शहरं
Join us  
Trending Stories
1
जनसुरक्षा विधेयक नेमके आहे तरी काय? महाराष्ट्रात गरज काय? CM फडणवीसांनी विधानसभेत केले सादर
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
"तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तुम्हाला संधी देतोय"; मुनगंटीवारांचा CM फडणवीसांना टोला
4
Kapil Sharma Cafe: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन
5
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
6
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
7
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
8
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
9
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
10
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
11
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
12
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
13
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
14
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
15
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
16
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
17
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
18
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
19
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
20
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."

३२६ धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड

By admin | Updated: December 29, 2014 15:44 IST

तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी गमावत २६१ धावा केल्या असून भारतावर ३२६ धावांची आघाडी घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. २९ - मेलबर्न येथे सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने ७ गडी गमावत २६१ धावा केल्या असून भारतावर ३२६ धावांची आघाडी घेतली आहे. चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे २ - ० अशी आघाडी असून हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकेल किंवा अनिर्णित राखेल आणि मालिका जिंकेल असे दिसत आहे. भारताचा पहिला डाव ४६५ डावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने झुंजार अर्धशतकी खेळी केली आणि कांगारूंचा डाव सावरला. याआधी पाठलाग करून चौथ्या डावात सामना जिंकण्याचा मेलबर्नवरचा विक्रम इंग्लंडने केला होता, ज्यावेळी त्यांनी ३३२ धावा केल्या होत्या. भारत हा सामना जिंकला तर नवा विक्रम करूनच. अर्थात तशी शक्यता कमी असून पाचव्या व शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी व नंतर फलंदाजांनी चमत्कार केला तरच भारताला हा सामना जिंकणे शक्य होणार आहे. 

त्याआधी चौथ्या दिवशी सकाळी ८ बाद ४६२ वरुन पुढे खेळताना भारताच्या धावसंख्येत फक्त तीन धावांची भर पडली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी मोहम्मद शमी आणि उमेश यादव या दोघांना झटपट बाद केल्याने भारताचा डाव ४६५ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियातर्फे रेयॉन हॅरिसने ४, मिचेल जॉन्सनने ३ आणि लियोनने दोन विकेट घेतल्या. तर वॉटसनने एक विकेट घेतली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे ६० धावांची आघाडी होती. दुस-या डावात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवारांनी संघाला चांगली सुरुवात करत ऑस्ट्रेलियाची सामन्यावरील पकड मजबूत केली. पाऊस आणि खराब हवामानामुळे चौथ्या दिवसातील सुमारे दीड तास वाया गेला. दुस-या डावात ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत २ गडी गमावत ९८ धावा केल्या आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाकडे १६३ धावांची आघाडी आहे.