शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
3
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
4
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
5
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
6
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
7
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
8
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
9
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
10
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
12
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
13
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
14
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
15
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
16
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
17
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
18
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
19
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
20
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या

‘धोनी अ‍ॅण्ड कंपनी’ वन-डे मालिकेसाठी सज्ज

By admin | Updated: June 17, 2015 02:10 IST

महेंद्रसिंह धोनी ‘ब्रेक’नंतर गुरुवारपासून बांगलादेशविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

ढाका : महेंद्रसिंह धोनी ‘ब्रेक’नंतर गुरुवारपासून बांगलादेशविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. एकमेव कसोटी सामन्यानंतर भारतीय वन-डे संघात आठ नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे. धोनीव्यतिरिक्त स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुरेश रैना, मोहित शर्मा, धवल कुलकर्णी आणि अंबाती रायडू बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सोमवारी भारतीय संघाच्या तंबूत दाखल झाले. पावसामुळे गाजलेल्या व रविवारी संपलेल्या एकमेव कसोटी सामन्यात यजमान संघाला फॉलोआॅन स्वीकारण्यास भाग पाडताना भारतीय संघाने या लढतीत मानसिकदृष्ट्या वर्चस्व गाजवले. भारतीय संघाला वन-डे मालिकेतही चमकदार कामगिरीची आशा आहे. कसोटी संघात समावेश असलेले काही खेळाडू मायदेशी परतले आहेत. भारतीय संघाचे व्यवस्थापक विश्वरूप डे यांनी सांगितले, की मायदेशी परतणाऱ्या खेळाडूंना निरोप देण्यात आला. भारतीय संघाने सोमवारी रात्री बाहेर वेळ घालवण्याचा निर्णय घेतला होता. काही खेळाडू मायदेशी परतणार असल्यामुळे आम्ही कसोटी सामन्यातील चमकदार कामगिरीचा आनंद एकत्र साजरा करण्याचा निर्णय घेतला होता, असे संघाच्या नजीकच्या सूत्राने सांगितले. भारताने एकमेव कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ४६२ धावांची मजल मारली. त्यानंतर प्रत्युत्तरात खेळणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव २५६ धावांत गुंडाळत त्यांना फॉलोआॅन स्वीकारण्यास भाग पाडले. वन-डे सामन्यांचे आयोजन मीरपूरमध्ये १८,२१ व २४ जून रोजी करण्यात येणार आहे. मॉन्सूनमुळे प्रत्येक लढतीसाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे. भारताने यापूर्वी बांगलादेशमध्ये २०१४ मध्ये वन-डे मालिका खेळली होती. त्या वेळी सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-० ने विजय मिळवला होता, तर तिसरा व अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. (वृत्तसंस्था)