शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनने लंकेची केली दैना, श्रालंका सर्वबाद ८२ धावा

By admin | Updated: February 14, 2016 21:01 IST

आर अश्विनच्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात लंकेचेचे फलंदाज अडकले, अश्विनने ४ तर रैनाने २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारतीय फिरकी गोंलदाजीमुळे लंका सर्व बाद ८२ धावाचं करु शकली.

ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. १४ : आर अश्विनच्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात लंकेचेचे फलंदाज अडकले, अश्विनने ४ तर रैनाने २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारतीय फिरकी गोंलदाजीमुळे लंका सर्व बाद ८२ धावाचं करु शकली. तिसरा सामना जिंकून मालिकी विजय मिळवण्याच्या दिशेने भारतीय टी २० संघाने आगेकूच केल्याचे दिसते आहे.
तिसऱ्या व निर्णायक टी २० सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजानी सार्थ ठरवत लंकेच्या तगड्या फलंदाजीला खिंडार पाडले. श्रीलंका २० षटकेही खेळू शकली नाही. श्रीलंकेने १८ षटकात सर्वबाद ८२ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी ८३ धावांचे मोजकेच अव्हान मिळाले आहे.  श्रीलंकेकडून दासुन सनाका (१९), निरोशन डिकवेला (२), दिलशान (१), कर्णधार चंडीमल (८), असेला गुणरत्ने (४), मिलिंदा सिरिवर्धना (४), सेकुगे प्रसन्ना (९), तिसारा परेरा (१२ ), सचित्र सेनानायके (८) धावांचे योगदान दिले. 
 
पुण्यातील पराभवानंतर रांचीत दणकेबाज विजय मिळवून ताकद दाखवणारा भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या 
तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आश्विनने श्रीलंकन फलंदाजांची दानादान उडवली. आश्विनने श्रीलंकेच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढताना लंकेचे चार फलंदाज माघारी परतवले. तर त्याला अनुभवी नेहराने उत्तम साथ दिली. अश्विन-नेहरा जोडीने पावर प्लेच्या पहिल्या सहा षटकात लंकेला धूळ चारली. पहिल्या सहा षटकातच लंकेचा अर्धा संघ तंबूत पाठवला गेला.  
 
 भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे लंकेचा अर्धा संघ पावरप्लेच्या ६ षटकात तंबूत परतला. अश्विनने आपल्या ४ षटकात ८ धावा देत ४ गडी बाद केले. रैनाने २ गड्याला बाद केले तर प्रत्येकी एका फलंदाजाला नेहरा, बुमरहा आणि जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. आर अश्विनने लंकेला आपल्या पहिल्या २ षटकात ३ धक्के देत श्रीलंकेच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले. अश्विनने आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर निरोशन डिकवेला २ धावांवर आणि सहाव्या चेंडूवर धोकदायक दिलशानला १ धावांवर माघारी झाडले. तर आपल्या वैयकतिक दुसऱ्या आणि संघाच्या तिसऱ्या षटकात कर्णधार चंडिमलला ८ धावावर बाद केले. अश्विनने भेदक गोंलदाजी करत श्रीलंकेच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले.

 पुण्यातील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभव पत्करावा लागला होता. पण रांचीत परतफेड करीत ६९ धावांनी सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्यात यश आले. पुण्याच्या गवताळ खेळपट्टीने भारतीय फलंदाजांचे अवसान गळाले. रांचीतील मंद खेळपट्टीवर मात्र भारतीय खेळाडूंना उत्तम ताळमेळ साधण्यात यश आले होते.

भारत :
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराजसिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या.
श्रीलंका :
दिनेश चंडीमल (कर्णधार), दुष्मंता चामिरा, निरोशन डिकवेला, तिलकरत्ने दिलशान, दिलहारा फर्नांडो, असेला गुणरत्ने, तिसारा परेरा, सेकुगे प्रसन्ना, सचित्र सेनानायके, दासुन सनाका, मिलिंदा सिरिवर्धना.