शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

बॉक्सर्सच्या पराभवासाठी मी जबाबदार : कोच संधू

By admin | Updated: August 28, 2016 05:20 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्स पदक जिंकण्यात अपयशी ठरले. या अपयशाची नैतिक जबाबदारी राष्ट्रीय कोच गुरुबक्षसिंग संधू यांनी स्वीकारली आहे.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्स पदक जिंकण्यात अपयशी ठरले. या अपयशाची नैतिक जबाबदारी राष्ट्रीय कोच गुरुबक्षसिंग संधू यांनी स्वीकारली आहे. एकेकाळी वेगवान प्रगती साधत असलेली भारतीय बॉक्सिंग संघटना गेल्या चार वर्षांत राजकारणात अडकताच निर्माण झालेला प्रशासकीय गलथानपणादेखील या पराभवास जबाबदार असल्याचे संधू म्हणाले. जे झाले त्याचे मला दु:ख आहे. पण, सध्याच्या परिस्थितीत तिन्ही बॉक्सर्सनी बजावलेली कामगिरी समाधानकारक होती, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांना कठीण ड्रॉ मिळाला. परिस्थिती नियंत्रणात आहे असे वाटत होते, पण चार वर्षांत काहीही काम झाले नाही. बीजिंगमध्ये विजेंदरने, तर लंडनमध्ये मेरिकोमने कांस्य जिंकले. यंदाही भारताला पदक मिळेल अशी आशा होती, पण पात्रता गाठणारे तिन्ही बॉक्सर अपयशी ठरले. यासंदर्भात संधू म्हणाले, ‘माझे सर्व बॉक्सर पदक विजेत्यांविरुद्ध पराभूत झाले. मी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नाही, पण आम्हाला सत्यस्थिती समजावी लागेल. आमचा ‘ड्रॉ’देखील कठीण होता.’शिवा थापा (५६ किलो) हा क्यूबा रोबेसी रमिरेझकडून पराभूत झाला. रमिरेझ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. ६४ किलो गटात मनोज कुमार हा सुवर्णविजेता उझबेकिस्तानचा फझलीउद्दीन गेइबनाझारोव्ह याच्याकडून पराभूत झाला. विकास कृष्णन्ला रौप्य विजेता मेलिकूझेव्ह याने नमविले होते. आमच्या खेळाडूंना सध्याच्या तुलनेत यापूर्वी कधीही चांगल्या सोई मिळाल्या नव्हत्या. साईच्या महासंचालकांकडूनही सर्व सोई उपलब्ध होऊ शकल्या. पण, बॉक्सिंग महासंघाच्या निलंबनामुळे आमच्या खेळाडूंना कझाखस्तान, उझबेकिस्तान किंवा क्युबामध्ये सरावाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नव्हत्या. या देशांमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी देखील आमच्या खेळाडूंना बोलविण्यात आले नव्हते. यासाठीच भक्कम महासंघाची गरज आहे. महासंघ तयार करून भारताला विश्व बॉक्सिंग सीरिजमध्ये स्थान मिळवून घ्यावे लागेल. जे खेळाडू सीरिज आणि लीग खेळत राहतात त्यांचेच आॅलिम्पिक बॉक्सिंगवर वर्चस्व राहिले हे विशेष. आमच्या बॉक्सरपुढील आव्हान समजून घ्या. बॉक्सिंगच्या प्रगतीसाठी अहंकार सोडून एकत्र आले पाहिजे. भक्कम राष्ट्रीय महासंघाअभावी आम्ही सर्वजण अनाथ आहोत, ही आमची कळकळ समजून घ्या. पाया मजबूत असल्याशिवाय काहीच होणार नाही. महासंघ नसेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचे कुणी ऐकणार नाही. तांत्रिक प्रतिनिधित्व देखील मिळणार नाही. आमच्या खेळाडूंना सरावाच्या सर्व सुविधा मिळाल्या पण प्रतिस्पर्धा करण्यासाठी विदेशी अनुभव मात्र मिळू शकला नव्हता.