शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

अजिंक्य रहाणे कर्णधार, झिम्बाब्वे दौ-यात दिग्गजांना झटका

By admin | Updated: June 29, 2015 15:43 IST

सातत्यपूर्ण खेळ करणा-या आणि क्रिकेटव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणांसाठी चर्चेत न राहिलेल्या अजिंक्य रहाणेच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ सोपवण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - भारतीय क्रिकेटमधल्या दिग्गज खेळाडुंना झिम्बाब्वे दौ-यासाठी विश्रांती देण्याच्या नावाखाली निवड समितीने चांगलाच झटका दिला असून ढोणी, कोहली, रोहीत, धवन आणि रैना यांना संघाबाहेर बसवले आहे. सातत्यपूर्ण खेळ करणा-या आणि क्रिकेटव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणांसाठी चर्चेत न राहिलेल्या अजिंक्य रहाणेच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ सोपवली आहे. भविष्यासाठी व लांबच्या पल्ल्याचा विचार करून नवोदितांना संधी देण्यात येत असल्याचे बीसीसीआयने म्हटले असून त्याचवेळी केवळ कागदावरच्या वाघांना नाही तर सातत्यपूर्ण कामगिरी करणा-यांनाच निवडले जाईल असा संदेशही निवड समितीने दिला आहे. १० जुलैपासून हा दौरा सुरू होणार असून त्यात ३ एकदिवसीय व २ टी-२० सामने खेळण्यात येणार आहेत.
रहाणेच्या नेतृत्वाखालील टीममध्ये हरभजन सिंग, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, मोहीत शर्मा, संदीप शर्मा, मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा, मुरली विजय, अंबती रायडू, केदार जाधव व कर्ण शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे.
बांग्लादेशाकडून ३ - १ असा मानहानिकारक पराभवामुळे तर हा धक्कादायक निर्णय घेण्यात नाही ना आला अशी शंका घ्यायला जागा असून, ढोणीने राजीनामा देण्याची दाखवलेली तयारी, कोहलीने ढोणीच्या नेतृत्वावर दाखवलेला अविश्वास अशा अनेक बाबींची किनार या निर्णयामागे असण्याची शक्यता आहे.
ज्या पाच दिग्गजांना विश्रांतीच्या नावाखाली डच्चू देण्यात आला आहे त्यांची बांग्लादेशातली कामगिरी पुढे दिली असून, खराब कामगिरी केल्यास कुणालाही वगळले जाऊ शकते असा इशाराच बीसीसीआयने दिला असण्याची शक्यता आहे.
 
रोहीत शर्मा - तीन सामन्यांत ६३, ० व २९ धावा
शिखर धवन - तीन सामन्यात ३०, ५३ व ७५
विराट कोहली - १, २३ व २५
महेंद्रसिंग ढोणी - ५, ४७ व ६९
सुरेश रैना - ४०, ३४ व ३८