शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

महाराष्ट्राचे जय कवळी बीएफआयचे महासचिव

By admin | Updated: September 26, 2016 00:16 IST

भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अजयसिंह यांची अध्यक्ष आणि महासचिव म्हणून महाराष्ट्राचे जय कवळी यांची बहुमताने निवड झाल्यानंतर

मुंबई : भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अजयसिंह यांची अध्यक्ष आणि महासचिव म्हणून महाराष्ट्राचे जय कवळी यांची बहुमताने निवड झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या बॉक्सिंग संघातील वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजयसिंह यांना ४९ मते मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी रोहित जैन यांना अवघी १५ मते मिळाली. मतदान आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ (एआयबीए) आणि क्रीडामंत्रालयाच्या निरीक्षकांच्या निरीक्षणाखाली झाले. एआयबीएचे प्रतिनिधित्व त्यांचे ओसनिया विभागाचे उपाध्यक्ष एडगर तानेर यांनी केले, तर क्रीडामंत्रालयाने भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या सुश्मिता ज्योत्सी यांना आपला निरीक्षक म्हणून पाठवले होते. उत्तराखंडचे प्रतिनिधित्व करणारे ५१ वर्षीय अजयसिंह हे प्रसिद्ध उद्योगपती असून, ते उत्तराखंड मुष्टियुद्ध महासंघाचे उपाध्यक्षदेखील आहेत. अजयसिंह हे अखेरच्या क्षणी अध्यक्षपदाच्या शर्यतीत दाखल झाले आणि सूत्रांनुसार त्यांना भारतीय आॅलिम्पिक संघटनेचा पाठिंबादेखील होता. महाराष्ट्राचे जय कवळी यांची महासचिव म्हणून निवड झाली. त्यांना ४८ मते मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी लेनी डिगामा यांना अवघी १२ मते मिळाली. सचिवपदाच्या शर्यतीतील तिसरे उमेदवार हरियाणाचे राकेश ठाकरान यांना अवघी चारच मते मिळाली. आसामचे हेमंत कुमार कलिता यांची कोषाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. गेल्या आठवड्यात नामांकन प्रक्रिया संपली. त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी दाखल केली नव्हती.एआयबीएचे निरीक्षक तानेर यांनी निवड प्रक्रियेवर समाधान व्यक्त केले. भारतीय मुष्टियुद्ध महासंघाची कार्यकारिणी : अध्यक्ष : अजयसिंह, महासचिव : जय कवळी, कोषाध्यक्ष : हेमंत कुमार कलिता, उपाध्यक्ष : गोइबी सलामसिंह, जान खारशिंग, अनिल कुमार बोहिदार, सी.बी. राजे, अमरजितसिंह, नरेंद्र कुमार निर्वाण, राजेश भंडारी, अनिल कुमार मिश्रा, विभागीय सचिव : स्वप्न बॅनर्जी, जी.व्ही. रवी, आर. गोपू, राजेश देसाई, दिग्विजयसिंग, संतोष कुमार दत्ता, राजीवकुमार सिंह.