शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

१४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश, सिडनी टी-20 सामन्यात भारताचा ७ गडी राखून विजय

By admin | Updated: January 31, 2016 19:48 IST

तिस-या व शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून ही मालिका ३-० अशी जिंकली. असून भारतीय संघाने १४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम केला आहे.

ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. ३१ - तिस-या व शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून ही मालिका ३-० अशी जिंकली. असून भारतीय संघाने १४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम केला आहे. 
रोहित शर्मा (५२), विराट कोहली (५०), सुरेश रैना नाबाद ४९ यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने वॉटसनच्या नाबाद १२४ धावांच्या शानदार खेळीमुळे तिस-या टी - २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने सुरवातीपासुनच कांगारुच्या गोलंदाजावर हल्लाबोल केला. शिखर धवनने ९ चेंडूत एक षटकार आणि आणि ४ चौकाराच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले. रोहित आणि शिखर यांनी पहिल्या विकेटसाठी ३.२ षटकात ४६ धावांची सलामी दिली. धवन बाद झाल्यांतर रोहित शर्माने विराटच्या साथीने धावसंख्या हलती ठेवली रोहित-विराट जोडीने दमदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेट साठी ७८ धावांची भागीदारी केली. रोहितने ३८ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकाऱ्याच्या मदतीने ५२ धावा केल्या. विराट कोहलीने ३८ चेंडूत ५० भावांचे योगदान दिले. तर सुरेश रैनाने ३० चेंडूत झटपट ४९ धावा केल्या. शेवटच्या षटकात १७ धावा हव्या असताना युवराजने एक चौकार आणि षटकार लावत विजय समिप आणला तर रैनाने एक चेंडूच २ धावा करायच्या असताना खनखनीत चौकार लावत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियातर्फे कॅमेरून बायसने २ तर कर्णधार शेन वॉटसनने १ बळी टिपला.
तत्पूर्वी, वॉटसनच्या नाबाद १२४ धावांच्या शानदार खेळीमुळे तिस-या टी - २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले. वॉटसनची टी-२० सामन्यातील ही पहिलीच सेंच्युरी.. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ गडी गमावून १९७ धावा केल्या. 
 
ऑस्ट्रेलियाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मात्र ख्वाजा (१४), शॉन मार्श (९) आणि मॅक्सवेल (३) पटापट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती बिकट झाली. पण शेन वॉटसनने एका हाती डाव सावरत शानदार शतक तर झळकावलेच पण ऑस्ट्रेलियाला १९८ धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर हेड २६ आणि ल्यान १३ धावांवर बाद झाले.  भारतातर्फे नेहरा, अश्विन, युवराज, भुमरा आणि जडेजाने प्रत्येकी १ बळी टिपला. 
तीन सामन्यांची मालिका भारताने आधीच २-० अशी जिकंली असून आजचा सामनाही जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा धोनी व संघाचा इरादा आहे. 
 विराट कोहलीला मालिकावीर तर शेन वॉटसन सामनावीर पुरस्कार देण्यात आला,भारतार्फे आज रोहित शर्माने टी२० मध्ये १००० धावांचा टप्पा पार केला.