शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनने लंकेची केली दैना, श्रालंका सर्वबाद ८२ धावा

By admin | Updated: February 14, 2016 21:01 IST

आर अश्विनच्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात लंकेचेचे फलंदाज अडकले, अश्विनने ४ तर रैनाने २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारतीय फिरकी गोंलदाजीमुळे लंका सर्व बाद ८२ धावाचं करु शकली.

ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. १४ : आर अश्विनच्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात लंकेचेचे फलंदाज अडकले, अश्विनने ४ तर रैनाने २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारतीय फिरकी गोंलदाजीमुळे लंका सर्व बाद ८२ धावाचं करु शकली. तिसरा सामना जिंकून मालिकी विजय मिळवण्याच्या दिशेने भारतीय टी २० संघाने आगेकूच केल्याचे दिसते आहे.
तिसऱ्या व निर्णायक टी २० सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजानी सार्थ ठरवत लंकेच्या तगड्या फलंदाजीला खिंडार पाडले. श्रीलंका २० षटकेही खेळू शकली नाही. श्रीलंकेने १८ षटकात सर्वबाद ८२ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी ८३ धावांचे मोजकेच अव्हान मिळाले आहे.  श्रीलंकेकडून दासुन सनाका (१९), निरोशन डिकवेला (२), दिलशान (१), कर्णधार चंडीमल (८), असेला गुणरत्ने (४), मिलिंदा सिरिवर्धना (४), सेकुगे प्रसन्ना (९), तिसारा परेरा (१२ ), सचित्र सेनानायके (८) धावांचे योगदान दिले. 
 
पुण्यातील पराभवानंतर रांचीत दणकेबाज विजय मिळवून ताकद दाखवणारा भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या 
तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आश्विनने श्रीलंकन फलंदाजांची दानादान उडवली. आश्विनने श्रीलंकेच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढताना लंकेचे चार फलंदाज माघारी परतवले. तर त्याला अनुभवी नेहराने उत्तम साथ दिली. अश्विन-नेहरा जोडीने पावर प्लेच्या पहिल्या सहा षटकात लंकेला धूळ चारली. पहिल्या सहा षटकातच लंकेचा अर्धा संघ तंबूत पाठवला गेला.  
 
 भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे लंकेचा अर्धा संघ पावरप्लेच्या ६ षटकात तंबूत परतला. अश्विनने आपल्या ४ षटकात ८ धावा देत ४ गडी बाद केले. रैनाने २ गड्याला बाद केले तर प्रत्येकी एका फलंदाजाला नेहरा, बुमरहा आणि जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. आर अश्विनने लंकेला आपल्या पहिल्या २ षटकात ३ धक्के देत श्रीलंकेच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले. अश्विनने आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर निरोशन डिकवेला २ धावांवर आणि सहाव्या चेंडूवर धोकदायक दिलशानला १ धावांवर माघारी झाडले. तर आपल्या वैयकतिक दुसऱ्या आणि संघाच्या तिसऱ्या षटकात कर्णधार चंडिमलला ८ धावावर बाद केले. अश्विनने भेदक गोंलदाजी करत श्रीलंकेच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले.

 पुण्यातील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभव पत्करावा लागला होता. पण रांचीत परतफेड करीत ६९ धावांनी सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्यात यश आले. पुण्याच्या गवताळ खेळपट्टीने भारतीय फलंदाजांचे अवसान गळाले. रांचीतील मंद खेळपट्टीवर मात्र भारतीय खेळाडूंना उत्तम ताळमेळ साधण्यात यश आले होते.

भारत :
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराजसिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या.
श्रीलंका :
दिनेश चंडीमल (कर्णधार), दुष्मंता चामिरा, निरोशन डिकवेला, तिलकरत्ने दिलशान, दिलहारा फर्नांडो, असेला गुणरत्ने, तिसारा परेरा, सेकुगे प्रसन्ना, सचित्र सेनानायके, दासुन सनाका, मिलिंदा सिरिवर्धना.