शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बीसीसीआयचे कसोटी क्रिकेटकडे अजिबात लक्ष नाही

By admin | Updated: August 19, 2014 00:40 IST

बीसीसीआयचा दृष्टिकोन फारसा गंभीर नसल्यामुळेच भारताला इंग्लंडकडून 1-3 ने सपाटून मार खावा लागला, अशी प्रतिक्रिया माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : कसोटी क्रिकेटकडे पाहण्याचा बीसीसीआयचा दृष्टिकोन फारसा गंभीर नसल्यामुळेच भारताला इंग्लंडकडून 1-3 ने सपाटून मार खावा लागला, अशी प्रतिक्रिया माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.
टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांच्यावर सडकून टीका करीत ‘कर्नल’ वेंगसरकर यांनी संपूर्ण कोचिंग स्टाफ ताबडतोब निलंबित करण्याचीही मागणी केली. कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत 116 कसोटी सामने खेळलेले वेंगसरकर यांनी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीबाबत ‘दूरदृष्टी’ नसलेली निवड समिती असा उल्लेख केला. 
लॉर्ड्सवर सलग तीन कसोटी शतके ठोकणारे वेंगसरकर यांनी मुलाखतीत व्यक्त केलेली मते अशी :-
पाच सामन्यांची मालिका गमाविण्यामागील कारण काय?
वेंगसरकर : सर्वात महत्त्वाचे कारण हे, की बीसीसीआय कसोटी क्रिकेटला महत्त्वच देत नाही. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास पाच कसोटी सामने खेळण्याआधी काहीच तयारी केली नव्हती. याशिवाय वेळापत्रकही चुकीचे तयार करण्यात आले. पाचही सामन्यांदरम्यान सराव सामना नव्हताच. यामुळे बाहेर बसलेल्या सात राखीव खेळाडूंना संधी मिळू शकली असती. आम्ही 18 खेळाडू घेऊन दौरा केला आणि तितकाच स्टाफ सोबतीला होता. गोलंदाज 2क् बळी घेण्याइतपत सक्षम नव्हते आणि फलंदाजही फॉर्ममध्ये दिसले नाहीत. वळण घेणारे चेंडू कसे खेळायचे, याचे तंत्र, झुंजार वृत्ती आणि समर्पित भावनेचा अभाव जाणवला. लागोपाठ एकसारखी चूक करताना आमचे फलंदाज ‘बळीच्या बक:या’सारखे दिसले. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग कोच काय करीत होते, याबद्दल आश्चर्य वाटते.
संघ निवड चुकीची होती का?
वेंगसरकर : निवडकत्र्याचे काम सोपे होते, कारण त्यांना सवरेत्कृष्ट 18 खेळाडू निवडायचे होते; पण पर्यायी व्यवस्थेचा विचारच केला नाही. व्हिजनअभावी कठोर निर्णय घेण्याचे साहस केले नाही. 
जडेजा-अँडरसन वाद आणि भारताने अँडरसनच्या निलंबनाविषयी केलेल्या मागणीमुळे खेळाडूंची एकाग्रता भंगली, असे वाटते का?
वेगसरकर : मी असे मानत नाही. अशा घटना कसोटी क्रिकेटचा भाग असतात. अशा गोष्टी खेळाडूंवर हावी होत असतील, तर कसोटी क्रिकेटमध्ये तुमच्यासाठी स्थान नाही. 
पराभवासाठी धोनीचे नेतृत्व आणि फ्लेचर यांचे कोचिंग किती जबाबदार मानता? इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, न्यूझीलंड आणि आता पुन्हा इंग्लंड असे सलग पराभवांचे तोंड पाहिल्यामुळे या दोघांची हकालपट्टी व्हावी काय? 
वेगसरकर : धोनीच्या नेतृत्वात चुका आहेत. त्याची संघनिवड नीती, डावपेच, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतील बदल यात व्यावहारिकपणाचा अभाव आहे.