शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भुवनेश्वरने डोळे दिपवले

By admin | Updated: July 21, 2014 01:56 IST

दुसऱ्या कसोटीचा आणि मालिकेचा निकाल काहीही लागो; पण एका खेळाडूने सर्वांची मने जिंकली आहेत, तो म्हणजे भुवनेश्वर कुमार.

अजय नायडू, लंडनदुसऱ्या कसोटीचा आणि मालिकेचा निकाल काहीही लागो; पण एका खेळाडूने सर्वांची मने जिंकली आहेत, तो म्हणजे भुवनेश्वर कुमार. बॅट आणि बॉल या दोन्ही ठिकाणी त्याने सरस कामगिरी केली आहे. २४ वर्षीय भुवनेश्वरने चार ेडावांत तीन अर्धशतके केली आहेत. केवळ अर्धशतके म्हणून या धावा महत्त्वाच्या नाहीत, तर अतिशय दबावाच्या परिस्थितीत डावाचा नूर पालटणाऱ्या भागीदाऱ्या करताना त्याने ही अर्धशतके केली आहेत, म्हणून त्यांना अतिशय महत्त्व आहे. आज, रविवारी त्याने रवींद्र जडेजाबरोबर ९९ धावांची भागीदारी करून भारताला या सामन्यात ड्रायव्हिंग सीटवर नेऊन बसविले. भारताने कसोटी जिंकली तर त्याचे अर्धेअधिक श्रेय भुवनेश्वरकुमारला निर्विवादपणे द्यावे लागेल. भुवीने त्याच्या चार डावात ५८, ६३*, ३६ आणि ५२ अशा धावा केल्या आहेत. यात त्याने चारही वेळा महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या केल्या आहेत. नॉटिंगहॅम कसोटीत पहिल्या डावात त्याने मोहम्मद शमीबरोबर १११ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावात तो स्टुअर्ट बिन्नीबरोबर उभा राहिला आणि कसोटी अनिर्णित केली. लॉर्डस कसोटीच्या पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेने शतकाचा कळस चढविला. त्याचा पाया भुवनेश्वरकुमार बनला होता. या चार डावांत त्याने एक शतकी आणि तीन नव्वदीच्या भागीदाऱ्या केल्या. म्हणून तर त्याची बॅटिंग बघून वासीम आक्रमला तो भारताचा अष्टपैलू खेळाडू असल्याचे वाटते. स्विंग आणि सिम हे त्याचे अस्त्र आहे. त्याचसाठी त्याला संघात घेण्यात आले आहे. त्या भूमिकेला त्याने न्यायही दिला आहे. लॉर्डसवर त्याने डावात सहा बळी घेतले. त्याचा आयडॉल असलेला प्रवीणकुमार आणि त्याचा रणजी सहकारी आर. पी सिंग यांच्या यादीत आपले नाव बघून भुवनेश्वर कुमारला अभिमान वाटतो आहे. फलंदाजीत यश मिळाल्याने गोलंदाजीसाठी आत्मविश्वास वाढला असे तो सांगतो. प्रवीणकुमारने दिलेल्या टिप्स अतिशय उपयुक्त ठरल्याचेही त्याने सांगितले.