शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

फलंदाजी हीच निर्णायक बाब ठरेल!

By admin | Updated: March 19, 2016 01:58 IST

कोलकाता महालढतीसाठी सज्ज झाले आहे. पारंपरिक संघातील या लढतीसाठी ईडन गार्डन येथे खेळाडूंचे स्वागत असून, क्रिकेटविश्वातील दिग्गजांचे डोळे शनिवारच्या लढतीकडे लागलेले

- सौरव गांगुली लिहितो़...कोलकाता महालढतीसाठी सज्ज झाले आहे. पारंपरिक संघातील या लढतीसाठी ईडन गार्डन येथे खेळाडूंचे स्वागत असून, क्रिकेटविश्वातील दिग्गजांचे डोळे शनिवारच्या लढतीकडे लागलेले असतील. क्रिकेटच्या प्रत्येक हालचालींचा मिनिटा मिनिटाला मिळणारा आनंद फार मोठा असतो. क्रिकेटपटू या नात्याने मी भारत-पाक लढतीचा प्रत्यक्ष साक्षीदार राहिलो. आता आयोजक या नात्याने नवी जबाबदारी आव्हानात्मक आहे.पहिला सामना भारताने गमविल्यामुळे चाहते फारच दडपणात आहेत; पण एक सांगू का, दडपणातून मार्ग काढणारा आणि मुसंडी मारणारा जर कुठला संघ असेल तर तो भारतच आहे. ११ पैकी १० सामने भारताने सलग जिंकले हे विसरू शकत नाही.ईडनची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल आहे. अनेक भारतीय खेळाडू या खेळपट्टीवर मोठी खेळी करू शकतील, अशी अपेक्षा करता येईल. या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत असल्याने ती वेगवान माऱ्यालादेखील मदत करेल पण फिरकी गोलंदाजांनी चेंडूचा टप्पा अचूक ठेवल्यास फलंदाजांना ते त्रस्त करू शकतील. मैदानाचे आऊटफिल्डही वेगवान आहे. क्षेत्ररक्षकांच्या हातून चेंडू निसटल्यास तो थेट सीमारेषेवरच जाऊन विसावतो. खेळपट्टीचे स्वरूप संपूर्ण ४० षटके एकसारखे राहणार असल्याने नाणेफेक कुणीही जिंको फारसा फरक पडणार नाही.ईडनवर पाकने बांगलादेशला नमविल्याने त्यांचे पारडे या सामन्यात किंचित जड आहे. पण, याचा अर्थ असा नव्हे की भारताविरुद्ध त्यांची बाजू भक्कम ठरावी. शनिवारचा दिवस नवा असेल आणि एका बलाढ्य फलंदाजी असलेल्या संघाविरुद्ध ते खेळणार आहेत. पाकची गोलंदाजी धारदार आहे, पण फलंदाजी मात्र चिंतेचा विषय राहीलच. या सामन्यात फलंदाजी हीच दोन्ही संघांसाठी निर्णायक बाब ठरेल, असे माझे मत आहे.दोन्ही संघ आजच्या लढतीसाठी फारसे बदल करतील असे वाटत नाही. भारत न्यूझीलंडविरुद्ध खेळलेला संघ कायम ठेवेल. बांगलादेशवर विजय मिळविणाऱ्या पाक संघात चांगला समन्वय होता. यात अधिक बदलाची आणि प्रयोगाची गरज असेल असे वाटत नाही. भारत-पाक सामना हा धर्मयुद्धासारखा असतो. सामन्यादरम्यान अनेकांचा श्वास रोखला जावा, अशा घटना घडतात. चाहत्यांच्या प्रतिसादामुळे खेळाडूंमध्येही उत्साहाचा संचार होतो. या लढतीत राष्ट्रीयत्व हा देखील प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो. कुणाविरुद्धही हरलात तरी चालेल, पण पाककडून पराभव नको अशी चाहत्यांची भावना असते. ईडनवर सामना असेल तर ६६ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीचे दडपणही यजमान संघावर असेलच. ईडनवरील पाकच्या विजयाची फारच चर्चा रंगली आहे. येथे पाक संघ भारताविरुद्ध एकाही सामन्यात हरलेला नाही; पण येथे हेदेखील ध्यानात घ्यायला हवे की भारताने विश्वचषकात पाकविरुद्ध एकही सामना गमविलेला नाही. (गेमप्लान)