शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
2
ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
3
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
4
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
5
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
6
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
7
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
8
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
9
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
10
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
11
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
12
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
13
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
14
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
15
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
16
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
17
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
18
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
19
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
20
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण

चौथ्या कसोटीत सकारात्मकतेने खेळू

By admin | Updated: August 15, 2016 04:16 IST

१८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अधिक सकारात्मकपणे विचाराने मैदानात उतरु,’’ असा विश्वास भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला.

ग्रोस इसलेट : ‘‘तिसरा कसोटी सामना जिंकून खूप आनंदी आहे. कारण या सामन्यातील एक दिवस पावसामुळे वाया गेला होता. आता १८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अधिक सकारात्मकपणे विचाराने मैदानात उतरु,’’ असा विश्वास भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला.‘‘पावसामुळे तिसरा दिवस वाया गेल्यानंतर पाचवा दिवस खेळणे खूप कठीण होते. येथे आम्ही अपेक्षित खेळ करण्यात अपयशी ठरलो. येथेही आम्ही दोन दिवस चांगला खेळ केला. त्यानंतर तिसरा दिवस पावसामुळे वाहून गेला. पण, चौथ्या दिवशी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली,’’ असे कोहलीने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘भुवनेश्वरची कामगिरी शानदार होती. २४ षटकात २८ धावा देऊन ५ बळी घेणे जबरदस्त कामगिरी होती. यामुळे सामन्याचे चित्र पालटले. त्याचवेळी पहिल्या डावात अश्विन व साहा यांची शतके विसरता येणार नाही. त्यांनी निर्णायक कामगिरी केली.’’‘‘ठरवलेल्या रणनितीनुसार खेळ करुन आम्ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलो. आता त्रिनिदादमध्ये होणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यात सकारात्मक विचाराने मैदानात उतरु. शिवाय कोणत्या बाजूंवर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे याची आम्हाला जाणीव आहे,’’ असेही कोहलीने यावेळी सांगितले. (वृतसंस्था)>आॅलिम्पियन्सचे समर्थनटीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्त्व करीत असलेल्या भारतीय खेळाडूंचे समर्थन करताना इतर देशांच्या तुलनेत आपल्या खेळाडूंना उच्च दर्जांच्या सुविधा मिळत नसतानाही देशाचे खेळाडू जीव तोडून खेळत असल्याचे सांगितले. कोहली म्हणाला की, ‘‘खेळाडूंवर कठोर शब्दांत टीका केली जाऊ नये.’’ कोहली म्हणाला, ‘‘आॅलिम्पिकसाठी खेळाडू कशाप्रकारे तयारी करीत असतात हे आपण पाहिले आहे. ते जीव तोडून यासाठी सज्ज होत असतात आणि जेव्हा काही लोक या बाजूकडे दुर्लक्ष करुन सरळ टीका करतात तेव्हा माझ्यामते ही अत्यंत दु:खद बाब आहे. क्रिकेटमध्येही तुम्ही प्रत्येक सामना किंवा मालिका जिंकू शकत नाही.’’>जमैका येथे झालेल्या कसोटी सामन्यात आम्ही कोणत्या चुका केल्या, याची जाणीव आम्हाला होती. तिसऱ्या सामन्यात त्याच चुका आम्ही सुधारल्या. चौथ्या दिवशी आम्ही ३१ धावांत ७ बळी घेतले. हीच कामगिरी सामना जिंकण्यास निर्णायक ठरली. आम्हाला परदेशामध्ये अधिकाधिक सामने जिंकायचे असून त्याकडे आमची वाटचाल सुरु झाली आहे.- विराट कोहली