शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

आंबोली कालव्याचे काम अद्याप रखडले

By admin | Updated: May 8, 2017 06:29 IST

राज्यभर ‘जलयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून अधिकाधिक जमीन पाण्याखाली आणून शेतकऱ्यांचे मनोधैर्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड जंजिरा : राज्यभर ‘जलयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून अधिकाधिक जमीन पाण्याखाली आणून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तथापि, मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल दोन वर्षांपासून बंद पडल्याने धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भात पिकासारख्या खरीप हंगामावर गुजराण करणे क्र मप्राप्त झाले आहे. आंबोली धरण लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून २०१५पासून बंद ठेवण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षा आली आहे. खारअंबोली धरणाची साठवणूक क्षमता प्रंचड आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास ६१६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विशेष भूसंपादन अधिकारी, रायगड-अलिबाग यांसकडून नोव्हेंबर २००६मध्ये तीर कालव्यासाठी तिसले, जोसरांजण, उंडरगाव, वाणदे, शिघ्रे, तसेच हाफिजखार, आंबोली, गोयगान आदी गावांतील शेतकऱ्यांची १६ एकर ३३ गुंठे जमीन संपादित केली. जमिनीची नुकसानभरपाई म्हणून १ कोटी ६४ लाखांचे वाटप उपविभागीय अधिकारी अलिबाग कार्यालयामार्फत करण्यात आले; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराने मोबदला मिळावा, अशी भूमिपुत्रांची मागणी आहे. आंबोली धरणाचा शुभारंभ २००९मध्ये झाला. हे धरण मुरुडसह लगतच्या १२ गावांची जीवनवाहिनी ठरले असून मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. अंबोली धरण उजव्या तीर कालव्याचे काम ७.१० कि. मी.पैकी ६.१० कि. मी. अपूर्ण असून, डाव्या तीर कालव्याचे २.६४ कि. मी.पैकी १.६४ कि. मी. काम अपूर्ण आहे.कालव्याच्या पाण्याअभावी नारळाची झाडे सुकलीरोहा : रोहा तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून कालव्याचे पाणी मिळू न शकल्याने ठिकठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले कालवेही पाण्याअभावी आटल्याने परिसरातील नारळाच्या बागा सुकल्या आहेत.तालुक्यातील शेतीक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने सुमारे ४० वर्षांपूर्वी सिंचन काळ प्रकल्पाच्या वतीने डोलवहाळ येथे बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले. त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून डावा तीर व उजवा तीर अशी कालव्यांची निर्मिती करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले गेले. गेल्या ४० वर्षांत कालव्याच्या पाण्यावर ओसाड जमिनीवर शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारची भातशेती केली. कालव्याची निर्मिती केल्यापासून ४० वर्षांच्या कालावधीत ठिकठिकाणी कालव्याला भगदाड पडली आहेत. याशिवाय उंदीर, घुशी व खेकडे यांनीही कालवा पोखरून काढल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. पर्यायाने मागील काही वर्षांपूर्वी कालव्याची पुनर्निर्मिती व पक्के बांधकाम करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. परिणामी, सहा वर्षांत कालव्याचे पाणी बंद झाल्यामुळे भातशेती तर ओसाड राहिली, याचबरोबर भातशेतीच्या बांधावर व मोकळ्या रानमाळावर असलेली विविध प्रकारची झाडे, बागायती व नारळाची झाडे सुकू लागली आहेत.