शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

ललिता, टिंकू, सुधाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

By admin | Updated: July 14, 2016 02:56 IST

रियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये कोणता खेळाडू पदक जिंकेल, याचा अंदाज आत्ताच बांधणे चुकेची होईल.

बंगळुरू : रियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये कोणता खेळाडू पदक जिंकेल, याचा अंदाज आत्ताच बांधणे चुकेची होईल. परंतु, ललिता बाबर, टिंकू लुका आणि सुधा सिंह या धावपटू त्यांच्या-त्यांच्या क्रीडा प्रकारांत अंतिम फेरीपर्यंत मजल मारतील अशी आशा वाटते, असे भारताची माजी आॅलिम्पियन पी. टी. उषाने वृत्तसंस्थेस सांगितले. ग्रांप्री अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या निमित्ताने उषा बंगळुरू येथे आली असता, तिने वरील व्यक्तव्य केले. भारतीय आॅलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या देशातील अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. त्यामुळे कोणता खेळाडू कशी कामगिरी करील, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. सर्व खेळाडू चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील असणार आहेत. प्रत्येकाचे प्रथम लक्ष्य अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे, हे असणार आहे. पदकांचा अंदाज एवढ्यातच वर्तविणे योग्य नाही. कारण कोणत्या खेळाडूचा खेळ त्या वेळेच कसा होईल, हे त्या दिवशीच कळेल. लांब पल्ल्याच्या धावपटू ललिता बाबर (३ हजार मीटर स्टिपलचेस), सुधा सिंह (३ हजार मीटर स्टिपलचेस) आणि मध्यम पल्ल्याची धावपटू टिंकू लुका (८०० मीटर धावणे) या अंतिम फेरीसाठी पात्र होऊ शकतात. कारण त्यांच्या गटात धावणारे इतर देशांच्या धावपटूंनी त्याच्या पात्रता शर्यतीत दिलेली वेळ आणि आपल्या भारतीय धावपटूंची सध्याची वेळ यात खूप काही अंतर नाही. काही सेकंदांचा फरक आहे. या तिन्ही खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी पदकेसुद्धा जिंकली आहेत. त्यामुळे त्यांना आॅलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव कमी पडेल, असे होणार नाही. त्या चांगली कामगिरी करू शकतात. पुरुष व महिलांचा रिले संघसुद्धा चांगली कामगिरी करू शकतो. त्याच्या एकमेकांमध्ये चांगला समन्वय निर्माण झाला आहे. त्याचा त्यांना खूप फायदा होणार आहे. रंजी महेश्वरीसुद्धा अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्याचबरोबर द्युतीचंदकडून अपेक्षा करता येईल १०० मीटरमध्ये ११.२१ सेकंदांची वेळ नोंदविली, तर ती उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ शकते. तिने आता ११.२६ सेकंदांची वेळ नोंदविली आहे. (वृत्तसंस्था)