शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तिरंदाजीत भारताचे आव्हान संपुष्टात, अतानू दास बाहेर

By admin | Updated: August 12, 2016 19:25 IST

तिरंदाजीमध्ये भारताची अखेरची आशा असलेला अतानू दासला शुक्रवारी कोरियाच्या सियुंगयुन लीविरुद्ध ४-६ ने पराभव स्वीकारावा लागला.

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. 12 - तिरंदाजीमध्ये भारताची अखेरची आशा असलेला अतानू दासला शुक्रवारी कोरियाच्या सियुंगयुन लीविरुद्ध ४-६ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे आॅलिम्पिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले. आॅलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली.माजी विश्व चॅम्पियन लीने उपउपांत्यपूर्व फेरीत अतानूचा ३०-२८, २८-३०, २७-७२, २८-२७ आणि २८-२८ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. २०१३ चा विश्व चॅम्पियन कोरियाच्या लीने दोन सेट्स जिंकले, तर दोन सेट्स टाय झाले. भारतीय तिरंदाजाला केवळ दुसरा सेट जिंकता आला. दीपिका कुमारी, बोंबायला देवी आणि लक्ष्मीराणी मांझी यांच्या पराभवानंतर भारताच्या आशा कोलकाताच्या अतानू दासच्या कामगिरीवर केंद्रित झाल्या होत्या, पण निर्णायक क्षणी केलेल्या चुकांमुळे त्याला पराभव स्वीकारावा लागला. अतानूने पहिला सेट २८-३० ने गमाविला. या सेटमध्ये लीने सलग तीन परफेक्ट टेनची नोंद केली. अतानूने दुसऱ्या सेटमध्ये सलग तीन परफेक्ट टेन मिळवताना ३०-२८ ने सरशी साधली. तिसऱ्या सेटमध्ये लीने अखेरच्या शॉटवर ८ गुण वसूल केले. त्याचा स्कोअर २७ होता. अतानूला ९ गुण वसूल करील सेट जिंकण्याची संधी होती, पण अतानूने ८ गुण मिळवत आघाडी घेण्याची संधी गमावली. तिसरा सेट २७-२७ ने बरबोरीत संपला. उभय खेळाडूंना प्रत्येकी एक गुण मिळाला. चौथ्या सेटमध्ये लीने ९, ९ आणि १० असे गुण नोंदवले तर अतानूला ९, ९ आणि ९ असा स्कोअर करता आला. लीने हा सेट २८-२७ ने जिंकत ५-३ अशी आघाडी घेतली. अतानूला लढत शुटआऊटपर्यंत लांबविण्यासाठी अखेरचा सेट जिंकणे आवश्यक होते. पण, हा सेट २८-२८ ने बरोबरीत संपला आणि कोरियन तिरंदाजाने एक गुण कमाई करीत लढत ६-४ ने जिंकली.