शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली कालव्याचे काम अद्याप रखडले

By admin | Updated: May 8, 2017 06:29 IST

राज्यभर ‘जलयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून अधिकाधिक जमीन पाण्याखाली आणून शेतकऱ्यांचे मनोधैर्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड जंजिरा : राज्यभर ‘जलयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून अधिकाधिक जमीन पाण्याखाली आणून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तथापि, मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल दोन वर्षांपासून बंद पडल्याने धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भात पिकासारख्या खरीप हंगामावर गुजराण करणे क्र मप्राप्त झाले आहे. आंबोली धरण लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून २०१५पासून बंद ठेवण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षा आली आहे. खारअंबोली धरणाची साठवणूक क्षमता प्रंचड आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास ६१६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विशेष भूसंपादन अधिकारी, रायगड-अलिबाग यांसकडून नोव्हेंबर २००६मध्ये तीर कालव्यासाठी तिसले, जोसरांजण, उंडरगाव, वाणदे, शिघ्रे, तसेच हाफिजखार, आंबोली, गोयगान आदी गावांतील शेतकऱ्यांची १६ एकर ३३ गुंठे जमीन संपादित केली. जमिनीची नुकसानभरपाई म्हणून १ कोटी ६४ लाखांचे वाटप उपविभागीय अधिकारी अलिबाग कार्यालयामार्फत करण्यात आले; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराने मोबदला मिळावा, अशी भूमिपुत्रांची मागणी आहे. आंबोली धरणाचा शुभारंभ २००९मध्ये झाला. हे धरण मुरुडसह लगतच्या १२ गावांची जीवनवाहिनी ठरले असून मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. अंबोली धरण उजव्या तीर कालव्याचे काम ७.१० कि. मी.पैकी ६.१० कि. मी. अपूर्ण असून, डाव्या तीर कालव्याचे २.६४ कि. मी.पैकी १.६४ कि. मी. काम अपूर्ण आहे.कालव्याच्या पाण्याअभावी नारळाची झाडे सुकलीरोहा : रोहा तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून कालव्याचे पाणी मिळू न शकल्याने ठिकठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले कालवेही पाण्याअभावी आटल्याने परिसरातील नारळाच्या बागा सुकल्या आहेत.तालुक्यातील शेतीक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने सुमारे ४० वर्षांपूर्वी सिंचन काळ प्रकल्पाच्या वतीने डोलवहाळ येथे बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले. त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून डावा तीर व उजवा तीर अशी कालव्यांची निर्मिती करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले गेले. गेल्या ४० वर्षांत कालव्याच्या पाण्यावर ओसाड जमिनीवर शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारची भातशेती केली. कालव्याची निर्मिती केल्यापासून ४० वर्षांच्या कालावधीत ठिकठिकाणी कालव्याला भगदाड पडली आहेत. याशिवाय उंदीर, घुशी व खेकडे यांनीही कालवा पोखरून काढल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. पर्यायाने मागील काही वर्षांपूर्वी कालव्याची पुनर्निर्मिती व पक्के बांधकाम करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. परिणामी, सहा वर्षांत कालव्याचे पाणी बंद झाल्यामुळे भातशेती तर ओसाड राहिली, याचबरोबर भातशेतीच्या बांधावर व मोकळ्या रानमाळावर असलेली विविध प्रकारची झाडे, बागायती व नारळाची झाडे सुकू लागली आहेत.