शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

अजिंक्य रहाणे कर्णधार, झिम्बाब्वे दौ-यात दिग्गजांना झटका

By admin | Updated: June 29, 2015 15:43 IST

सातत्यपूर्ण खेळ करणा-या आणि क्रिकेटव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणांसाठी चर्चेत न राहिलेल्या अजिंक्य रहाणेच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ सोपवण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - भारतीय क्रिकेटमधल्या दिग्गज खेळाडुंना झिम्बाब्वे दौ-यासाठी विश्रांती देण्याच्या नावाखाली निवड समितीने चांगलाच झटका दिला असून ढोणी, कोहली, रोहीत, धवन आणि रैना यांना संघाबाहेर बसवले आहे. सातत्यपूर्ण खेळ करणा-या आणि क्रिकेटव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणांसाठी चर्चेत न राहिलेल्या अजिंक्य रहाणेच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ सोपवली आहे. भविष्यासाठी व लांबच्या पल्ल्याचा विचार करून नवोदितांना संधी देण्यात येत असल्याचे बीसीसीआयने म्हटले असून त्याचवेळी केवळ कागदावरच्या वाघांना नाही तर सातत्यपूर्ण कामगिरी करणा-यांनाच निवडले जाईल असा संदेशही निवड समितीने दिला आहे. १० जुलैपासून हा दौरा सुरू होणार असून त्यात ३ एकदिवसीय व २ टी-२० सामने खेळण्यात येणार आहेत.
रहाणेच्या नेतृत्वाखालील टीममध्ये हरभजन सिंग, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, मोहीत शर्मा, संदीप शर्मा, मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा, मुरली विजय, अंबती रायडू, केदार जाधव व कर्ण शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे.
बांग्लादेशाकडून ३ - १ असा मानहानिकारक पराभवामुळे तर हा धक्कादायक निर्णय घेण्यात नाही ना आला अशी शंका घ्यायला जागा असून, ढोणीने राजीनामा देण्याची दाखवलेली तयारी, कोहलीने ढोणीच्या नेतृत्वावर दाखवलेला अविश्वास अशा अनेक बाबींची किनार या निर्णयामागे असण्याची शक्यता आहे.
ज्या पाच दिग्गजांना विश्रांतीच्या नावाखाली डच्चू देण्यात आला आहे त्यांची बांग्लादेशातली कामगिरी पुढे दिली असून, खराब कामगिरी केल्यास कुणालाही वगळले जाऊ शकते असा इशाराच बीसीसीआयने दिला असण्याची शक्यता आहे.
 
रोहीत शर्मा - तीन सामन्यांत ६३, ० व २९ धावा
शिखर धवन - तीन सामन्यात ३०, ५३ व ७५
विराट कोहली - १, २३ व २५
महेंद्रसिंग ढोणी - ५, ४७ व ६९
सुरेश रैना - ४०, ३४ व ३८