शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत मैत्री शक्य नाही - विराट कोहली

By admin | Updated: March 28, 2017 16:15 IST

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये अनेकदा बाचाबाची पाहायला मिळाली.

ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 -भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये अनेकदा बाचाबाची पाहायला मिळाली. मैदानावर जितकं वातावरण गरम होतं तितकंच मैदानाच्या बाहेरही होतं. पण आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मित्र मानत नाही असं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला. चौथ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत विराट बोलत होता. 
मालिकेत 2-1 ने विजय मिळवल्यानंतर आता  स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियन संघासोबत मैत्रीची नवी सुरूवात करणार का असं विचारलं असता नाही आता आधीसारखं काही राहिलं नाहीये, मीही आधी असाच विचार करायचो पण आता सर्व बदललं आहे. पहिल्या कसोटीनंतर मी जे बोललो होतो  त्याबाबत मी पूर्णत: चुकीचा सिद्ध झालो.  खेळाच्या वातावरणात तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून खेळायचं असतं, पण मी चुकीचा ठरलो.  पहिल्या कसोटीनंतर मी जे बोललो होतो तसं पुन्हा बोलताना तुम्ही मला पाहणार नाही, असं कोहली म्हणाला.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयाने आनंदीत झालेल्या कर्णधार विराट कोहलीने हा आतापर्यंतचा सर्वोत्तम मालिका विजय असल्याचे म्हटले. मालिकेमध्ये दोन्ही संघांमध्ये झालेल्या शाब्दीक वादावादीबद्दल बोलताना कोहली म्हणाला की, कोणी आम्हाला डिवचले तर, आम्ही उत्तर देणारच. आम्ही शिखरावर असू किंवा नसू कोणी आम्हाला डिवचले तर, आम्ही उत्तर देणारच. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे विराटला चौथ्या कसोटीत खेळता आले नाही. 
बंगळुरुच्या दुस-या कसोटीत डीआरएसवरुन कोहलीने ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला लक्ष्य केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसारमाध्यमांनी कोहलीला टार्गेट केले होते. माझ्याबद्दल काय लिहीले जाते किंवा बोलले जाते याचा मी विचार करत नाही. काही लोकांना जगाच्या कुठल्या तरी एका भागामध्ये बसून मसाला तयार करायचा असतो. त्यांना परिस्थितीशी समोरुन सामना करायचा नसतो. घरी बसून ब्लॉगवर लिहीणे किंवा माइकवर बोलणे सोपे आहे पण तेच मैदानावर फलंदाजी-गोलंदाजी करणे पूर्णपणे वेगळे आहे असे कोहलीने सांगितले. मी या मालिकेत चांगली कामगिरी केली नाही, त्यामुळे प्रत्येकाला माझ्याबद्दल भरपूर बोलण्याची संधी आहे. पण त्याबद्दल माझी काही तक्रार नाही असे विराट म्हणाला.