शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

लेखी हमी द्या, तरच संघ भारतात येणार

By admin | Updated: March 11, 2016 03:49 IST

विश्वकप टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारत सरकारकडून जोपर्यंत सुरक्षेबाबत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तान संघ भारतात दाखल होणार नाही, असे पाकिस्तान सरकारने सांगितले.

लाहोर : विश्वकप टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारत सरकारकडून जोपर्यंत सुरक्षेबाबत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तान संघ भारतात दाखल होणार नाही, असे पाकिस्तान सरकारने सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून लाहोरमध्ये पाक संघ प्रतीक्षा करीत आहे.पाकिस्तानच्या एका वृत्त वाहिनीच्या हवाल्यानुसार राष्ट्रीय संघ शुक्रवारी भारताकडे प्रयाण करण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डातर्फे (पीसीबी) आपल्या संघाला आयसीसी स्पर्धेसाठी भारतात जाण्यास मंजुरी मिळू शकते. दरम्यान, पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितले, की पाक सरकारने क्रिकेट संघाला भारतात जाण्यास अद्याप परवानगी दिली नाही, कारण भारत सरकारतर्फे त्यांना सुरक्षेबाबत कुठलेही आश्वासन मिळालेले नाही. पीसीबीने संघाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने धरमशाला येथे १९ मार्च रोजी होणारा सामना कोलकातातील ईडन गार्डनवर स्थानांतरितणाचा निर्णय घेतला. > आश्वासन मिळाले नाही तर संघ जाणार नाही : निसारलाहोर : पाकिस्तान संघ टी-२० विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अद्याप भारतात दाखल झालेला नाही. पाक संघ अद्याप त्यांच्या सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे. त्यात पाकिस्तानचे मंत्री चौधरी निसार अली खान यांनी धमकीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट कसे खेळता येईल, असे भडकवणारे वक्तव्य केले आहे. चौधरी निसार अली म्हणाले, धमकी मिळत असताना क्रिकेट कसे खेळता येईल. त्यामुळे यापूर्वी सुरू असलेल्या वादात आणखी तेल ओतले गेले. आयसीसीने पाकिस्तान संघाच्या सुरक्षेच्या चिंतेची दखल घेताना पूर्वघोषित कार्यक्रमानुसार १९ मार्च रोजी धरमशाला येथे खेळला जाणारा सामना कोलकाता येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला, पण पीसीबीला भारताकडून पूर्ण सुरक्षेची हमी पाहिजे आहे. चौधरी निसार अली म्हणाले, ‘धमकी केवळ पाकिस्तानबाबत आहेत. दहशतीच्या सावटात संघ सर्वोत्तम कामगिरी कशी करणार? भारत सरकारने संघाला फुलप्रूफ सुरक्षेची हमी द्यायला हवी. जर आम्हाला तसे आश्वासन मिळाले नाही तर पाक संघ भारतात जाणार नाही.’पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान म्हणाले, अन्य संघांना विरोध होत नाही आणि त्यांना लक्ष्यही केले जात नाही, पण पाकिस्तानबाबत वेगळी भूमिका आहे. त्यामुळे भारत सरकारकडून पूर्ण सुरक्षेच्या आश्वासनाची प्रतीक्षा आहे.’ >> निर्णय पाकच्या हातात : ठाकूरनवी दिल्ली : बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूरने गुरुवारी रात्री टी-२० विश्वचषक खेळण्याचा निर्णय आता पाकिस्तानच्या हाती असल्याचे वक्तव्य बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी केले आहे. ठाकूर म्हणाले, की भारत विश्वचषकच्या सर्व संघांना संपूर्ण सुरक्षा देईल. मात्र आता पाकिस्तानला निर्णय घ्यायचा आहे, की त्यांना भारतात यायचे आहे की नाही. ठाकूर म्हणाले, की पाकिस्तान बहाणा करत आहे. मात्र भारत सर्व संघांना संपूर्ण सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. बीसीसीआयचे सचिव म्हणाले, की आम्ही प्रत्येक देशाला आम्ही वेगवेगळा ग्रीन सिग्नल देऊ शकत नाही. तरी आमच्याकडून पूर्ण ग्रीन सिग्नल आहे. पाकिस्तानने भारतात खेळण्यासाठी यावे, असेही ते म्हणाले.