शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

टी-२0 मध्ये गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजांत अधिक सुधारणा : द्रविड

By admin | Updated: July 15, 2016 21:13 IST

टी-२0 क्रिकेट गेल्या एका दशकात बदलाच्या परिक्रमेतून जात आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - टी-२0 क्रिकेट गेल्या एका दशकात बदलाच्या परिक्रमेतून जात आहे. यादरम्यान कौशल्याच्या दृष्टिकोनातून गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजांत जास्त सुधारणा पाहायला मिळाली असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले.द्रविडने म्हटले, टी-२0 क्रिकेटमध्ये गेल्या ९, १0 अथवा ११ वर्षांत कौशल्याच्या दृष्टीने गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाज थोडे अग्रेसर आहेत; परंतु गोलंदाजही हळूहळू त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे असे आपण आपल्या अनुभवाने सांगू शकतो.याविषयी विस्ताराने सांगताना द्रविडने खेळाच्या विकासाबरोबरच गोलंदाजांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. तो म्हणाला, गोलंदाजांत काही शारीरिक मर्यादा असतात. तुम्ही मोठ्या कालावधीपर्यंत गोलंदाजी करू शकत नाहीत. तुम्ही प्रत्येक दिवशी दोन तास, अडीच तास अथवा तीन तास गोलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जखमी होऊ शकतात किंवा कोणत्याही वेळेस तुम्ही अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या पाहिले गेल्यास गोलंदाजांना आपल्या कौशल्यावर काम करण्यासाठी मर्यादित संधी असते. दुसरीकडे फलंदाज याविषयी थोडे फायदेशीर आहेत. कारण गोलंदाजांच्या तुलनेत ते जास्त वेळ सराव करू शकतात.ह्ण टी-२0 क्रिकेटमध्ये बॅट आणि चेंडूदरम्यान संतुलन बनवणे आवश्यक असल्याचेही द्रविड म्हणतो. तो म्हणाला, ह्यटी-२0 क्रिकेटचे महत्त्व वाढतच जाईल. आम्हाला फलंदाज आणि चेंडूतील संतुलन बनवण्यासाठी थोडे सावध असण्याची गरज आहे. मी टी-२0 क्रिकेट हे एक मोठे आव्हानाच्या रूपात पाहता आहे.