शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

अखेर रवी शास्त्रीच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी

By admin | Updated: July 11, 2017 22:42 IST

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ अखेर रवी शास्त्रीच्या गळ्यात पडली आहे. तर झहीर खानची गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून

 ऑनलाइन लोकमत

 मुंबई, दि. 11 -  भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ अखेर रवी शास्त्रीच्या गळ्यात पडली आहे. त्याबरोबरच गेल्या महिनाभरापासून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत सुरू असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम मिळाला आहे. रवी शास्त्रीबरोबरच भारताच्या अन्य दोन माजी क्रिकेटपटूंकडे संघव्यवस्थापनामध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये माजी गोलंदाज झहीर खानची गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संघाच्या परदेश दौऱ्यादरम्यान राहुल द्रविड संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष  सी. के. खन्ना यांनी आज रात्री भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली. 

कर्णधार विराट कोहलीची पहिली पसंत असल्याने प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्रीचे नाआव घाडीवर होते. दरम्यान, आज संध्याकाळी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीची निवड झाल्याचे वृत्त आले होते. पण बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावले होते. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकाच्या नावाबाबतची उत्सुकता वाढली होती. अखेर रात्री बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी रवी शास्त्री याची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे घोषित केले. त्याबरोबरच झहीर खानची गोलंदाजी प्रशिक्षक आणि, राहुल द्रविडची परदेश दौऱ्यासाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याचेही त्यांनी जाहीर केले. 
अनिल कुंबळेचा कार्यकाळ शेवटच्या टप्प्यात असताना बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले होते. दरम्यान, कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद झाल्यानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार हे निश्चित झाले होते. दरम्यान, कोहलीशी झालेल्या मतभेदांनंतर अनिल कुंबळेने संघाचे प्रशिक्षकपद तडकाफडकी सोडले होते. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत आणि टॉम मुडी यांच्यासह दहा जणांनी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. त्यापैकी पाच जणांच्या मुलाखती काल  पार पडल्या होत्या.