शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

कर्णधारपदाचे ओझे जाणवत नाही

By admin | Updated: January 12, 2017 01:28 IST

‘टीम इंडियाचा दर्जा सर्वोत्तम आहे. संघातील सर्वच खेळाडू कायम एकमेकांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतात.

पुणे : ‘टीम इंडियाचा दर्जा सर्वोत्तम आहे. संघातील सर्वच खेळाडू कायम एकमेकांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतात. यामुळे आगामी काळात कर्णधारपद ओझे जाणवणार नाही,’ असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.पुण्यात येत्या रविवारी भारत-इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना होत आहे. त्यासाठी भारतीय संघ मंगळवारी रात्री पुण्यात दाखल झाला. बुधवारी एका खासगी कार्यक्रमानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी तो म्हणाला, ‘सर्व प्रकारातील कर्णधारपद स्विकारल्यानंतर आगामी काळात माझ्या वैयक्तिक खेळावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही, याची मला खात्री आहे. कर्णधारपद ओझे वाटत नसून, एक आव्हान म्हणून मी ते स्वीकारले आहे. प्रत्येक खेळाडूचे कच्चे दुवे दूर करण्यावर आम्ही मेहनत घेत आहोत. यासाठी वरिष्ठांचाही सल्ला घेऊ.’सातत्याने संघासाठी चांगली कामगिरी करीत असताना, नेतृत्व सोपवण्यात आल्याने जास्त आनंद झाला असल्याचे कोहलीने सांगितले. किमान २०१९च्या विश्वचषकापर्यंत कर्णधारपद सांभाळण्याची इच्छा कोहलीने एका प्रश्नाचे उत्तर देताना अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. तो म्हणाला, ‘२०१९च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत माझ्याकडे कर्णधारपद राहिले, तर आयुष्यातील ती उल्लेखनीय कामगिरी असेल.’ (क्रीडा प्रतिनिधी)मी सचिनचा फॅनमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा फॅन असल्याने कोहलीने या वेळी नमूद केले. ‘सध्या मी त्याच्याप्रमाणे मेहनत घेत आहे. यशाच्या शिखरावर असतानाही मेहनत घेण्याची सचिनची वृत्ती सर्वांनी शिकण्यासारखी आहे,’ असे त्याने सांगितले.करिअरमधील ४ महत्त्वाचे क्षणआतापर्यंतच्या करिअरमध्ये चार क्षण माझ्या दृष्टीने मोलाचे असल्याचे कोहलीने सांगितले. त्यामध्ये २०११मध्ये जिंकलेले एकदिवसीय विश्वचषक, कसोटीमध्ये भारताने पुन्हा अव्वल स्थान प्राप्त करणे, मोहाली येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक टी२० तील खेळी आणि मुंबई कसोटीत इंग्लंडविरुद्ध लगावलेले द्विशतक यांचा समावेश आहे.पुण्यातील स्टेडियम उत्कृष्टगहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम देशातील सर्वोत्तम स्टेडियमपैकी एक आहे. या मैदानावर खेळण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. स्टेडियमची देखभाल चांगल्या प्रकारे होत असल्याने त्याचा दर्जा कायम आहे, असेही कोहली म्हणाला.