शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तिरंदाजीत भारताचे आव्हान संपुष्टात, अतानू दास बाहेर

By admin | Updated: August 12, 2016 19:25 IST

तिरंदाजीमध्ये भारताची अखेरची आशा असलेला अतानू दासला शुक्रवारी कोरियाच्या सियुंगयुन लीविरुद्ध ४-६ ने पराभव स्वीकारावा लागला.

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. 12 - तिरंदाजीमध्ये भारताची अखेरची आशा असलेला अतानू दासला शुक्रवारी कोरियाच्या सियुंगयुन लीविरुद्ध ४-६ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे आॅलिम्पिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले. आॅलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली.माजी विश्व चॅम्पियन लीने उपउपांत्यपूर्व फेरीत अतानूचा ३०-२८, २८-३०, २७-७२, २८-२७ आणि २८-२८ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. २०१३ चा विश्व चॅम्पियन कोरियाच्या लीने दोन सेट्स जिंकले, तर दोन सेट्स टाय झाले. भारतीय तिरंदाजाला केवळ दुसरा सेट जिंकता आला. दीपिका कुमारी, बोंबायला देवी आणि लक्ष्मीराणी मांझी यांच्या पराभवानंतर भारताच्या आशा कोलकाताच्या अतानू दासच्या कामगिरीवर केंद्रित झाल्या होत्या, पण निर्णायक क्षणी केलेल्या चुकांमुळे त्याला पराभव स्वीकारावा लागला. अतानूने पहिला सेट २८-३० ने गमाविला. या सेटमध्ये लीने सलग तीन परफेक्ट टेनची नोंद केली. अतानूने दुसऱ्या सेटमध्ये सलग तीन परफेक्ट टेन मिळवताना ३०-२८ ने सरशी साधली. तिसऱ्या सेटमध्ये लीने अखेरच्या शॉटवर ८ गुण वसूल केले. त्याचा स्कोअर २७ होता. अतानूला ९ गुण वसूल करील सेट जिंकण्याची संधी होती, पण अतानूने ८ गुण मिळवत आघाडी घेण्याची संधी गमावली. तिसरा सेट २७-२७ ने बरबोरीत संपला. उभय खेळाडूंना प्रत्येकी एक गुण मिळाला. चौथ्या सेटमध्ये लीने ९, ९ आणि १० असे गुण नोंदवले तर अतानूला ९, ९ आणि ९ असा स्कोअर करता आला. लीने हा सेट २८-२७ ने जिंकत ५-३ अशी आघाडी घेतली. अतानूला लढत शुटआऊटपर्यंत लांबविण्यासाठी अखेरचा सेट जिंकणे आवश्यक होते. पण, हा सेट २८-२८ ने बरोबरीत संपला आणि कोरियन तिरंदाजाने एक गुण कमाई करीत लढत ६-४ ने जिंकली.