शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

३२६ धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड

By admin | Updated: December 29, 2014 15:44 IST

तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी गमावत २६१ धावा केल्या असून भारतावर ३२६ धावांची आघाडी घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. २९ - मेलबर्न येथे सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने ७ गडी गमावत २६१ धावा केल्या असून भारतावर ३२६ धावांची आघाडी घेतली आहे. चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे २ - ० अशी आघाडी असून हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकेल किंवा अनिर्णित राखेल आणि मालिका जिंकेल असे दिसत आहे. भारताचा पहिला डाव ४६५ डावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने झुंजार अर्धशतकी खेळी केली आणि कांगारूंचा डाव सावरला. याआधी पाठलाग करून चौथ्या डावात सामना जिंकण्याचा मेलबर्नवरचा विक्रम इंग्लंडने केला होता, ज्यावेळी त्यांनी ३३२ धावा केल्या होत्या. भारत हा सामना जिंकला तर नवा विक्रम करूनच. अर्थात तशी शक्यता कमी असून पाचव्या व शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी व नंतर फलंदाजांनी चमत्कार केला तरच भारताला हा सामना जिंकणे शक्य होणार आहे. 

त्याआधी चौथ्या दिवशी सकाळी ८ बाद ४६२ वरुन पुढे खेळताना भारताच्या धावसंख्येत फक्त तीन धावांची भर पडली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी मोहम्मद शमी आणि उमेश यादव या दोघांना झटपट बाद केल्याने भारताचा डाव ४६५ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियातर्फे रेयॉन हॅरिसने ४, मिचेल जॉन्सनने ३ आणि लियोनने दोन विकेट घेतल्या. तर वॉटसनने एक विकेट घेतली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे ६० धावांची आघाडी होती. दुस-या डावात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवारांनी संघाला चांगली सुरुवात करत ऑस्ट्रेलियाची सामन्यावरील पकड मजबूत केली. पाऊस आणि खराब हवामानामुळे चौथ्या दिवसातील सुमारे दीड तास वाया गेला. दुस-या डावात ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत २ गडी गमावत ९८ धावा केल्या आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाकडे १६३ धावांची आघाडी आहे.