शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

चॅम्पिअन्स ट्रॉफी - भारत अडचणीत, सेमीफायनलसाठी करा किंवा मरा

By admin | Updated: June 9, 2017 09:08 IST

श्रीलंकेने सात गडी राखून मिळवलेल्या दमदार विजयानंतर भारताचं गणित बिघडलं असून आता करा किंवा मरा अशी परिस्थिती झाली आहे

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 9 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी दावेदार समजल्या जाणा-या भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रीलंकेने सात गडी राखून मिळवलेल्या दमदार विजयानंतर भारताचं गणित बिघडलं असून आता करा किंवा मरा अशी परिस्थिती झाली आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी भारत सहजपणे फायनल गाठेल असा दावा केला जात होता, मात्र श्रीलंकेने 321 धावांचा पाठलाग करताना भारतावर सात गडी राखत सहज विजय मिळवला. श्रीलंकेचा पराभव केला असता तर भारत सहजपण सेमीफायनलमध्ये पोहोचला असता. पण सेमीफायनलमध्ये पोहोचणं भारतासाठी आता तितकं सोपं नसणार आहे.
 
(फलंदाजांची चमक, लंकेची सरशी)
(भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी : ब्रेट ली)
(पाकिस्तान विजयी)
 
ग्रुप बी मध्ये आता फक्त दोनच सामने बाकी आहे. रविवारी भारतीय संघ आयसीसी वनडे रँकिंगमधअये पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या दक्षिण अफ्रिकेसोबत दोन हात करणार आहे. तर सोमवारी पाकिस्तान आणि श्रीलंका आपापसात भिडणार आहेत. सेमीफायनलमध्ये कोणते दोन संघ पोहोचतील हे या दोन्ही सामन्यांचा निकालच ठरवणार आहे. 
 
दक्षिण अफ्रिकेविरोधात करा किंवा मरा
भारताचा पुढील सामना रविवारी दक्षिण अफ्रिकेसोबत होणार आहे. या सामन्याला हवं तर क्वार्टर फायनलही म्हणू शकतो. हा सामना जिंकणा-या संघाचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास नक्की होईल. जर भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला तर भारताचं सेमीफायनलचं तिकीट नक्की होईल. पण जर भारताचा पराभव झाला तर आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2017 मधील त्यांचा प्रवास तिथेच संपेल. 
 
पाकिस्तान आणि श्रीलंकेची क्वॉर्टर फायनल
सोमवारी ग्रुप बी मधील पाकिस्तान आणि श्रीलंका आपापसात भिडतील. भारतासमोर शरणागती पत्करलेल्या पाकिस्तान संघाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. सोमवारी हा सामना जिंकणारा संघही सेमीफायनलमध्ये आपलं स्थान नक्की करेल. 
 
पाऊस निभावू शकतो महत्वाची भूमिका
इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत आतापर्यंत पावसाने अनेक सामन्यांचा निकाल ठरवला आहे. जर उर्वरित सामन्यांमध्येही पावसाने व्यत्यय आणल्यास परिस्थिती अजून उत्साहवर्धक होऊ शकते. जर भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या सामन्यात पाऊस पडला तर तर दोन्ही संघांना एक - एक अंक दिला जाईल, ज्यानंतर दोघांचे तीन अंक होतील. यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तानध्ये होणा-या सामन्यात विजयी संघाचे चार अंक होतील आणि तो संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. यानंतर अंतिम चार संघात जाणारा दुसरा संघ रनरेटच्या आधारे ठरवण्यात येईळ.