शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने तिजोरी उघडली
3
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
4
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
5
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
6
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
7
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
8
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
9
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
10
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
11
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
12
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
13
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
14
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
16
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
17
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
18
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
19
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
20
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर

१४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश, सिडनी टी-20 सामन्यात भारताचा ७ गडी राखून विजय

By admin | Updated: January 31, 2016 19:48 IST

तिस-या व शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून ही मालिका ३-० अशी जिंकली. असून भारतीय संघाने १४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम केला आहे.

ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. ३१ - तिस-या व शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून ही मालिका ३-० अशी जिंकली. असून भारतीय संघाने १४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम केला आहे. 
रोहित शर्मा (५२), विराट कोहली (५०), सुरेश रैना नाबाद ४९ यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने वॉटसनच्या नाबाद १२४ धावांच्या शानदार खेळीमुळे तिस-या टी - २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने सुरवातीपासुनच कांगारुच्या गोलंदाजावर हल्लाबोल केला. शिखर धवनने ९ चेंडूत एक षटकार आणि आणि ४ चौकाराच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले. रोहित आणि शिखर यांनी पहिल्या विकेटसाठी ३.२ षटकात ४६ धावांची सलामी दिली. धवन बाद झाल्यांतर रोहित शर्माने विराटच्या साथीने धावसंख्या हलती ठेवली रोहित-विराट जोडीने दमदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेट साठी ७८ धावांची भागीदारी केली. रोहितने ३८ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकाऱ्याच्या मदतीने ५२ धावा केल्या. विराट कोहलीने ३८ चेंडूत ५० भावांचे योगदान दिले. तर सुरेश रैनाने ३० चेंडूत झटपट ४९ धावा केल्या. शेवटच्या षटकात १७ धावा हव्या असताना युवराजने एक चौकार आणि षटकार लावत विजय समिप आणला तर रैनाने एक चेंडूच २ धावा करायच्या असताना खनखनीत चौकार लावत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियातर्फे कॅमेरून बायसने २ तर कर्णधार शेन वॉटसनने १ बळी टिपला.
तत्पूर्वी, वॉटसनच्या नाबाद १२४ धावांच्या शानदार खेळीमुळे तिस-या टी - २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले. वॉटसनची टी-२० सामन्यातील ही पहिलीच सेंच्युरी.. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ गडी गमावून १९७ धावा केल्या. 
 
ऑस्ट्रेलियाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मात्र ख्वाजा (१४), शॉन मार्श (९) आणि मॅक्सवेल (३) पटापट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती बिकट झाली. पण शेन वॉटसनने एका हाती डाव सावरत शानदार शतक तर झळकावलेच पण ऑस्ट्रेलियाला १९८ धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर हेड २६ आणि ल्यान १३ धावांवर बाद झाले.  भारतातर्फे नेहरा, अश्विन, युवराज, भुमरा आणि जडेजाने प्रत्येकी १ बळी टिपला. 
तीन सामन्यांची मालिका भारताने आधीच २-० अशी जिकंली असून आजचा सामनाही जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा धोनी व संघाचा इरादा आहे. 
 विराट कोहलीला मालिकावीर तर शेन वॉटसन सामनावीर पुरस्कार देण्यात आला,भारतार्फे आज रोहित शर्माने टी२० मध्ये १००० धावांचा टप्पा पार केला.