शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

‘सीओए’ने घेतली ‘मुंबई’ची विकेट

By admin | Updated: March 20, 2017 00:08 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) कारभारात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने सुचविलेल्या

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) कारभारात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने सुचविलेल्या ‘एक राज्य, एक मत’ या शिफारशीचा अखेर मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) फटका बसला. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीने (सीओए) सर्वात मोठा निर्णय घेताना एमसीएचे पुर्ण सदस्यत्व काढून घेतले आहे. सीओएने बीसीसीआयच्या नव्या संविधानाची व दिशानिर्देशकाची माहिती संकेतस्थळावर अपलोड केली असून याद्वारे एका राज्यातून केवळ एकच पुर्ण सदस्यत्व संघटना राहू शकते, हे स्पष्ट होत आहे. बीसीसीआयच्या संविधानाला अंतिम स्वरुप दिल्यानंतर सीओएने हा निर्णय घेतला. त्याचवेळी, या सीओएद्वारा बिहार, तेलंगना आणि उत्तर पुर्वेकडील राज्यांना पुर्ण सदस्यत्व बहाल करण्यात आले. विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे योगदान मुंबई क्रिकेटचे राहिले असल्याने सीओएने घेतलेला निर्णय धक्कादायक ठरला आहे.त्याचप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशींना मान्यता दिल्यानंतर एमसीएवर बंधन येणं हे अपेक्षित होतंच. परंतु, भारतीय क्रिकेटमधील असलेले भव्य योगदान पाहता एमसीएबाबत काहीतरी तोडगा काढण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सीओएने या सर्व आशांवर पाणी फेरले. दरम्यान, लोढा समितीच्या शिफारशींनुसार मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या पुर्वेकडील सर्व राज्यांना पुर्ण सदस्यत्व आणि मतदान देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले आहे. तसेच, उत्तराखंड आणि तेलंगना राज्यांनाही हे अधिकार देण्यात आले. शिवाय बिहार राज्य संघटनेचे सर्व प्रलंबित प्रकरण संपल्यानंतरच त्यांना पुर्ण सदस्यत्व मिळेल. सीओएने घेतलेल्या या निर्णयानंतर ४१वेळचा रणजी चॅम्पियन एमसीए सहाय्यक सदस्य म्हणून बीसीसीआयमध्ये राहिल. त्याचप्रमाणे, गुजरात राज्याचे बडोदा आणि सौराष्ट्र यांनाही सहाय्यक सदस्य रहावे लागेल. त्याचप्रमाणे, एमसीएच्या प्रतिनिधींना बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधरण सभेमध्ये सहभागी होण्याची अनुमती देण्यात आली आहे. परंतु, त्यांना मतदान करण्याचे अधिकार नसतील. (क्रीडा प्रतिनिधी)