शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

क्रिकेट महाकुंभाला शानदार सुरुवात

By admin | Updated: February 13, 2015 06:33 IST

कर्णमधुर संगीताच्या स्वरलहरी..., नयनरम्य लाईट शो..., लोकनृत्याची मेजवानी; तसेच आसमंतात चकाकी आणणा-या भव्य आतषबाजीच्या साक्षीने शनिवारपासून

ख्राईस्टचर्च : कर्णमधुर संगीताच्या स्वरलहरी..., नयनरम्य लाईट शो..., लोकनृत्याची मेजवानी; तसेच आसमंतात चकाकी आणणा-या भव्य आतषबाजीच्या साक्षीने शनिवारपासून (दि. १४) सुरू होत असलेल्या क्रिकेट विश्वचषकाचे गुरुवारी शानदार समारंभात भव्य उद्घाटन पार पडले. १४ संघांदरम्यान दीड महिना रंगणाऱ्या क्रिकेटच्या या महाकुंभाची सुरुवात न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील हेग्ले पार्क आणि मेलबोर्नच्या मायर म्युझिक बाऊल येथे एकाचवेळी झाली. तीन तास रंगलेल्या या सोहळ्याला महान खेळाडूंसह हजारो क्रिकेटशौकिनांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘बॅगपायपर’ची धून वाजविण्यात आली; तर आतषबाजीने सोहळा संपविण्यात आला. ‘माओरी वॉरियर्स’ तसेच ‘मॉरिस डान्सर्स’ या पथकांचे नृत्य सोहळ्याचे आकर्षण ठरले.आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्या संयुक्तविद्यमाने २३ वर्षांनंतर विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये या शहराने भूकंपाचे भीषण धक्के अनुभवले होते. त्यात १८५ लोकांना प्राण गमवावे लागले. त्या दुर्दैवी घटनेचे साक्षीदार असलेल्या अनेक आठवणी आजही शिल्लक आहेत. कधीकाळी या ठिकाणी गगनचुंबी इमारती होत्या. आज ओसाड मैदाने आहेत; पण ख्राईस्टचर्चच्या लोकांचे क्रिकेटप्रती असलेले प्रेम तसूभरही कमी झाले नसल्याचा पुरावा देणारा हा सोहळा होता.शहराचे महापौर लीने डॅलझिएल म्हणाले, ‘‘भूकंप झाला त्या वेळी हे शहर २०११ च्या रग्बी विश्वचषकाची तयारी करीत होते. भूकंपामुळे हॉटेल आणि आयोजनस्थळांना फटका बसला. सामन्यांचे आयोजन अन्य स्थळी हलविणे भाग पडले होते. पुन्हा एकदा परत आलो आहोत.’’न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन यांनी स्पर्धा सुरू झाल्याची औपचारिक घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘भूकंपाने ख्राईस्टचर्चकडून रग्बी विश्वचषकाच्या आयोजनाची संधी हिरावून घेतली होती. क्रिकेट विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्याने ही उणीव भरून काढली आहे. या सोहळ्याद्वारे ख्राईस्टचर्च पुन्हा उभे झाले असल्याचा संदेश देण्याची वेळ आली आहे.’’न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यात शनिवारी उद्घाटनाचा सामना हेग्ले ओव्हलवर खेळला जाईल. त्याच दिवशी मेलबोर्न येथे आॅस्ट्रेलिया-इंग्लंड हा दुसरा सामना होईल. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांच्या हस्ते विश्वचषकाचे अनावरण करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यासह क्रिकेटशौकिनांचा उत्साह, सहभागी राष्ट्रांच्या संस्कृतीचा उत्सव आणि ख्राईस्टचर्चच्या लोकांची संकटाकडून सौहार्दाकडे वाटचाल सुरू झाली आहे. (वृत्तसंस्था)