शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

Champions Trophy : या पाच कारणांसाठी बांगलादेशचा संघ भारतासाठी धोकादायक

By admin | Updated: June 15, 2017 11:04 IST

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. बांगलादेशच्या तुलनेत भारताचा संघ सर्वच आघाडयांवर सरस असला तरी...

 ऑनलाइन लोकमत 

बर्मिंगहॅम, दि. 15 - यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. बांगलादेशच्या तुलनेत भारताचा संघ सर्वच आघाडयांवर सरस असला तरी, आपल्याला काही गोष्टींसाठी बांगलादेशपासून संभाळून राहण्याची गरज आहे. 
 
1) श्रीलंकेचा भारतावर विजय, बांगलादेशची न्यूझीलंडवर मात तसेच पाकिस्तानचा इंग्लंडवर विजय या निकालांनी क्रिकेट पंडितांचे अंदाज चुकवले. त्यामुळे आज बांगलादेश विरुद्ध होणा-या सामन्यात भारताचे पारडे जड असेल तरी भारतच जिंकेल असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. 
 
2)  2007 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशने भारताला पराभूत करुन संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का दिला. त्यामुळे वर्ल्डकपमधील भारताची वाटचाल साखळीतच संपली. 2015 च्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्धच्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यातही रोहित शर्माला बाद न देण्याचा निर्णयही बराच वादग्रस्त ठरला होता. त्यावेळी रोहित बाद झाला असता तर, भारताचा डाव अडचणीत सापडला असता. 2015 मध्ये भारत-बांगलादेशमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशने 2-1 ने विजय मिळवला होता. 2016 च्या टी-20 वर्ल्डकपमध्येही भारताने बांगलादेशवर अवघ्या 1 रन्सने विजय मिळवला होता. 
 
आणखी वाचा 
 
3)  चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोन्ही सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली असली तरी, त्यांना पहिल्या पावरप्लेचा फायदा उचलता आलेला नाही. पहिल्या दहा षटकात भारताने पाकिस्तान विरुद्ध 46, श्रीलंके विरुद्ध 48 आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध 35 धावा केल्या. 
 
4) कॅचेस विन मॅचेस म्हटले जाते. उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात झेल सोडणे भारताला परवडणारे नाही. पाकिस्तान विरुद्ध केदार जाधवने, हार्दिक पांडयाने कुशल मेंडिस, हाशिम आमला यांचे झेल सोडले होते. भारताला क्षेत्ररक्षणातही आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. 
 
5) आर. अश्विनचा संघात समावेश झाला असला तरी, एक वेगवान गोलंदाज कमी झाला आहे. अश्विनच्या समावेशाने फलंदाजीत फायदा होणार असला तरी, हाणामारीच्या षटकात फटका बसू शकतो. कमी धावसंख्येचा आपण बचाव करु शकतो ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतावर अजून अशी वेळ आलेली नाही.