शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

चॅम्पिअन्स ट्रॉफी - भारत अडचणीत, सेमीफायनलसाठी करा किंवा मरा

By admin | Updated: June 9, 2017 09:08 IST

श्रीलंकेने सात गडी राखून मिळवलेल्या दमदार विजयानंतर भारताचं गणित बिघडलं असून आता करा किंवा मरा अशी परिस्थिती झाली आहे

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 9 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी दावेदार समजल्या जाणा-या भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रीलंकेने सात गडी राखून मिळवलेल्या दमदार विजयानंतर भारताचं गणित बिघडलं असून आता करा किंवा मरा अशी परिस्थिती झाली आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी भारत सहजपणे फायनल गाठेल असा दावा केला जात होता, मात्र श्रीलंकेने 321 धावांचा पाठलाग करताना भारतावर सात गडी राखत सहज विजय मिळवला. श्रीलंकेचा पराभव केला असता तर भारत सहजपण सेमीफायनलमध्ये पोहोचला असता. पण सेमीफायनलमध्ये पोहोचणं भारतासाठी आता तितकं सोपं नसणार आहे.
 
(फलंदाजांची चमक, लंकेची सरशी)
(भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी : ब्रेट ली)
(पाकिस्तान विजयी)
 
ग्रुप बी मध्ये आता फक्त दोनच सामने बाकी आहे. रविवारी भारतीय संघ आयसीसी वनडे रँकिंगमधअये पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या दक्षिण अफ्रिकेसोबत दोन हात करणार आहे. तर सोमवारी पाकिस्तान आणि श्रीलंका आपापसात भिडणार आहेत. सेमीफायनलमध्ये कोणते दोन संघ पोहोचतील हे या दोन्ही सामन्यांचा निकालच ठरवणार आहे. 
 
दक्षिण अफ्रिकेविरोधात करा किंवा मरा
भारताचा पुढील सामना रविवारी दक्षिण अफ्रिकेसोबत होणार आहे. या सामन्याला हवं तर क्वार्टर फायनलही म्हणू शकतो. हा सामना जिंकणा-या संघाचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास नक्की होईल. जर भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला तर भारताचं सेमीफायनलचं तिकीट नक्की होईल. पण जर भारताचा पराभव झाला तर आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2017 मधील त्यांचा प्रवास तिथेच संपेल. 
 
पाकिस्तान आणि श्रीलंकेची क्वॉर्टर फायनल
सोमवारी ग्रुप बी मधील पाकिस्तान आणि श्रीलंका आपापसात भिडतील. भारतासमोर शरणागती पत्करलेल्या पाकिस्तान संघाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. सोमवारी हा सामना जिंकणारा संघही सेमीफायनलमध्ये आपलं स्थान नक्की करेल. 
 
पाऊस निभावू शकतो महत्वाची भूमिका
इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत आतापर्यंत पावसाने अनेक सामन्यांचा निकाल ठरवला आहे. जर उर्वरित सामन्यांमध्येही पावसाने व्यत्यय आणल्यास परिस्थिती अजून उत्साहवर्धक होऊ शकते. जर भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या सामन्यात पाऊस पडला तर तर दोन्ही संघांना एक - एक अंक दिला जाईल, ज्यानंतर दोघांचे तीन अंक होतील. यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तानध्ये होणा-या सामन्यात विजयी संघाचे चार अंक होतील आणि तो संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. यानंतर अंतिम चार संघात जाणारा दुसरा संघ रनरेटच्या आधारे ठरवण्यात येईळ.