शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सर्सच्या पराभवासाठी मी जबाबदार - संधू

By admin | Updated: August 27, 2016 17:58 IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्स पदक जिंकण्यात अपयशी ठरले. या अपयशाची नैतिक जबाबदारी राष्ट्रीय कोच गुरुबक्षसिंग संधू यांनी स्वीकारली आहे

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्स पदक जिंकण्यात अपयशी ठरले. या अपयशाची नैतिक जबाबदारी राष्ट्रीय कोच गुरुबक्षसिंग संधू यांनी स्वीकारली आहे.
 
एकेकाळी वेगवान प्रगती साधत असलेली भारतीय बॉक्सिंग संघटना गेल्या चार वर्षांत राजकारणात अडकताच निर्माण झालेला प्रशासकीय गलथानपणा देखील या पराभवास जबाबदार असल्याचे संधू म्हणाले. जे झाले त्याचे मला दु:ख आहे. पण सध्याच्या परिस्थितीत तिन्ही बॉक्सर्सनी बजावलेली कामगिरी समाधानकारक होती, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांना कठीण ड्रॉ मिळाला. परिस्थिती नियंत्रणात आहे असे वाटत होते पण गेल्या चार वर्षांत काहीही काम झाले नाही.
 
बीजिंगमध्ये विजेंदरने तर लंडनमध्ये मेरिकोमने कांस्य जिंकले. यंदाही भारताला पदक मिळेल अशी आशा होती पण पात्रता गाठणारे तिन्ही बॉक्सर अपयशी ठरले. यासंदर्भात संधू म्हणाले,‘माझे सर्व बॉक्सर पदक विजेत्यांविरुद्ध पराभूत झाले. मी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नाही पण आम्हाला सत्यस्थिती समजावी लागेल. आमचा ‘ड्रॉ’ देखील कठीण होता.’ शिवा थापा (५६ किलो) हा क्यूबा रोबेसी रमिरेझकडून पराभूत झाला. रमिरेझ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. ६४ किलो गटात मनोज कुमार हा सुवर्ण विजेता उझबेकिस्तानचा फझलीउद्दीन गेइबनाझारोव्ह याच्याकडून पराभूत झाला. विकास कृष्णन्ला रौप्य विजेता मेलिकूझेव्ह याने नमविले होते. 
 
संधू पुढे म्हणाले,‘आमच्या बॉक्सरपुढील आव्हान असमूज घ्या. बॉक्सिंगच्या प्रगतीसाठी अहंकार सोडून एकत्र आले पाहिजे. भक्कम राष्ट्रीय महासंघाअभावी आम्ही सर्वजण अनाथ आहोत, ही आमची कळकळ समजून घ्या. पाया मजबूत असल्याशिवाय काहीच होणार नाही. महासंघ नसेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचे कुणी ऐकणार नाही. तांत्रिक प्रतिनिधित्व देखील मिळणार नाही. आमच्या खेळाडूंना सरावाच्या सर्व सुविधा मिळाल्या पण प्रतिस्पर्धा करण्यासाठी विदेशी अनुभव मात्र मिळू शकला नव्हता.’
 
आमच्या खेळाडूंना सध्याच्या तुलनेत यापूर्वी कधीही चांगल्या सोई मिळाल्या नव्हत्या. साईच्या  हासंचालकांकडूनही सर्व सोई उपलब्ध होऊ शकल्या. पण बॉक्सिंग महासंघाच्या निलंबनामुळे आमच्या खेळाडूंना कझाखस्तान, उझबेकिस्तान किंवा क्युबामध्ये सरावाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नव्हत्या. या देशांमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी देखील आमच्या खेळाडूंना बोलविण्यात आले नव्हते. यासाठीच भक्कम महासंघाची गरज आहे. महासंघ तयार करून भारताला विश्व बॉक्सिंग सिरिजमध्ये स्थान मिळवून घ्यावे लागेल. जे खेळाडू सिरिज आणि आंतरराष्ट्रीय लीग खेळत राहतात त्यांचेच ऑलिम्पिक
बॉक्सिंगवर वर्चस्व राहिले हे विशेष.