शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

धरमशाला येथे पाकने खेळू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 04:14 IST

विश्वचषक टी-२० क्रिकेटचा भारत-पाक हा महत्त्वपूर्ण सामना १९ मार्च रोजी धरमशाला येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यावरून राजकीय खडाजंगी होत असताना आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी

कराची : विश्वचषक टी-२० क्रिकेटचा भारत-पाक हा महत्त्वपूर्ण सामना १९ मार्च रोजी धरमशाला येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यावरून राजकीय खडाजंगी होत असताना आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी वादात उडी घेत पाकने धरमशाला येथे भारताविरुद्ध खेळू नये, असा सल्ला दिला.बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांच्याशी फोनवर चर्चा करताना पाक संघाला भारतात सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्याआधी पीसीबीने धरमशाला येथील सामन्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे आयसीसीला पत्र लिहिले होते. मनी म्हणाले, ‘धरमशाला येथे अशास्थितीत आॅस्ट्रेलियाला खेळायचे असते, तर त्यांनी खेळण्यास नकार दिला असता. पीसीबीने आयसीसीला ठणकावून सांगावे की, आम्हाला धरमशाला येथे खेळायचे नाहीच.’हिमाचल प्रदेश सरकारने भारतीय सैनिक तळावरील हल्ल्याचे उदाहरण देत सैनिकांच्या बलिदानाचा आदर म्हणून पाक संघाला धरमशाला येथे सुरक्षा पुरविण्यास असमर्थता व्यक्त केली. बीसीसीआयने हिमाचल सरकारच्या या निर्णयावर टीका केली. मनोहर - शहरयार यांच्यात झालेल्या चर्चेच्यावेळी धरमशाला येथील लढत इतरत्र हलविण्याची वेळ आल्यास ती कुठे होऊ शकते, यावरदेखील चर्चा झाली. दोन्ही अध्यक्षांनी आणीबाणीच्या स्थितीत मोहाली किंवा कोलकाता येथे हा सामना होऊ शकतो, यावर एकमत व्यक्त केल्याची माहिती आहे. (वृत्तसंस्था)पाकला धरमशाला येथे खेळण्याची परवानगी राज्य सरकारकडून नाकारली गेल्याने, या इशाऱ्याकडे पाकने गंभीरपणे बघणे गरजेचे आहे. आमचे खेळाडू, अधिकारी, चाहते आणि मीडियातील लोकांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. पीसीबीने ही धमकी लक्षात घेऊन तेथे खेळू नये, असा माझा सल्ला राहील.- एहसान मनी > ...तर एचपीसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा : ठाकूरसिमला : धरमशाला येथे भारत-पाक विश्वचषक टी-२० सामन्याचे आयोजन करण्यावरून राजकारण सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या अस्मितेचा हा प्रश्न असल्याने गरज भासल्यास हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या प्रमुख पदावरून मी पायउतार होण्यास तयार असल्याचा बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी बुधवारी पुनरुच्चार केला.ते म्हणाले,‘भारत-पाक सामना द्विपक्षीय मालिका नाही. हा आंतरराष्ट्रीय सामना असल्याने राजकारण करू नये. राजकारणापलीकडे देश व राज्याच्या हिताचा विचार व्हावा. हिमाचलच्या अस्मितेसाठी मी गरज भासल्यास पदाचा राजीनामा देईन, शिवाय विरोधी लोकांसमोर हात जोडून विनंती करण्यास तयार आहे. सामन्याच्या आयोजनात पदाचा अडसर असेल, तर पददेखील सोडण्याची आपली तयारी आहे. भारत-पाक सामन्यासाठी मतभेद विसरून एकत्र काम करण्याची गरज आहे.’