शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान सामन्याचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 03:10 IST

विश्वचषक टी-२० क्रिकेटसाठी संघ पाठविण्याआधी भारतातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तान सुरक्षा पथक पाठविणार आहे

फुलप्रूफ सुरक्षेची बीसीसीआयची हमी कराची : पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतात पाक संघाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून विश्वचषक टी-२० क्रिकेटसाठी संघ पाठविण्याआधी भारतातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तान सुरक्षा पथक पाठविणार आहे. या पथकाच्या अहवालानंतरच संघ पाठविण्याचा अंतिम निर्णय होणार असल्याने धर्मशाला येथील भारत-पाक लढतीचे भविष्य अधांतरीच आहे.पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गृहमंत्री चौधरी निसार अली यांना पाकिस्तान संघाला पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतात सुरक्षा पथक पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षेची हमी मिळाल्यानंतरच आम्ही आपला संघ पाठवू शकतो, अशी परिस्थिती आहे. सरकारने आम्हाला विश्वचषक टी-२० मध्ये खेळण्याची आधीच परवानगी दिली आहे पण धर्मशाला येथील भारत-पाक सामन्याच्या आयोजनाबाबत सुरक्षेच्या चिंतेचा अहवाल पंतप्रधानांना सोपविण्यात आला.’पंतप्रधान सचिवालयाने देखील पाकचा विश्व टी-२० तील सहभाग सुरक्षा दलाच्या अहवालावर आलंबून असल्याचे म्हटले आहे. निसार अली यांनी इस्लामाबाद येथे एका बैठकीदरम्यान संपूर्ण माहिती शरीफ यांना दिली. त्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानी संघासाठी नवी दिल्लीतील पाक दूतावासामार्फत आयोजकांकडून फुलप्रूफ सुरक्षा मिळणार असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश दिले. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान संघाच्या दारुण पराभवानंतर देशात जो जनक्षोभ उसळला त्यावरून पराभवावर अहवालदेखील पंतप्रधान कार्यालयाने मागितला आहे. नवी दिल्ली : सुरक्षेच्या कारणांवरून स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी मिळताच बीसीसीआयने टी-२० विश्वचषकादरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाला फुलप्रूफ सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. पीसीबी प्रमुख शहरयारखान यांनी बीसीसीआयकडे लेखी आश्वासन मागितले होते. यावर बीसीसीआयने फुलप्रूफ सुरक्षा पुरविण्यास आम्ही वचनबद्ध आहोत पण आता चेंडू पीसीबीच्या कोर्टात असल्याचे राजीव शुक्ला यांनी सांगितले.८ मार्चपासून सुरू होत असलेल्या विश्वचषकाआधीच भारत-पाक लढतीवरून राजकारण सुरू झाले आहे. यावर शुक्ला म्हणाले, ‘बीसीसीआय’च्यावतीने पाक संघाला फुलप्रूफ सुरक्षा पुरविली जाईल. सुरक्षेची चिंता बाळगण्याचे कारण नाही. त्यांना भारतात खेळायचे आहे किंवा नाही, हे त्यांनीच ठरवावे. पाक संघ आयसीसीप्रती जबाबदार आहे. पाकने खेळायचे किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण स्पर्धा आमच्या देशात असल्याने बीसीसीआय त्यांच्या सुरक्षेची हमी देईल.’पीसीबीने भारत सरकारकडे लेखी हमी देण्याचा आग्रह धरला आहे. याविषयी मत जाणून घेतले असता शुक्ला म्हणाले, ‘आम्ही सरकारला हे सांगू शकत नाही.’ १९ मार्च रोजी धर्मशाला येथे होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर देखील अनिश्चिततेचे ढग आहेत. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिमाचलमधील माजी सैनिकांनी सामना आयोजनास तीव्र विरोध दर्शविला. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी मात्र माझी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी माजी सैनिकांची समजूत काढण्याचे तसेच संपूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले असल्याचे काल म्हटले होते. ठिकाण बदलणे अशक्य राजीव शुक्ला म्हणाले, मी सुद्धा हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.’ सैनिकांनी दर्शविलेल्या विरोधाबाबत विचारताच शुक्ला म्हणाले, ‘आम्ही देखील सैनिकांसोबत आहोत. याच कारणास्तव पाकसोबत द्विपक्षीय चर्चा थांबविली आहे. पण हा विश्वचषक आहे. सामन्याचे स्थळ बदलणे शक्य नसल्याने आयोजक म्हणून अडचणीत आलो आहोत.’अर्धसैनिक दलाचे सुरक्षा कवच : गृहमंत्रीभारत-पाकिस्तान यांच्यात १९ मार्च रोजी धर्मशाला येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात अर्धसैनिक दल तैनात करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिले आहे. सुरक्षेच्या मुद्यावरून या सामन्याच्या आयोजनावर अनिश्चिततेचे सावट कायम आहे. पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले, ‘हिमाचल प्रदेश सरकारला सुरक्षा हवी असेल तर आम्ही अर्धसैनिक दल पुरवू.’