करतो, तसे श्रीलंकन संघाने 322 धावांचे लक्ष्य अगदी आरामात गाठले.
आता ब गटात चारही संघांचे प्रत्येकी दोन गुण झाल्याने चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे या गटातील पुढच्या दोन लढती जो जिता वही सिकंदर ठरणार आहेत. त्यात रविवारी होणाऱ्या लढतीत विराट कोहलीच्या भारतीय संघाला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.