शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

निर्भय असा, पण निष्काळजी नको

By admin | Updated: June 18, 2017 03:13 IST

क्रिकेटचा मोठा इतिहासात लाभलेल्या दोन परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम लढत रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेत भिन्न

- सौरव गांगुली लिहितात...क्रिकेटचा मोठा इतिहासात लाभलेल्या दोन परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम लढत रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेत भिन्न दृष्टिकोन राखून सहभागी झाले होते. गतविजेता भारतीय संघ जेतेपद राखण्याचा प्रबळ दावेदार होता. याउलट पाकिस्तान मात्र ‘ब’ गटात सहभागी अन्य एक संघ होता. स्पर्धेसाठी पात्रता मिळवणे त्यांच्यासाठी मोठी बाब होती. त्यामुळे रविवारी दावेदार संघाची ‘डार्क हॉर्स’ संघांसोबत गाठ पडणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूंनाही पाक संघाकडून अंतिम फेरीची अपेक्षा नव्हती. देशभक्त नागरिकांप्रमाणे त्यांनाही पाक संघाने चांगली कामगिरी करावी, असे वाटत होते. पण, सलामी लढतीत भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाक संघातील तळागाळातील चाहत्याचाही संघावरील विश्वास ढासळला होता. त्यानंतर मात्र प्रत्येक लढतीगणिक पाक संघाच्या कामगिरीत कमालीची सुधारणा होत गेली. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध पाक संघाच्या कामगिरीचा आलेख उंचावत गेला. त्यांच्या गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली तर इंग्लंडविरुद्ध त्यांनी क्षेत्ररक्षणातही कमाल केली. युवा हसनने जुनेद व आमिरच्या साथीने छाप सोडली. आमिरच्या स्थानी इंग्लंडविरुद्धच्या लढतीत खेळलेल्या रईसनेही मिळालेल्या संधीचे सोने केले. सामन्यागणिक सरफराजने कर्णधार म्हणून परिपक्व होत असल्याचे दाखविले. पाक संघासाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांची फलंदाजी आहे. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत त्यांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, यात वाद नाही. त्यांच्यात प्रतिभा आहे, पण केवळ याच एकमेव विभागात पाक संघ भारताच्या तुलनेत थोडा पिछाडीवर आहे. पाकिस्तान संघ भारताविरुद्ध नेहमीच आक्रमक खेळतो, पण प्रतिष्ठेच्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत खेळाच्या प्रत्येक विभागात सातत्य राखणे महत्त्वाचे ठरते.प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवित अंतिम फेरीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या संघाविरुद्ध त्यांची लढत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीचा ‘वाईट दिवस’ वगळता भारतीय संघाची या स्पर्धेतील वाटचाल शानदार ठरली आहे. विविधतेच्या जोरावर भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिलेली नाही. प्रतिस्पर्धी संघाची भागीदारी बहरत असताना चमकदार क्षेत्ररक्षण किंवा कामचलाऊ गोलंदाज कर्णधारचा विश्वास सार्थ ठरवित आहेत. प्रतिस्पर्धी संघाला बुचकाळ्यात टाकणारे निर्णय घेत कर्णधार विराट कोहलीने आपले वेगळेपण जपले आहे. खेळावर नियंत्रण राखण्यात तो यशस्वी ठरला आहे. फलंदाजीमध्ये भारतीय संघ वरचढ आहे. रविवारीच्या लढतीत उभय संघातील खेळाडूंसाठी मनोधैर्य कायम राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ पाकवर वर्चस्व गाजवित आहे. पाक संघावर कुठलेही दडपण नसेल. कारण पराभव झाला तरी ‘खेळाडूंनी चांगली कामगिरी केली’ असेच म्हटले जाईल. निर्भय असा, पण निष्काळजी नको. (गेमप्लॅन)