शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

‘पंच’तारांकित विजयासाठी आॅस्ट्रेलिया सज्ज

By admin | Updated: February 10, 2015 01:59 IST

विश्वचषक स्पर्धेच्या प्रारंभी वेस्ट इंडीज संघाने क्रिकेटवर अधिराज्य गाजविले, पण सत्ता आणि संपत्ती सदासर्वकाळ टिकत नसते याची

विश्वास चरणकर, कोल्हापूरविश्वचषक स्पर्धेच्या प्रारंभी वेस्ट इंडीज संघाने क्रिकेटवर अधिराज्य गाजविले, पण सत्ता आणि संपत्ती सदासर्वकाळ टिकत नसते याची प्रचिती क्रिकेटमध्येही आली. नव्वदीच्या दशकानंतर क्रिकेटमध्ये आॅन दि फिल्ड आणि आॅफ दि फिल्ड बरीच उलथापालथ झाली. पण या सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे वेस्ट इंडिजची सद्दी संपून आॅस्ट्रेलिया नवा सम्राट म्हणून उदयास आला. १९८७ला त्यांनी पहिला विश्वचषक जिंकला. त्यानंतरच्या सहा वर्ल्डकपपैकी तीन वर्ल्डकप त्यांनी जिंकले. सर्वाधिक चारवेळ विश्वचषक जिंकणारा संघ म्हणून त्यांचा दबदबा आहे. १९७५ च्या पहिल्या विश्वचषकात आॅस्ट्रेलियाने थेट फायनलपर्यंत धडक मारली, पण वेस्ट इंडीजच्या पोलादी भिंतीपुढे त्यांचो वादळ शमले. पुढच्या दोन विश्वचषकात त्यांना पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले. भारत आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त यजमापदाखाली झालेल्या १९८७ चा विश्वचषक हा आॅस्ट्रेलियाच्या साम्राज्याची नांदी होती. या स्पर्धेत इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया हे दोन पारंपारीक विरोधक फायनलमध्ये आमने-सामने आले. आॅस्टे्रलियाला २५३ वर गुंडाळून इंग्लंडने सामन्यात वर्चस्व निर्माण केले, पण आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी ५० षटकात ८ बाद २४६ पर्यंत इंग्लंडला रोखून धरले. इंग्लंडचा ८ धावांनी पराभव झाला. अ‍ॅलन बोर्डरच्या नेतृत्त्वाखाली आॅस्ट्रेलिया पहिल्यांदाच जगज्जेता ठरला. कोलकात्याच्या ईडन गार्डनच्या साक्षीने क्रिकेट जगतात एक नवा राजा राज्य करण्यास अवतरला होता. त्यानंतर १९९२ साली इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात पावसाच्या कृपेने पाकिस्तानला एक गुण जास्त मिळाल्यामुळे त्यांना सेमीफायनल गाठता आली नाही. तर १९९६ ला त्यांनी अंतिम फेरी गाठली पण श्रीलंकेने त्यांना पछाडून विश्वविजेतेपद जिंकले. १९९९, २00३ आणि २00७ असे सलग तीनवर्षे त्यांनी विश्वविजेतेपद मिळविले. म्हणजे सलग १५ वर्षे त्यांच्या डोक्यावर विश्वविजेतेपदाचा मुकुट होता. १९९९च्या विश्वचषकाची फायनल अक्षरश एकतर्फी झाली. आॅस्ट्रेलियाने पाकला केवळ १३२ धावात रोखले. हे आव्हान कांगारुंनी दोन गड्यांच्या मोबदल्यात २० षटकातच गाठले. या स्पर्धेत भारताने उपांत्यफेरीत त्यांना घरी घालवून त्यांच्या नावापुढे ‘माजी विश्वविजेते’ असे विशेषण लावले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आॅस्ट्रेलिया हा सर्वात प्रबळ दावेदार आहे. इतिहासातील आकडेवारीवरुन त्यांच्याविषयी हे बोलले जात नाही, तर त्यांच्या संघातील खेळाडूंवर नजर टाकली की हे लक्षात येते. आजच्या आॅस्ट्रेलियन संघात प्रत्येक जागेवर त्यांच्याकडे तीन-तीन पर्याय आहेत. इतकेच नाही तर कर्णधारपदासाठीही त्यांच्याकडे तीन आॅप्शन आहेत. मायकेल क्लार्क फिट होवून संघात आला तर जॉर्ज बेलीला संघात ‘स्लॉट’च उपलब्ध होत नाही. आजच्या संघात सलामीवीर अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हीड वॉर्नर ही जोडी सर्वात विध्वंसक समजली जाते. पाठोपाठ शेन वॉटसन, मिशेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, बेली/क्लार्क, यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडीन हे सगळेच फार्मात आहेत. आयपीएलचा मिलेनियर ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर त्यांच्याकडे आहे. अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यात नसतील तेवढी क्षेपणास्त्रे आॅस्ट्रेलियन गोलंदाजीत आहेत. गेली दोन वर्षे मिशेल जॉन्सन हा जगातील सर्व खेळपट्टयांवर धुमाकूळ घालतोय. त्यात मायदेशातील खेळपट्ट्या म्हणजे त्यांच्यासाठी ‘सोने पे सुहागा.’ जोडीला मायकेल स्टार्क, जोश हेजलवूड, झेव्हिअर डोहर्टी, पॅट कमिन्स आणि जेम्स फॉल्कनेर अशी तगडी स्टारकास्ट विरोधीपक्षाच्या चिंधड्या उडविण्यास समर्थ आहे. बलाढ्य संघ, होमग्राउंड आणि प्रेक्षकांचा पाठिंबा या जोरावर आॅस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्यास सज्ज आहे.