शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

आॅस्ट्रेलियाने मालिकेवर छाप सोडली

By admin | Updated: March 6, 2017 00:06 IST

सध्या खेळल्या जात असलेल्या मालिकेमध्ये जास्तीत जास्त सत्रांमध्ये आॅस्ट्रेलिया संघाने वर्चस्व गाजवले.

-रवी शास्त्री लिहितो...सध्या खेळल्या जात असलेल्या मालिकेमध्ये जास्तीत जास्त सत्रांमध्ये आॅस्ट्रेलिया संघाने वर्चस्व गाजवले. बेंगळुरुतील दुसरा दिवस काही वेगळा नव्हता. ते निखाऱ्यावर चालण्यासाठी सज्ज होते. येथील परिस्थितीची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी संथगतीने धावा केल्या. नैसर्गिक आक्रमक शैलीला मुरड घालत त्यांनी बचावात्मक पवित्रा स्वीकारला. कसोटी मालिकेच्या निर्णायक दिवशी त्यांनी वर्चस्व गाजवले. भारतीय संघ निश्चितच दडपणाखाली आहे. अनेकदा क्षेत्ररक्षक चुका करीत असून डीआरएस घेण्यात डोके काम करीत नसल्याचे चित्र आहे. फलंदाजांच्या आजूबाजूला क्षेत्ररक्षक थकलेले दिसत आहेत. गोलंदाजांची कामगिरी मात्र प्रभावित करणारी होती. अडचणीच्या परिस्थितीत त्यांनी खांदे न झुकवता आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित कुठल्याही निष्पक्ष पर्यवेक्षकाला याची नोंद घेता आली असती. उमेश यादव व ईशांत शर्माची जोडी शानदार होती. आॅस्ट्रेलियाचा प्रत्येक फलंदाज ‘अभेद्य भिंत’ म्हणूनच मैदानात दाखल होत होता. आॅस्ट्रेलियाची फलंदाजी केवळ वॉर्नर किंवा स्मिथवर अवलंबून नसल्याचे स्पष्ट झाले. प्रत्येक फलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या रणनीतीला उत्तर देण्यास सज्ज असल्याचे दिसून आले. त्यांनी भारतीय संघाला चोख उत्तर देण्याचा निर्धार केला आहे. उंच चणीचा युवा सलामीवीर मॅट रेनशॉने सर्वांना प्रभावित केले. त्याचा आपल्या फुटवर्कवर विश्वास आहे. आव्हानात्मक परिस्थिती असली तरी त्याचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्याने महत्त्वाची खेळी केली. त्यानंतर शॉन मार्श आणि मॅथ्यू वेड यांनी लढवय्या खेळी करीत सामन्याला निर्णायक वळणावर पोहचविले. सध्याची स्थिती बघता भारताच्या आघाडीच्या फळीला चांगली फलंदाजी करावी लागेल. आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव अद्याप संपलेला नाही. झपाट्याने रंग बदलत असलेल्या खेळपट्टीवर प्रत्येक धाव मोलाची आहे. (टीसीएम)