शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली कालव्याचे काम अद्याप रखडले

By admin | Updated: May 8, 2017 06:29 IST

राज्यभर ‘जलयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून अधिकाधिक जमीन पाण्याखाली आणून शेतकऱ्यांचे मनोधैर्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड जंजिरा : राज्यभर ‘जलयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून अधिकाधिक जमीन पाण्याखाली आणून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तथापि, मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल दोन वर्षांपासून बंद पडल्याने धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भात पिकासारख्या खरीप हंगामावर गुजराण करणे क्र मप्राप्त झाले आहे. आंबोली धरण लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून २०१५पासून बंद ठेवण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षा आली आहे. खारअंबोली धरणाची साठवणूक क्षमता प्रंचड आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास ६१६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विशेष भूसंपादन अधिकारी, रायगड-अलिबाग यांसकडून नोव्हेंबर २००६मध्ये तीर कालव्यासाठी तिसले, जोसरांजण, उंडरगाव, वाणदे, शिघ्रे, तसेच हाफिजखार, आंबोली, गोयगान आदी गावांतील शेतकऱ्यांची १६ एकर ३३ गुंठे जमीन संपादित केली. जमिनीची नुकसानभरपाई म्हणून १ कोटी ६४ लाखांचे वाटप उपविभागीय अधिकारी अलिबाग कार्यालयामार्फत करण्यात आले; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराने मोबदला मिळावा, अशी भूमिपुत्रांची मागणी आहे. आंबोली धरणाचा शुभारंभ २००९मध्ये झाला. हे धरण मुरुडसह लगतच्या १२ गावांची जीवनवाहिनी ठरले असून मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. अंबोली धरण उजव्या तीर कालव्याचे काम ७.१० कि. मी.पैकी ६.१० कि. मी. अपूर्ण असून, डाव्या तीर कालव्याचे २.६४ कि. मी.पैकी १.६४ कि. मी. काम अपूर्ण आहे.कालव्याच्या पाण्याअभावी नारळाची झाडे सुकलीरोहा : रोहा तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून कालव्याचे पाणी मिळू न शकल्याने ठिकठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले कालवेही पाण्याअभावी आटल्याने परिसरातील नारळाच्या बागा सुकल्या आहेत.तालुक्यातील शेतीक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने सुमारे ४० वर्षांपूर्वी सिंचन काळ प्रकल्पाच्या वतीने डोलवहाळ येथे बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले. त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून डावा तीर व उजवा तीर अशी कालव्यांची निर्मिती करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले गेले. गेल्या ४० वर्षांत कालव्याच्या पाण्यावर ओसाड जमिनीवर शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारची भातशेती केली. कालव्याची निर्मिती केल्यापासून ४० वर्षांच्या कालावधीत ठिकठिकाणी कालव्याला भगदाड पडली आहेत. याशिवाय उंदीर, घुशी व खेकडे यांनीही कालवा पोखरून काढल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. पर्यायाने मागील काही वर्षांपूर्वी कालव्याची पुनर्निर्मिती व पक्के बांधकाम करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. परिणामी, सहा वर्षांत कालव्याचे पाणी बंद झाल्यामुळे भातशेती तर ओसाड राहिली, याचबरोबर भातशेतीच्या बांधावर व मोकळ्या रानमाळावर असलेली विविध प्रकारची झाडे, बागायती व नारळाची झाडे सुकू लागली आहेत.