शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
3
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
4
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
5
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
6
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
7
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
8
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
9
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
10
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
11
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
12
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
13
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
14
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
15
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
16
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
17
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
18
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
19
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
20
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

बॉक्सर्सच्या पराभवासाठी मी जबाबदार - संधू

By admin | Updated: August 27, 2016 17:58 IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्स पदक जिंकण्यात अपयशी ठरले. या अपयशाची नैतिक जबाबदारी राष्ट्रीय कोच गुरुबक्षसिंग संधू यांनी स्वीकारली आहे

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्स पदक जिंकण्यात अपयशी ठरले. या अपयशाची नैतिक जबाबदारी राष्ट्रीय कोच गुरुबक्षसिंग संधू यांनी स्वीकारली आहे.
 
एकेकाळी वेगवान प्रगती साधत असलेली भारतीय बॉक्सिंग संघटना गेल्या चार वर्षांत राजकारणात अडकताच निर्माण झालेला प्रशासकीय गलथानपणा देखील या पराभवास जबाबदार असल्याचे संधू म्हणाले. जे झाले त्याचे मला दु:ख आहे. पण सध्याच्या परिस्थितीत तिन्ही बॉक्सर्सनी बजावलेली कामगिरी समाधानकारक होती, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांना कठीण ड्रॉ मिळाला. परिस्थिती नियंत्रणात आहे असे वाटत होते पण गेल्या चार वर्षांत काहीही काम झाले नाही.
 
बीजिंगमध्ये विजेंदरने तर लंडनमध्ये मेरिकोमने कांस्य जिंकले. यंदाही भारताला पदक मिळेल अशी आशा होती पण पात्रता गाठणारे तिन्ही बॉक्सर अपयशी ठरले. यासंदर्भात संधू म्हणाले,‘माझे सर्व बॉक्सर पदक विजेत्यांविरुद्ध पराभूत झाले. मी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नाही पण आम्हाला सत्यस्थिती समजावी लागेल. आमचा ‘ड्रॉ’ देखील कठीण होता.’ शिवा थापा (५६ किलो) हा क्यूबा रोबेसी रमिरेझकडून पराभूत झाला. रमिरेझ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. ६४ किलो गटात मनोज कुमार हा सुवर्ण विजेता उझबेकिस्तानचा फझलीउद्दीन गेइबनाझारोव्ह याच्याकडून पराभूत झाला. विकास कृष्णन्ला रौप्य विजेता मेलिकूझेव्ह याने नमविले होते. 
 
संधू पुढे म्हणाले,‘आमच्या बॉक्सरपुढील आव्हान असमूज घ्या. बॉक्सिंगच्या प्रगतीसाठी अहंकार सोडून एकत्र आले पाहिजे. भक्कम राष्ट्रीय महासंघाअभावी आम्ही सर्वजण अनाथ आहोत, ही आमची कळकळ समजून घ्या. पाया मजबूत असल्याशिवाय काहीच होणार नाही. महासंघ नसेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचे कुणी ऐकणार नाही. तांत्रिक प्रतिनिधित्व देखील मिळणार नाही. आमच्या खेळाडूंना सरावाच्या सर्व सुविधा मिळाल्या पण प्रतिस्पर्धा करण्यासाठी विदेशी अनुभव मात्र मिळू शकला नव्हता.’
 
आमच्या खेळाडूंना सध्याच्या तुलनेत यापूर्वी कधीही चांगल्या सोई मिळाल्या नव्हत्या. साईच्या  हासंचालकांकडूनही सर्व सोई उपलब्ध होऊ शकल्या. पण बॉक्सिंग महासंघाच्या निलंबनामुळे आमच्या खेळाडूंना कझाखस्तान, उझबेकिस्तान किंवा क्युबामध्ये सरावाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नव्हत्या. या देशांमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी देखील आमच्या खेळाडूंना बोलविण्यात आले नव्हते. यासाठीच भक्कम महासंघाची गरज आहे. महासंघ तयार करून भारताला विश्व बॉक्सिंग सिरिजमध्ये स्थान मिळवून घ्यावे लागेल. जे खेळाडू सिरिज आणि आंतरराष्ट्रीय लीग खेळत राहतात त्यांचेच ऑलिम्पिक
बॉक्सिंगवर वर्चस्व राहिले हे विशेष.