शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निर्णायक कसोटी आजपासून

By admin | Updated: March 24, 2017 23:55 IST

चार सामन्यांच्या मालिकेचा निकाल ठरविणारी निर्णायक कसोटी आजपासून येथे सुरू होत आहे.

धरमशाला : चार सामन्यांच्या मालिकेचा निकाल ठरविणारी निर्णायक कसोटी आजपासून येथे सुरू होत आहे. मैदानी आणि शाब्दिक चकमकीने गाजलेली ही मालिका अद्याप १-१ अशी बरोबरीत असली तरी मालिका जिंकण्यासाठी भारत आणि आॅस्ट्रेलिया संघ आसुसला आहे. कर्णधार विराट कोहलीचे खांदेदुखीमुळे खेळणे शंकास्पद वाटते. अशावेळी जिंकण्याचे दडपण पाहुण्यांच्या तुलनेत यजमानांवर अधिक जाणवते.सामन्याच्या पूर्वसंध्येला कोहलीने दिलेल्या संकेतानुसार तो खेळणार नसेल तर त्याची उणीव भरून काढणारा खेळाडू हवा. श्रेयस अय्यर अपयशी ठरल्यास भारताला मोठे नुकसान सोसावे लागेल. कोहलीने नेटवर सराव केला पण फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हेच माझ्या खेळण्याचा निर्णय घेतील, असेही स्पष्ट केले. तथापि सामन्याआधी प्रतिस्पर्धी संघाला मानसिक बळ मिळू नये यासाठी विराट पत्रकारांपुढे देखील हजार झाला होता. नेटस्वर कसे वाटत होते असा सवाल करताना कोहली म्हणाला, ‘मुव्हमेंट वाढली की थोडे दुखणे उमळते. आज सायंकाळी किंवा उद्या सामन्याआधी निर्णय होईल. जोखीम पत्करणे धोकादायक ठरेल काय याचे उत्तर फिजिओ देतील. फिटनेसमध्ये पास झालो तर खेळेन.’अय्यर देखील येथे दाखल झाला आहे. त्याने सराव केला. कुंबळे आणि कोहली यांची श्रेयसच्या सरावावर बारीक नजर होती. कोहलीने नंतर मुंबईच्या या फलंदाजासोबत चर्चा केली. अय्यर आक्रमक फलंदाज असून तोे सर्व प्रकारचे फटके मारतो. अय्यरने आॅस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात दुहेरी शतक ठोकले होते. कट आणि पूल यामध्ये तरबेज असल्याने या खेळपट्टीवर तो चांगला पर्याय ठरेल. कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे असेल. तिसरा सामना अनिर्णीत राखल्याने स्टीव्ह स्मिथ आणि सहकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. दुसरीकडे भारतही कसलीही कसर शिल्लक न राखता विजयाच्या इराद्यानेच उतरणार आहे. लोकेश राहुलकडून चांगली सुरुवात अपेक्षित असून दोन महिन्यांआधी तिहेरी शतक ठोकणाऱ्या करुण नायरकडून मोठ्या अपेक्षा आहेत. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांच्याकडून शांतचित्त आणि कौशल्यपूर्ण फलंदाजी अपेक्षित असेल. कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेचे नेतृत्व पणाला लागलेले असेल. गोलंदाजी मात्र चिंतेचा विषय आहे. ईशांत शर्मा अपयशी ठरल्यामुळे भुवनेश्वरला संधी मिळू शकते. आॅस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णीत राखला तरी त्यांचा नैतिक विजय होईल. सामना जिंकलाच तर त्यांच्यासाठी अ‍ॅशेसपेक्षा हा मोठा विजय ठरणार आहे.हा संघ भारतात दाखल झाला तेव्हा आतापर्यंतचा सर्वांत कमकुवत संघ अशी गणना करण्यात आली. पण पहिलाच सामना जिंकल्याने चित्र बदलले. (वृत्तसंस्था)स्मिथचे झुंझार शतक, नाथन लियोनची दमदार गोलंदाजी, मॅट रेनशॉ आणि पीटर हॅण्डसकोम्ब यांची परिपक्व फलंदाजी हे आतापर्यंतच्या खेळाचे वैशिट्य ठरले. या सामन्यात वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्डला फिरकीपटू स्टीव्ह कोकिफीचे स्थान मिळू शकते. ओकिफी रांचीत अपयशी ठरला होता. ईशांतच्या स्थानी शमीचा संघात समावेशधरमशाला : बंगालचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी ईशांतच्या स्थानी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ईशांतला या मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. शमीने नुकत्याच संपलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम लढतीत तामिळनाडूविरुद्ध २६ धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले होते. शमी व श्रेयस अय्यर यांचा संघात समावेश करण्यात आला असून अंतिम ११ खेळाडूंच्या निवडीसाठी ते दावेदार आहेत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.