शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

...तर बांगलादेश, श्रीलंकेचा भारताला पाठिंबा नसेल

By admin | Updated: April 3, 2017 00:32 IST

बीसीसीआयने आयसीसीच्या बैठकीमध्ये प्रतिनिधी म्हणून एन. श्रीनिवासन यांना पाठविण्याचा निर्णय घेतला

नवी दिल्ली : बीसीसीआयने आयसीसीच्या बैठकीमध्ये प्रतिनिधी म्हणून एन. श्रीनिवासन यांना पाठविण्याचा निर्णय घेतला तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे आयसीसीचे प्रस्तावित घटनाबदल व आर्थिक सुधारणा विधेयक रोखण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसणार आहे.बीसीसीआयच्या विशेष आमसभेमध्ये जास्तीत जास्त राज्य संघटना श्रीनिवासन यांचे समर्थन करणार असल्याचे संकेत मिळत आहे. बीसीसीआयची विशेष आमसभा ९ एप्रिल रोजी होणार आहे. याचा अर्थ बांगलादेश आणि श्रीलंका भारताचे समर्थन करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्राने सांगितले की,‘बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) श्रीनिवासन यांच्यापासून सावध आहेत. आॅस्ट्रेलियातील २०१५ च्या विश्वकप स्पर्धेत आयसीसी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांचा झालेला अपमान ते अद्याप विसरलेले नाहीत. त्यामुळे आयसीसी बोर्डाच्या बैठकीमध्ये श्रीनिवासन बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणार असतील तर बांगलादेशची बीसीसीआयला साथ लाभणार नाही.’दरम्यान, श्रीलंकासुद्धा असाच विचार करीत असून झिम्बाब्वेचेही असेच मत आहे. भारताला आयसीसीमधील सुधारणा रोखण्यासाठी तीन मतांची गरज आहे. सूत्रानी सांगितले की,‘सुधारणाबाबतचा प्रस्ताव मतदानासाठी आला आणि श्रीनिवासन यांनी बीसीसीआयचे प्रतिनिधित्व केले तर बीसीसीआयला १-९ किंवा २-८ ने पराभव स्वीकारावा लागला तर आश्चर्य वाटायला नको.’आयसीसीच्या गेल्या दोन बैठकांमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व विक्रम लिमाये यांनी केले होते. आयसीसीची वार्षिक बैठक २७-२८ एप्रिल रोजी दुबईमध्ये होणार आहे. (वृत्तसंस्था)