शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

आता मागे वळून पाहणार नाही - विराट कोहली

By admin | Updated: March 7, 2017 19:12 IST

पहिली कसोटी गमावल्यानंतर आम्हाला जे करायचं होतं तेच आम्ही केलं. आम्हाला मालिकेत पुनरागमन करायचं होतं आणि दुसरं कोणाला नाही तर आम्हाला स्वतःला सिद्ध करायचं होतं.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - ''पहिली कसोटी गमावल्यानंतर आम्हाला जे करायचं होतं तेच आम्ही केलं. आम्हाला मालिकेत पुनरागमन करायचं होतं आणि दुसरं कोणाला नाही तर आम्हाला स्वतःला सिद्ध करायचं होतं'', असं बंगळुरू कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव केल्यानंतर विराट कोहली म्हणाला. 
 
''सर्वांनी स्वतःची जबाबदारी ओळखण्याची गरज असते तेच आमच्या खेळाडूंनी केलं. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू शकतो हा खेळाडूंचा विश्वास होता. मेच पाहायला आलेल्या प्रेक्षकांनीही आमची साथ दिली. ऑस्ट्रेलियाचा संघ दुस-या डावामध्ये मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला त्याचवेळी सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो हे आम्हाला समजलं होतं. 150 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य दिलं तरी आपण पुनरागमन करू शकतो हा विश्वास होता. अजिंक्य रहाणे आणि पुजारामध्ये झालेली भागीदारी महत्वाची होती. शेवटच्या विकेटसाठी इशांत आणि साहामध्ये झालेली भागीदारी आमच्यासाठी बोनस ठरली. 187 धावांचं लक्ष्य दिलं तेव्हा कशी गोलंदाजी करायची आहे हे आम्हाला माहित होतं. आम्हाला हा सामना आजच संपवायचा होता. रांचीमध्ये होणा-या तिस-या कसोटीसाठी आम्ही आतूर आहोत, आता मागे वळून पाहणार नाही'', असं  मॅच संपल्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये बोलताना विराट कोहली म्हणाला.  
 
बंगळुरू कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करून भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधून पुनरागमन केले.