शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पराभूत पाकिस्तानी संघाला आफ्रिदीकडून फटके

By admin | Updated: June 5, 2017 16:35 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलामीच्या लढतीत भारताकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तानी संघाची स्थानिक प्रसारमाध्यमे आणि माजी खेळाडूंकडून

ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 5 -  चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलामीच्या लढतीत भारताकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तानी संघाची स्थानिक प्रसारमाध्यमे आणि माजी खेळाडूंकडून धुलाई सुरू आहे. एकेकाळी विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानेही पाकिस्तानी खेळाडूंना शाब्दिक फटके दिले आहेत. गतविजेता भारतीय संघ या लढतीत विजेतेपदाच्या प्रबळ दावेदाराप्रमाणे खेळला. तर पाकिस्तानच्या संघाने केलेल्या सुमार खेळामुळे या सामन्यातील सगळी रंगतच निघून गेली, असे आफ्रिदी म्हणाला.
 
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानवर डकवर्थ लुईस नियमानुसार 124 धावांनी मात केली होती. या लढतीत पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघाचे आफ्रिदीने आपल्या लेखातून वाभाडे काढले आहेत. आफ्रिदी आपल्या लेखात म्हणतो,  भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळवल्या गेलेल्या लढतीत अपेक्षित असलेला रोमांच दिसलाच नाही. पाकिस्तानने केलेली अत्यंत निराशाजनक कामगिरी हे त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण. पाकिस्तानी संघाचा चाहता असल्याने माझ्यासाठी हा पराभव पाहणे दु:खद होते."
पण या लेखात आफ्रिदीने भारतीय संघाचे मात्र कौतुक केले आहे, "भारतीय संघाने या सामन्यात आपला दबदबा सिद्ध केला. भारतीय संघाने प्रबळ दावेदाराच्या थाटात खेळण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण सामन्यात तसाच खेळ केला. तर पाकिस्तानने मात्र बघता बघता शरणागती पत्करली."
 
(युवीची फटकेबाजी अन् पाकिस्तानचे सरेंडर!
 
 पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदच्या ढिसाळ रणनीतीचाही आफ्रिदीने समाचार घेतला. "नाणेफेकीचा कौल सर्फराझने जिंकला. पावसाळी वातावरणात नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे असते कारण पाऊस आल्यास नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होत असतो. पण या संधीचा पाकिस्तानी संघ फायदा उठवू शकला नाही. संघाची रणनीती खूप वाईट होती, त्यात क्षेत्ररक्षणही सुमार झाले." असे आफ्रिदी म्हणाला.