शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

बांगलादेश-आॅस्ट्रेलिया महत्त्वपूर्ण लढत आज

By admin | Updated: June 5, 2017 04:00 IST

आॅस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज, सोमवारी ओव्हलवर बांगलादेशविरुद्ध ‘अ’ गटात खेळल्या जाणाऱ्या साखळी लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळवण्यास उत्सुक आहे.

लंडन : न्यूझीलंडविरुद्ध पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या पहिल्या लढतीत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागल्यानंतर आॅस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज, सोमवारी ओव्हलवर बांगलादेशविरुद्ध ‘अ’ गटात खेळल्या जाणाऱ्या साखळी लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळवण्यास उत्सुक आहे. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यादरम्यान बर्मिंघममध्ये खेळल्या गेलेली लढत पावसामुळे पूर्ण झाली नाही. उभय संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. न्यूझीलंडच्या २९१ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलियाने पावसाच्या व्यत्ययापर्यंत ९ षटकांत ३ बाद ५३ धावा फटकावल्या होत्या. आॅस्ट्रेलियाला नशिबाची साथ लाभल्यामुळे लढत रद्द झाली. आॅस्ट्रेलियन कर्णधार स्मिथनेही सामन्यानंतर तशी कबुली दिली होती. बांगलादेशची सुरुवातही निराशाजनक झाली. इंग्लंडविरुद्ध सलामी लढतीत बांगलादेशने तमिम इक्बालच्या शतकी खेळीच्या जोरावर ६ बाद ३०५ धावांची दमदार मजल मारली होती, पण तरी ते ८ गड्यांनी पराभूत झाले होते.आॅस्ट्रेलिया व बांगलादेश संघांसाठी आता ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण एका पराभवानेही उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशेला धक्का बसू शकतो. स्मिथला त्याची चांगली कल्पना आहे. बांगलादेशविरुद्ध आॅस्ट्रेलिया संघ मोठ्या फरकाने विजय मिळवण्यास प्रयत्नशील आहे, पण स्मिथ अँड कंपनी प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. कारण २००५ मध्ये कार्डिफ येथे बांगलादेशविरुद्ध पत्करावा लागलेला पराभव आॅस्ट्रेलिया संघ अद्याप विसरलेला नाही. पहिल्या लढतींमध्ये आॅस्ट्रेलिया व बांगलादेश संघांच्या गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली होती. आॅस्ट्रेलियाच्या स्टार्क, हेजलवूड, कमिन्स व हेस्टिंग्स या गोलंदाजांना न्यूझीलंडविरुद्ध सुरुवातीच्या ४० षटकांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. हेजलवूडने त्यानंतर दमदार पुनरागमन करीत ५२ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले, पण कर्णधार स्मिथ गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराज होता. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत जेम्स पॅटिन्सनला संघात स्थान मिळू शकते. बांगलादेश संघाची भिस्त सलामीवीर तमिम इक्बाल, कर्णधार मुशफिकर रहिम, अष्टपैलू शाकिब-अल-हसन आणि वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. तमिम व रहीम यांनी गेल्या लढतीत चांगली गोलंदाजी केली होती तर, शाकिब दोन्ही विभागात अपयशी ठरला होता. मुस्तफिजुरलाही गोलंदाजीमध्ये छाप सोडता आली नव्हती. (वृत्तसंस्था)