जिंकण्याच्या इराद्याने खेळू-‘‘ आम्हाला दावेदार किंवा अंडरडॉग मानले गेले तरी फरक पडत नाही. मालिका -१-१ अशी बरोबरीत असताना सामना जिंकण्याच्या इराद्यानेच खेळणार आहोत. मी निकालाबाबत चिंताग्रस्त नाही. आपल्या हातात काय आहे, यावरच माझे लक्ष असते. ’’विराटपेक्षा अजिंक्य शांतचित्त‘‘विराटच्या तुलनेत अजिंक्य अधिक शांतचित्त व्यक्ती आहे. तो नेतृत्व देखील चांगले करेल. कोहलीच्या अनुपस्थितीचा आम्हाला फरक पडणार नाही. रहाणेवर भावनांचा परिणाम होत नाही. श्रेयस अय्यर हा देखील आक्रमक फलंदाज असल्याने भारताला कोहलीची उणीव जाणावणार नाही. ’’टीकांची मला पर्वा नाही‘‘ माझे अंत:करण निर्मळ आहे. मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. कुणी शेषनाग म्हटले किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचेशी तुलना केली तरी टीकेला मी घाबरत नाही. क्रिकेटर आणि व्यक्ती म्हणून माझ्यात काय सुधारणा हवी हे मला ठाऊक आहे. माझ्या करिअरची सुरुवात देखील टीकांनीच झाली. खऱ्या गोष्टींची बाजू घेतली की टीका होणारच. माझ्या बोलण्याचे इतक्या लोकांना वाईट वाटले, याबद्दल त्यांना शुभेच्छा.’’तर जखम उमळेल‘‘खांद्याला जखम झाल्याने आता पुन्हा खेळलो तर जखम नव्याने उमळण्याचा धोका आहे. सामन्यात खेळण्याचा निर्णय घ्यायला काही तास आणखी लागतील.’’... तर विराटने खेळावे : गावस्करविराट कोहली पूर्णपणे फिट नाही, पण संघव्यवस्थापनाला जर त्याच्या खेळण्यामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळत असेल तर त्याने शनिवारपासून आॅस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यात खेळावे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. धरमशाला येथे सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत कोहलीने म्हटले की, तो जर पूर्णपणे फिट असेल तरच चौथ्या कसोटी सामन्यात खेळेल. गावस्कर म्हणाले, ‘संघव्यवस्थापनाने निश्चित करायला हवे की, खेळाडू व कर्णधार म्हणून कोहलीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान द्यायला हवे.’54 कसोटीत सलग सहभागविराटने भारतीय कसोटी संघात २० जून २०११ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले. या दौऱ्यातील तिन्ही डावांत त्याने ७६ धावा केल्या. नंतर लगेचच इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. पण चारपैकी एकही सामना तो खेळू शकला नव्हता.२२ नोव्हेंबर २०११ ला पुनरागमनानंतर सलग ५४ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान १६ शतके आणि १४ अर्धशतकांसह त्याने ४४२१ धावा केल्या. भारताकडून सलग कसोटी खेळण्याचा विक्रम सुनील गावस्कर(१०६ सामने) यांच्या नावावर आहे. ५० किंवा त्याहून अधिक सलग सामने खेळणाऱ्यांच्या यादीत कोहली ११ व्या स्थानावर आहे. भारत : विराट कोहली (कर्णधार),लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे, करुण नायर, रिद्विमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, अभिवन मुकुंद, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर आणि जयंत यादव .आॅस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार), मॅट रेनशॉ, डेव्हिड वॉर्नर, शॉन मार्श, पीटर हॅण्डस्कोम्ब, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), नाथन लियोन, जोस हेजलवुड, स्टीव ओकीफी,जॅक्सन बर्ड, मिशेल स्वेपसन, मार्कस स्टोनिस, ग्लेन मॅक्सवेल, एस्टन एगर, उस्मान ख्वाजा आणि पॅट कमिन्स.