शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

चॅम्पिअन्स ट्रॉफी - भारत अडचणीत, सेमीफायनलसाठी करा किंवा मरा

By admin | Updated: June 9, 2017 09:08 IST

श्रीलंकेने सात गडी राखून मिळवलेल्या दमदार विजयानंतर भारताचं गणित बिघडलं असून आता करा किंवा मरा अशी परिस्थिती झाली आहे

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 9 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी दावेदार समजल्या जाणा-या भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रीलंकेने सात गडी राखून मिळवलेल्या दमदार विजयानंतर भारताचं गणित बिघडलं असून आता करा किंवा मरा अशी परिस्थिती झाली आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी भारत सहजपणे फायनल गाठेल असा दावा केला जात होता, मात्र श्रीलंकेने 321 धावांचा पाठलाग करताना भारतावर सात गडी राखत सहज विजय मिळवला. श्रीलंकेचा पराभव केला असता तर भारत सहजपण सेमीफायनलमध्ये पोहोचला असता. पण सेमीफायनलमध्ये पोहोचणं भारतासाठी आता तितकं सोपं नसणार आहे.
 
(फलंदाजांची चमक, लंकेची सरशी)
(भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी : ब्रेट ली)
(पाकिस्तान विजयी)
 
ग्रुप बी मध्ये आता फक्त दोनच सामने बाकी आहे. रविवारी भारतीय संघ आयसीसी वनडे रँकिंगमधअये पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या दक्षिण अफ्रिकेसोबत दोन हात करणार आहे. तर सोमवारी पाकिस्तान आणि श्रीलंका आपापसात भिडणार आहेत. सेमीफायनलमध्ये कोणते दोन संघ पोहोचतील हे या दोन्ही सामन्यांचा निकालच ठरवणार आहे. 
 
दक्षिण अफ्रिकेविरोधात करा किंवा मरा
भारताचा पुढील सामना रविवारी दक्षिण अफ्रिकेसोबत होणार आहे. या सामन्याला हवं तर क्वार्टर फायनलही म्हणू शकतो. हा सामना जिंकणा-या संघाचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास नक्की होईल. जर भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला तर भारताचं सेमीफायनलचं तिकीट नक्की होईल. पण जर भारताचा पराभव झाला तर आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2017 मधील त्यांचा प्रवास तिथेच संपेल. 
 
पाकिस्तान आणि श्रीलंकेची क्वॉर्टर फायनल
सोमवारी ग्रुप बी मधील पाकिस्तान आणि श्रीलंका आपापसात भिडतील. भारतासमोर शरणागती पत्करलेल्या पाकिस्तान संघाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. सोमवारी हा सामना जिंकणारा संघही सेमीफायनलमध्ये आपलं स्थान नक्की करेल. 
 
पाऊस निभावू शकतो महत्वाची भूमिका
इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत आतापर्यंत पावसाने अनेक सामन्यांचा निकाल ठरवला आहे. जर उर्वरित सामन्यांमध्येही पावसाने व्यत्यय आणल्यास परिस्थिती अजून उत्साहवर्धक होऊ शकते. जर भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या सामन्यात पाऊस पडला तर तर दोन्ही संघांना एक - एक अंक दिला जाईल, ज्यानंतर दोघांचे तीन अंक होतील. यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तानध्ये होणा-या सामन्यात विजयी संघाचे चार अंक होतील आणि तो संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. यानंतर अंतिम चार संघात जाणारा दुसरा संघ रनरेटच्या आधारे ठरवण्यात येईळ.