शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

‘बीसीसीआय’च्या मदतीची ‘कॅबी’ला गरज

By admin | Updated: May 23, 2015 01:00 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा असणाऱ्या या संघाने एकदिवसीय व टी-२० असे दोन वर्ल्डकप जिंकले.... आशियाई क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले...

रोहित नाईक ल्ल मुंबईआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा असणाऱ्या या संघाने एकदिवसीय व टी-२० असे दोन वर्ल्डकप जिंकले.... आशियाई क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले... ज्या देशाने क्रिकेट जन्माला घातले त्या इंग्लंड विरुध्द एकदाही हार पत्करली नाही.... अशी दैदिप्यमान कामगिरी करणारा संघ दुसऱ्या तिसऱ्या देशाचा नसून खुद्द ‘भारत’ देशाचा आहे. फरक एकच की, हा अंध खेळाडूंचा संघ आहे आणि जागतिक पातळीवर वर्चस्व मिळाल्यानंतरही आज हा संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मान्यता मिळण्याच्या प्रतिक्षेत ताटकळत उभा आहे.क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इन इंडिया (कॅबी) अंतर्गत भारतामध्ये अंध खेळाडू क्रिकेट खेळतात. शुक्रवारी भारताचा अंध खेळाडूंचा संघ इंग्लंड विरुध्द क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईहून इग्लंडला रवाना झाला. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ २४ -३० मे दरम्यान ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार असून यानंतर भारतीय चमू बहारीन येथे १ ते ४ जून दरम्यान मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी जाईल. विशेष म्हणजे पुढील वर्षीचा अंध खेळाडूंचा वर्ल्डकप भारतात होणार असून या स्पर्धेची पुर्वतयारी म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.जगभरात क्रिकेट खेळणाऱ्या सर्व प्रमुख राष्ट्रांचा अंध खेळाडूंचा संघ आपआपल्या मुख्य राष्ट्रीय क्रिकेट संघटनेशी संलग्न असताना देखील जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘वजन’ असलेल्या बीसीसीआयने अजूनही ‘कॅबी’ला आधार दिलेला नाही. मात्र सध्या कार्यरत असलेल्या नवीन समितीकडून आम्हाला अनेक अपेक्षा असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ‘कॅबी’चे जनरल सेक्रेटरी व वर्ल्ड ब्लाईंड क्रिकेट काऊंसीलचे (डब्ल्यूबीसीसी) उपाध्यक्ष महंतेश जी.के. यांनी ‘लोकमत’ला सांगितले.२०१२ साली बंगळुरु येथे झालेल्या पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकताना भारताने अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवले होते. यानंतर गतवर्षी डिसेंबर महिन्यात द. आफ्रिकेत झालेला एकदिवसीय सामन्यांचा वर्ल्डकप पटकावताना पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानचा फडशा पाडला. मात्र तरीही ‘बीसीसीआय’ ची दृष्टी या संघावर अजूनही पडलेली नाही.