शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

चौथ्या कसोटीत सकारात्मकतेने खेळू

By admin | Updated: August 15, 2016 04:16 IST

१८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अधिक सकारात्मकपणे विचाराने मैदानात उतरु,’’ असा विश्वास भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला.

ग्रोस इसलेट : ‘‘तिसरा कसोटी सामना जिंकून खूप आनंदी आहे. कारण या सामन्यातील एक दिवस पावसामुळे वाया गेला होता. आता १८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अधिक सकारात्मकपणे विचाराने मैदानात उतरु,’’ असा विश्वास भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला.‘‘पावसामुळे तिसरा दिवस वाया गेल्यानंतर पाचवा दिवस खेळणे खूप कठीण होते. येथे आम्ही अपेक्षित खेळ करण्यात अपयशी ठरलो. येथेही आम्ही दोन दिवस चांगला खेळ केला. त्यानंतर तिसरा दिवस पावसामुळे वाहून गेला. पण, चौथ्या दिवशी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली,’’ असे कोहलीने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘भुवनेश्वरची कामगिरी शानदार होती. २४ षटकात २८ धावा देऊन ५ बळी घेणे जबरदस्त कामगिरी होती. यामुळे सामन्याचे चित्र पालटले. त्याचवेळी पहिल्या डावात अश्विन व साहा यांची शतके विसरता येणार नाही. त्यांनी निर्णायक कामगिरी केली.’’‘‘ठरवलेल्या रणनितीनुसार खेळ करुन आम्ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलो. आता त्रिनिदादमध्ये होणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यात सकारात्मक विचाराने मैदानात उतरु. शिवाय कोणत्या बाजूंवर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे याची आम्हाला जाणीव आहे,’’ असेही कोहलीने यावेळी सांगितले. (वृतसंस्था)>आॅलिम्पियन्सचे समर्थनटीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्त्व करीत असलेल्या भारतीय खेळाडूंचे समर्थन करताना इतर देशांच्या तुलनेत आपल्या खेळाडूंना उच्च दर्जांच्या सुविधा मिळत नसतानाही देशाचे खेळाडू जीव तोडून खेळत असल्याचे सांगितले. कोहली म्हणाला की, ‘‘खेळाडूंवर कठोर शब्दांत टीका केली जाऊ नये.’’ कोहली म्हणाला, ‘‘आॅलिम्पिकसाठी खेळाडू कशाप्रकारे तयारी करीत असतात हे आपण पाहिले आहे. ते जीव तोडून यासाठी सज्ज होत असतात आणि जेव्हा काही लोक या बाजूकडे दुर्लक्ष करुन सरळ टीका करतात तेव्हा माझ्यामते ही अत्यंत दु:खद बाब आहे. क्रिकेटमध्येही तुम्ही प्रत्येक सामना किंवा मालिका जिंकू शकत नाही.’’>जमैका येथे झालेल्या कसोटी सामन्यात आम्ही कोणत्या चुका केल्या, याची जाणीव आम्हाला होती. तिसऱ्या सामन्यात त्याच चुका आम्ही सुधारल्या. चौथ्या दिवशी आम्ही ३१ धावांत ७ बळी घेतले. हीच कामगिरी सामना जिंकण्यास निर्णायक ठरली. आम्हाला परदेशामध्ये अधिकाधिक सामने जिंकायचे असून त्याकडे आमची वाटचाल सुरु झाली आहे.- विराट कोहली