शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

माझ्या वक्तव्याचा विपर्यास - विराट कोहली

By admin | Updated: March 30, 2017 11:00 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपण केलेल्या ऑस्ट्रेलिया खेळांडूंबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास लावला गेला असल्याचं म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपण केलेल्या ऑस्ट्रेलिया खेळांडूंबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास लावला गेला असल्याचं म्हटलं आहे. आपली अजूनही काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत चांगली मैत्री असल्याचं त्याने सांगितलं आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने आपण आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मित्र मानत नाही असं म्हटलं होतं. यानंतर त्याच्यावर ऑस्ट्रेलियन मीडियाने प्रचंड टीका केली होती. 
(विराट बालिश, गर्विष्ठ!)
(ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत मैत्री शक्य नाही - विराट कोहली)
 
मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियन संघासोबत मैत्रीची नवी सुरूवात करणार का ? असं विचारलं असता नाही "आता आधीसारखं काही राहिलं नाहीये, मीही आधी असाच विचार करायचो पण आता सर्व बदललं आहे. पहिल्या कसोटीनंतर मी जे बोललो होतो  त्याबाबत मी पूर्णत: चुकीचा सिद्ध झालो.  खेळाच्या वातावरणात तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून खेळायचं असतं, पण मी चुकीचा ठरलो.  पहिल्या कसोटीनंतर मी जे बोललो होतो तसं पुन्हा बोलताना तुम्ही मला पाहणार नाही", असं कोहली बोलला होता.
 
मात्र विराट कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण देत आपण संपुर्ण ऑस्ट्रेलिया संघाला उद्देशून हे वक्तव्य केलं नव्हतं असं म्हटलं आहे.  "माझ्या वक्तव्याचा विपर्यास लावला गेला. मी संपुर्ण ऑस्ट्रेलिया संघाला उद्देशून बोललो नव्हतो. काही ठराविक खेळाडूंबद्दल माझं मत होतं. अनेकांशी माझे चांगले संबंध असून आयपीएलमध्ये आरसीबीकडून आम्ही एकत्र खेळलो आहोत. आणि ते बदलणार नाही", असं विराटने ट्विट करत सांगितलं आहे. 
 
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंबाबत केलेल्या या विधानावर ‘डेली टेलिग्राफ’ने विराटची प्रतिक्रिया बालिशपणा असल्याचे म्हटले असून, मालिका आटोपल्यानंतर बीअर पिण्याचे स्मिथचे आमंत्रणही विराटने उर्मटपणे फेटाळून लावल्याचे म्हटले आहे. कोहलीने मालिका संपल्यानंतर मोठ्या मनाने प्रतिस्पर्धी संघाशी हात मिळविला पाहिजे होता, पण तसे न करता आपण स्तरहीन असल्याचे त्याने सिद्ध केले, असे ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी म्हटले आहे. कोहली गर्विष्ठ असल्याचीही टीका करण्यात आली.
 
स्मिथने मुरली विजयबद्दल काढलेल्या अपशब्दांबद्दल जाहीरपणे माफीदेखील मागितली, मग रांची कसोटीतील कृत्याबद्दल कोहलीनेही माफी मागायला हवी होती. पण त्याने तसे काहीच केले नाही, असेही एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रकाशित झाले. टीकेबद्दल कोहलीचे चाहते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवाज उठवला होता. भारतीय संघातील क्रिकेटपटूंनीही ऑस्ट्रेलियातील मीडियाकडून केल्या जाणाऱ्या टीकेला दुर्दैवी ठरवले होते. आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यानेही आॅस्ट्रेलियन मीडियाचा कोहलीला बदनाम करण्याचा डाव आखल्याचे सांगत निशाणा साधला होता. असे असतानाही ‘द आॅस्ट्रेलियन’ने कोहलीला लक्ष्य केले. डीआरएस प्रकरणावरही स्मिथने स्पष्टीकरण दिले. कोहलीने मात्र स्मिथला दिलेल्या वागणुकीवर कुठलीही दिलगिरी व्यक्त केली नाही, हे दुर्दैवी नाही का? असा सवाल माध्यमांनी उपस्थित केला