शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी, ४ विकेट्सने केली मात

By admin | Updated: January 18, 2015 17:37 IST

तिरंगी मालिकेत रंगतदार सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. १८ - तिरंगी मालिकेत रंगतदार सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेले २६८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांमध्ये गाठले असून सलामीवीर अॅरोन फिंचच्या ९६ धावांच्या खेळीने कांगारुनी भारतावर विजय मिळवला.

भारताचे २६८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची सुरुवात चांगली झाली. अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हीड वॉर्नर या जो़डीने अर्धशतकी सलामी करुन दिली. उमेश यादवने वॉर्नर २४ धावांवर असताना त्याला बाद केले.  फिंचने शेन वॉटसनसोबत संघाला शंभरी गाठून दिली. संघाच्या ११५ धावांवर असताना वॉटसन (४१ धावा) बाद झाला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर भारताचा मारा निष्प्रभ ठरत होता. ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावत दोनशेचा पल्लाही ओलांडला होता.  स्टीव्ह स्मिथ ४७ धावांवर असताना मोहम्मद शमीने त्याला बाद केले. त्यापाठोपाठ सलामीवीर अ‍ॅरोन फिंचही ९६ धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद २१९ अशी झाली. आर. अश्विनने जॉर्ज बेलीला स्वस्तात माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद २३० अशी केली. लागोपाठ तीन विकेट गेल्याने सामन्याला कलाटणी मिळाली आणि सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला. ग्लेन मॅक्सवेल २० धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया ६ बाद २४८ अशा अवस्थेत होता. कांगारुंना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला १७ चेंडूत २० धावांची गरज होती. अक्षर पटेलने अचूक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखले. १२ चेंडूत १५ धावा अशा रोमहर्षक स्थितीत सामना पोहोचला होता. मात्र भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या ४९ व्या षटकात जेम्स फॉल्कनर आणि ब्रॅ़ड हॅडीन यांनी एकाच षटकात १५ धावा ठोकून संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात सहा विकेट घेणारा मिशेल स्टार्कला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.  

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक होती. शिखर धवन २ धावा, अजिंक्य रहाणे १२ आणि विराट कोहली अवघ्या ९ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ५९ अशी झाली होती. मात्र त्यानंतर सलामीवीर रोहित शर्माने सुरेश रैनाच्या साथीने संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. मिशेल स्टार्कने सुरैश रैनाला बाद करत ही जोडी फोडली. सुरेश रैना ५१ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधाऱ महेंद्रसिंग धोनीने सावध खेळी करत ३१ धावांमध्ये १९ धावा केल्या. मात्र मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला व स्टार्कने त्याची विकेट घेतली. अक्षर पटेलही शून्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था ६ बाद २३७ अशी झाली. अखेरीस रोहित शर्माने आर. अश्विनच्या मदतीने भारताला २५० चा पल्ला गाठून दिला. रोहित शर्मा १३८ धावांवर असताना स्टार्कच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शर्मा झेलबाद झाला. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यातील सहावे शतक ठोकून पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला. तर भूवनेश्वर कुमारही भोपळा न फोडता माघारी परतला. शेवटच्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या गोलदाजांनी अचूक मारा करत भारतीय फलंदाजांना रोखले आणि ५० षटकांत भारताने आठ गडी गमावत २६७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल स्टार्क हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मिशेल स्टार्कने १० षटकांत ४३ धावा देऊन भारताच्या सहा विकेट घेतल्या. तर गुरिंदर संधू आणि जेम्स फॉल्कनरने प्रत्येकी एक विकेट घेतली.