शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धरमशाला येथे पाकने खेळू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 04:14 IST

विश्वचषक टी-२० क्रिकेटचा भारत-पाक हा महत्त्वपूर्ण सामना १९ मार्च रोजी धरमशाला येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यावरून राजकीय खडाजंगी होत असताना आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी

कराची : विश्वचषक टी-२० क्रिकेटचा भारत-पाक हा महत्त्वपूर्ण सामना १९ मार्च रोजी धरमशाला येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यावरून राजकीय खडाजंगी होत असताना आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी वादात उडी घेत पाकने धरमशाला येथे भारताविरुद्ध खेळू नये, असा सल्ला दिला.बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांच्याशी फोनवर चर्चा करताना पाक संघाला भारतात सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्याआधी पीसीबीने धरमशाला येथील सामन्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे आयसीसीला पत्र लिहिले होते. मनी म्हणाले, ‘धरमशाला येथे अशास्थितीत आॅस्ट्रेलियाला खेळायचे असते, तर त्यांनी खेळण्यास नकार दिला असता. पीसीबीने आयसीसीला ठणकावून सांगावे की, आम्हाला धरमशाला येथे खेळायचे नाहीच.’हिमाचल प्रदेश सरकारने भारतीय सैनिक तळावरील हल्ल्याचे उदाहरण देत सैनिकांच्या बलिदानाचा आदर म्हणून पाक संघाला धरमशाला येथे सुरक्षा पुरविण्यास असमर्थता व्यक्त केली. बीसीसीआयने हिमाचल सरकारच्या या निर्णयावर टीका केली. मनोहर - शहरयार यांच्यात झालेल्या चर्चेच्यावेळी धरमशाला येथील लढत इतरत्र हलविण्याची वेळ आल्यास ती कुठे होऊ शकते, यावरदेखील चर्चा झाली. दोन्ही अध्यक्षांनी आणीबाणीच्या स्थितीत मोहाली किंवा कोलकाता येथे हा सामना होऊ शकतो, यावर एकमत व्यक्त केल्याची माहिती आहे. (वृत्तसंस्था)पाकला धरमशाला येथे खेळण्याची परवानगी राज्य सरकारकडून नाकारली गेल्याने, या इशाऱ्याकडे पाकने गंभीरपणे बघणे गरजेचे आहे. आमचे खेळाडू, अधिकारी, चाहते आणि मीडियातील लोकांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. पीसीबीने ही धमकी लक्षात घेऊन तेथे खेळू नये, असा माझा सल्ला राहील.- एहसान मनी > ...तर एचपीसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा : ठाकूरसिमला : धरमशाला येथे भारत-पाक विश्वचषक टी-२० सामन्याचे आयोजन करण्यावरून राजकारण सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या अस्मितेचा हा प्रश्न असल्याने गरज भासल्यास हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या प्रमुख पदावरून मी पायउतार होण्यास तयार असल्याचा बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी बुधवारी पुनरुच्चार केला.ते म्हणाले,‘भारत-पाक सामना द्विपक्षीय मालिका नाही. हा आंतरराष्ट्रीय सामना असल्याने राजकारण करू नये. राजकारणापलीकडे देश व राज्याच्या हिताचा विचार व्हावा. हिमाचलच्या अस्मितेसाठी मी गरज भासल्यास पदाचा राजीनामा देईन, शिवाय विरोधी लोकांसमोर हात जोडून विनंती करण्यास तयार आहे. सामन्याच्या आयोजनात पदाचा अडसर असेल, तर पददेखील सोडण्याची आपली तयारी आहे. भारत-पाक सामन्यासाठी मतभेद विसरून एकत्र काम करण्याची गरज आहे.’