शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयच्या दिग्गजांमध्ये चर्चा

By admin | Updated: September 24, 2015 23:48 IST

जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर पाच दिवसांनी बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांसाठी क्रिकेट बोर्डाच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याचे संकेत मिळत आहेत.

नवी दिल्ली : जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर पाच दिवसांनी बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांसाठी क्रिकेट बोर्डाच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याचे संकेत मिळत आहेत. विविध गटांदरम्यान चर्चा सुुरू असून, अध्यक्षपदासाठी ‘फिल्डिंग’ लावणे सुरू आहे.माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन व शरद पवार यांची नागपुरात झालेली भेट चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. उभय दिग्गजांदरम्यान दोन तास रंगलेल्या चर्चेनंतरही विशेष काही साध्य झाले नसल्याचे संकेत मिळत आहेत. या दोन्ही दिग्गजांकडे सध्या लढत देण्यासाठी पुरेसे बहुमत नाही, हे सत्य आहे. श्रीनिवासन यांना बंगळुरुमध्ये अमिताभ चौधरी यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. श्रीनिवासन यांनी आपली संघटनेवरील पकड जाणून घेण्यासाठी बंगळुरुमध्ये आपल्या विश्वासातील सदस्यांची बैठक बोलविली, पण पूर्व विभागातील संलग्न सहापैकी पाच संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीमध्ये सहभागी झाले नाहीत. केएससीएचे प्रतिनिधी ब्रजेश पटेल आणि केरळ क्रिकेट संघटनेचे टीसी मॅथ्यू येथे उपस्थित होते. या बैठकीमध्ये केवळ सहा संघटनांचे प्रतिनिधीच उपस्थित असल्याचे वृत्त आहे. पूर्व विभागातील संलग्न संस्थापैकी केवळ ओडिशा क्रिकेट संघटनेच्या प्रतिनिधीने या बैठकीत सहभाग नोंदवल्याचे वृत्त आहे, पण सचिव आशीर्वाद बेहडा यांनी बैठकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. बेहडा यांच्याकडे मतदानाचा अधिकार आहे. (वृत्तसंस्था)नागपूर : आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्यासोबत बुधवारी रात्री भेट झाल्याचे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष व मुंबई क्रिकेट संघटनेचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट केले. श्रीनिवासन हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसले, तरी नव्या अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी, अशी त्यांची इच्छा असल्याचे पवार यांनी सांगितले. नागपूर श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे टिळक पत्रकार भवनमध्ये गुरुवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पवार बोलत होते. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चुरस असल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि शरद पवार या दोन विरोधी गटाच्या नेत्यांमध्ये नागपूरमध्ये बैठक झाल्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीला नवे वळण प्राप्त झाले आहे.श्रीनिवासन यांच्यासोबतच्या बैठकीबाबत बोलताना पवार म्हणाले,‘‘हो, श्रीनिवासन बुधवारी रात्री मला भेटले. अ‍ॅड. शशांक मनोहर व मी कोलकाता येथे दालमिया यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असताना श्रीनिवासन यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली होती. काही अपरिहार्य कारणास्तव त्या वेळी भेट शक्य झाली नाही. त्यामुळे त्यांनी बुधवारी फोन केला व भेटीची इच्छा व्यक्त केली. त्याला मी होकार दिला. या भेटीदरम्यान श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षाला सर्वांचा पाठिंबा असावा, अशी इच्छा व्यक्त केली. नव्या अध्यक्षांची निवड करताना प्रत्येक सदस्याला विश्वासात घ्यायला हवे, असेही त्यांनी म्हटले.’’ पवार पुढे म्हणाले, ‘‘अ‍ॅड. शशांक मनोहर यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आम्ही सर्वांनी एकत्र कार्य केले. पण, सध्या परिस्थिती वेगळी आहे. भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी एकत्र कार्य करणे आवश्यक आहे. श्रीनिवासन यांच्यासोबतच्या बैठकीत बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी एका विशिष्ट नावावर चर्चा झाली नाही.’’ (क्रीडा प्रतिनिधी)