शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

फलंदाजी हीच निर्णायक बाब ठरेल!

By admin | Updated: March 19, 2016 01:58 IST

कोलकाता महालढतीसाठी सज्ज झाले आहे. पारंपरिक संघातील या लढतीसाठी ईडन गार्डन येथे खेळाडूंचे स्वागत असून, क्रिकेटविश्वातील दिग्गजांचे डोळे शनिवारच्या लढतीकडे लागलेले

- सौरव गांगुली लिहितो़...कोलकाता महालढतीसाठी सज्ज झाले आहे. पारंपरिक संघातील या लढतीसाठी ईडन गार्डन येथे खेळाडूंचे स्वागत असून, क्रिकेटविश्वातील दिग्गजांचे डोळे शनिवारच्या लढतीकडे लागलेले असतील. क्रिकेटच्या प्रत्येक हालचालींचा मिनिटा मिनिटाला मिळणारा आनंद फार मोठा असतो. क्रिकेटपटू या नात्याने मी भारत-पाक लढतीचा प्रत्यक्ष साक्षीदार राहिलो. आता आयोजक या नात्याने नवी जबाबदारी आव्हानात्मक आहे.पहिला सामना भारताने गमविल्यामुळे चाहते फारच दडपणात आहेत; पण एक सांगू का, दडपणातून मार्ग काढणारा आणि मुसंडी मारणारा जर कुठला संघ असेल तर तो भारतच आहे. ११ पैकी १० सामने भारताने सलग जिंकले हे विसरू शकत नाही.ईडनची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल आहे. अनेक भारतीय खेळाडू या खेळपट्टीवर मोठी खेळी करू शकतील, अशी अपेक्षा करता येईल. या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत असल्याने ती वेगवान माऱ्यालादेखील मदत करेल पण फिरकी गोलंदाजांनी चेंडूचा टप्पा अचूक ठेवल्यास फलंदाजांना ते त्रस्त करू शकतील. मैदानाचे आऊटफिल्डही वेगवान आहे. क्षेत्ररक्षकांच्या हातून चेंडू निसटल्यास तो थेट सीमारेषेवरच जाऊन विसावतो. खेळपट्टीचे स्वरूप संपूर्ण ४० षटके एकसारखे राहणार असल्याने नाणेफेक कुणीही जिंको फारसा फरक पडणार नाही.ईडनवर पाकने बांगलादेशला नमविल्याने त्यांचे पारडे या सामन्यात किंचित जड आहे. पण, याचा अर्थ असा नव्हे की भारताविरुद्ध त्यांची बाजू भक्कम ठरावी. शनिवारचा दिवस नवा असेल आणि एका बलाढ्य फलंदाजी असलेल्या संघाविरुद्ध ते खेळणार आहेत. पाकची गोलंदाजी धारदार आहे, पण फलंदाजी मात्र चिंतेचा विषय राहीलच. या सामन्यात फलंदाजी हीच दोन्ही संघांसाठी निर्णायक बाब ठरेल, असे माझे मत आहे.दोन्ही संघ आजच्या लढतीसाठी फारसे बदल करतील असे वाटत नाही. भारत न्यूझीलंडविरुद्ध खेळलेला संघ कायम ठेवेल. बांगलादेशवर विजय मिळविणाऱ्या पाक संघात चांगला समन्वय होता. यात अधिक बदलाची आणि प्रयोगाची गरज असेल असे वाटत नाही. भारत-पाक सामना हा धर्मयुद्धासारखा असतो. सामन्यादरम्यान अनेकांचा श्वास रोखला जावा, अशा घटना घडतात. चाहत्यांच्या प्रतिसादामुळे खेळाडूंमध्येही उत्साहाचा संचार होतो. या लढतीत राष्ट्रीयत्व हा देखील प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो. कुणाविरुद्धही हरलात तरी चालेल, पण पाककडून पराभव नको अशी चाहत्यांची भावना असते. ईडनवर सामना असेल तर ६६ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीचे दडपणही यजमान संघावर असेलच. ईडनवरील पाकच्या विजयाची फारच चर्चा रंगली आहे. येथे पाक संघ भारताविरुद्ध एकाही सामन्यात हरलेला नाही; पण येथे हेदेखील ध्यानात घ्यायला हवे की भारताने विश्वचषकात पाकविरुद्ध एकही सामना गमविलेला नाही. (गेमप्लान)