शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पदक पटकावण्यासाठी विदेशात प्रशिक्षण आवश्यक : साक्षी मलिक

By admin | Updated: October 31, 2016 19:08 IST

आॅलिम्पिकमध्ये अधिक पदके पटकावण्यासाठी सुरुवातीपासून तयारी करायला हवी आणि खेळाडूंना विदेशात प्रशिक्षण द्यायला हवे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 31 - आॅलिम्पिकमध्ये अधिक पदके पटकावण्यासाठी सुरुवातीपासून तयारी करायला हवी आणि खेळाडूंना विदेशात प्रशिक्षण द्यायला हवे, असे मत रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेली महिला मल्ल साक्षी मलिकनेव्यक्त केले. साक्षी म्हणाली,‘पीडब्ल्यूएल प्रारंभ होण्यापूर्वी प्रत्येक संघासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन होणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेषत: भारतीय खेळाडूंना आॅलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंकडून शिकण्याची संधी मिळेल. या शिबिराच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंना आपल्या उणिवा दूर करता येतील.’ शिबिर केवळ औपचारिकता पूर्ण करणारे असू नयेत, यावरही साक्षीने विशेष भर दिला.साक्षीने राष्ट्रीय संघातील खेळाडूंना विदेशात खेळण्याचा अनुभव मिळावा, यावर अधिक भर दिला. साक्षी म्हणाली,‘पुढील आॅलिम्पिकची तयारी आतापासून सुरू व्हायला हवी. मल्लांसाठी डॉक्टरांपासून फिजिओपर्यंतच्या सर्व सुविधा मिळायला हव्यात.’ भारतातील महिला कुस्तीच्या स्थितीबाबत साक्षी समाधानी नाही. भारतात हजारो मल्ल सराव करतात पण, पदक केवळ एक मिळाले, असेही सांगताना साक्षी म्हणाली,‘कुस्ती या खेळात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हायला हवे.’ स्वागत समारंभामुळे माझ्या तयारीवर प्रभाव पडला असला तरी पीडब्ल्यूएलमध्ये तयारीसह उतरणार असल्याचे साक्षीने स्पष्ट केले. आगामी आशियाई व विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे सांगताना साक्षीने आॅलिम्पिकमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. विवाहनंतरही मल्लांच्या कुटुंबाची सदस्य होणार असल्याचा अभिमान वाटतअसल्याचे साक्षीने सांगितले. साक्षीचे पती सत्यव्रत कादियान राष्ट्रीय चॅम्पियन असून ९७ किलो वजनगटात आंतरराष्ट्रीय मल्ल आहेत.