शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

अश्विनने ३७ व्या सामन्यात गाठला २०० बळींचा पल्ला

By admin | Updated: September 25, 2016 20:31 IST

रविवारी चौथ्या दिवशी किवी कर्णधार केन विलियम्सनला बाद करीत कसोटी कारकिर्दीतील २०० वा बळी घेतला.

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि. 25 - आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने कारकिर्दीतील ३७ व्या कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी किवी कर्णधार केन विलियम्सनला बाद करीत कसोटी कारकिर्दीतील २०० वा बळी घेतला. सर्वांत कमी सामन्यांत असा पराक्रम करणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी, आॅस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेटने ३६ कसोटी सामन्यात २०० बळी घेतले आहेत. अश्विनने आज डेनिस लिली व वकार युनिस यांना पिछाडीवर सोडले. त्यांनी ३८ कसोटी सामन्यांत बळींचे द्विशतक नोंदवले होते. सध्या क्रिकेट खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने ३९ सामन्यांत बळींचे द्विशतक पूर्ण केले आहे. भारतातर्फे आॅफ स्पिनर हरभजन सिंगने ४६ सामन्यांत २०० बळी पूर्ण केले होते. अनिल कुंबळेने ४७, भगवत चंद्रशेखरने ४८ तर कपिल देवने ५० सामन्यांत २०० बळींचा टप्पा गाठला. यावर अश्विननंही प्रतिक्रिया दिली आहे. विक्रमबाबत चर्चा करणे घाईचे ठरणार असून अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, अशी प्रतिक्रिया सर्वांत वेगवान २०० बळींचा पल्ला गाठणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरलेला भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने व्यक्त केली. ग्रीनपार्कमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात आतापर्यंत ३ बळी घेणाऱ्या अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा गाठला. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अश्विन म्हणाला,ह्यमाझ्या कामगिरीबाबत आताच चर्चा करणे घाईचे ठरेल. मला अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. यंदाच्या मोसमात १२ कसोटी सामने खेळायचे आहे. माझ्या मते एकावेळी एका दिवसाच्या खेळावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.ह्ण अलीकडेच वयाची तिशी गाठणारा अश्विन म्हणाला,ह्यएकाग्रता कायम राखली नाही तर कसोटी क्रिकेटमध्ये पिछाडीवर जाण्यास वेळ लागत नाही. जर काही मिळवायचे असेल तर स्वार्थी असायला हवे. कसोटी क्रिकेटची तयारी करताना एकावेळी एकाच दिवसाच्या खेळाबाबत विचार करावा लागतो. आव्हानाला सामोरे जाण्यास आवडते. या लढतीत विलियम्सन व टेलर चांगले खेळत होते. सामन्यातील यश सर्वकाही प्रतिस्पर्धी फलंदाजांचा ताळमेळ, परिस्थिती आणि सामन्याच्या स्थितीवर अवलंबून असते

भारतातर्फे २०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारे गोलंदाज

अनिल कुंबळे ६१९

कपिल देव ४३४

हरभजन सिंग ४१७

झहीर खान ३११

बिशन सिंग बेदी २६६

चंद्रशेखर २४२

जवागल श्रीनाथ २३६

ईशांत शर्मा २०९

रविचंद्रन अश्विन २००