शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

मुंबई, कोलकात्याची अव्वल स्थानासाठी झुंज

By admin | Updated: May 13, 2017 14:38 IST

आयपीएल १० च्या गुणतक्त्यात सध्या मुंबई इंडियन्स १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. क्वालिफायर १ मध्ये आपले स्थान कायम राखण्यासाठी मुंबई आणि कोलकाता या दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे.

ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 13 - आयपीएल १० च्या गुणतक्त्यात सध्या मुंबई इंडियन्स १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.  क्वालिफायर १ मध्ये आपले स्थान कायम राखण्यासाठी मुंबई आणि कोलकाता या दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे.  केकेआर १६ गुणांसह दुस-या स्थानावर आहे.   रोहित शर्मा आणि संघाने पुणे वगळता इतर सर्वच प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले आहे. केकेआरला देखील या आधीच्या सामन्यात पराभूत केले.
 
मुंबईला या आधीच्या दोन सामन्यात सनरायजर्स आणि पंजाबकडून पराभव पत्करावा लागला आहे. तर पंजाबने केकेआरला देखील गेल्या सामन्यात पराभव पत्करायला भाग पाडले होते.  गुणतालिकेत आपले वर्चस्व राखण्यासाठी गंभीर आणि शर्मा दोन्ही या सामन्यात आपले कसब पणाला लावतील. दोन्ही संघाचा हा साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना आहे.
 
मुंबईला उद्याच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी रोहित शर्माला खेळपट्टीवर स्थिरावणे गरजेचे आहे. लेंडल सिमन्स, केरॉन पोलार्ड आणि पार्थिव पटेल हे धावा करत आहेत. मात्र त्यासोबतच युवा नितीश राणा याला देखील आपले कसब दाखवावे लागेल. मागच्या चार ते पाच सामन्यात तो संघासाठी मोठी खेळी करु शकलेला नाही.  
 
तसेच हार्दिक पांड्या फलंदाज म्हणून कसब दाखवत आहे. मात्रगोलंदाजीतही त्याला आपली भेदकता सिद्ध करावी लागेल. मुंबईची गोलंदाजी ही केकेआरपेक्षा मजबूत आहे. कर्ण शर्मा, हरभजन सिंह,कृणाल पांड्या यांच्यासारखे फिरकीपटू आणि जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लेघन हे जलदगती गोलंदाज आहेत. मुंबईला फलंदाजीत आणखी मजबूती हवी असल्यास कर्ण शर्मा ऐवजी कृणाल पांड्याला संधी द्यावी लागेल.
 
कृणालने आपले अष्टपैलुत्व नेहमीच सिद्ध केले आहे.कोलकात्याला आपल्या आघाडीच्या फलंदाजांवर विसंबुन राहण्याची वृत्ती सोडावी लागेल. मुंबईच्या गोलंदाजांसमोर ख्रिस लीन, सुनिल नरेन या पार्टटाईम ओपनर सोबतच गंभीर, उथप्पाचे देखील आव्हान असेल. मनिष पांडे याने देखील स्पर्धेत लक्षवेधी खेळी केली आहे. मुंबईच्या फलंदाजांना कुल्टरनाईल, डी ग्रॅण्डहोम आणि उमेश यादव यांच्यापासून सावध रहावे लागेल.